शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

वसतिगृह निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:26 IST

आरमोरी : आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना इतर वसतिगृहांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. मात्र, या ...

आरमोरी : आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना इतर वसतिगृहांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळेल, याची शाश्वती नसते. मागास विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करावे, अशी मागणी आहे.

जारावंडीच्या टॉवरची रेंज वाढवा

एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे बीएसएनएलचे टॉवर आहे. मोबाईलची गरज लक्षात घेऊन या भागातील अनेक नागरिकांनी मोबाईलची खरेदी केली आहे. जारावंडी परिसरातील जवळपास १० ते १२ किमी अंतरावरील गावकऱ्यांनीही मोबाईल खरेदी केले आहेत. मात्र, त्या गावांमध्ये कव्हरेज राहत नाही. बीएसएनएलचे सर्वाधिक ग्राहक ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे याठिकाणी रेंज वाढविल्यास ग्राहकांना सेवा मिळण्याबरोबरच बीएसएनएलला उत्पन्नाचे साधनही उपलब्ध होईल. त्यामुळे येथील बीएसएनएल टॉवरची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. माेबाईल सेवा नसल्याने प्रशासकीय कामेे सुद्धा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

लाडज गावाचा विकास रखडला

देसाईगंज : अखंड चंद्रपूर जिल्हा असताना पावसाळ्यात बेटाचे स्वरूप येणाऱ्या ब्रह्मपुरी तालुक्यातील जुनी लाडज या गावाचे १९६१-६२ या साली तेव्हाच्या आरमोरी तालुक्यात व आताच्या देसाईगंज तालुक्यात आमगाव ग्रामपंचायतीमध्ये जुनी लाडज येथील ३९५ कुटुंबांना ९९९ हेक्टर जागेवर नवी लाडज येथे पुनर्वसित करण्यात आले. मात्र, मागील ६० वर्षांनंतर या पुनर्वसित गावांसाठी शासनाकडून येणाऱ्या विविध सोयी सवलती व योजनांच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करूनही अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

प्रवाशी निवारा दुर्लक्षितच

देसाईगंज : स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्राप्त निधीतून विसाेरा येथील वडसा, कुरखेडा या राज्यमार्ग ३१४ च्या कडेला प्रवाशांच्या साेयीसाठी प्रवाशी निवारा बांधण्यात आला. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या निवाऱ्याचे देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने या निवाऱ्याची दुर्दशा झाली आहे. पाेस्टर चिकटविल्याने देखणे रूप खराब झाले आहे. परिणामी प्रवाशी निवाऱ्याचे बाहेर उन्हातान्हात उभे राहून विश्रांती घेणे पसंत करतात. प्रशासनाने सदर प्रवाशी निवाऱ्याची दुरुस्ती करावी. रंगरंगाेटी करून याला नवे रूप द्यावे, अशी मागणी या भागातील प्रवाशांकडून हाेत आहे. देसाईगंज तालुक्याच्या ग्रामीण भागातील बऱ्याच प्रवाशी निवाऱ्यांची दुर्दशा झाली आहे. अनेक निवाऱ्यांची छत वादळाने उडून गेले आहे. भिंती तुटफूट झाल्या आहेत.