शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन आणेवारी पध्दत अडचणीची

By admin | Updated: November 23, 2014 23:19 IST

गडचिरोली जिल्ह्यात शेती सिंचनाच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही. निसर्गाच्या भरवशावर शेतकऱ्यांना शेती करावी लागत आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ या चक्रात शेतकरी अडकला आहे.

अहेरी : गडचिरोली जिल्ह्यात शेती सिंचनाच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही. निसर्गाच्या भरवशावर शेतकऱ्यांना शेती करावी लागत आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ या चक्रात शेतकरी अडकला आहे. अशा परिस्थितीत यावर्षी खरीप व रबी या दोनही हंगामात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतमालाचा उताराही कमी आला आहे. मात्र शासनाने दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा एकही तालुका नाही. ब्रिटिशकालीन आणेवारीची पध्दत या जिल्ह्यासाठी मारक ठरत आहे. त्यामुळे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित राहावे लागत आहे.या जिल्ह्यात १० मोठ्या व २५ लहान नद्या आहे. मात्र १९८० च्या वनकायद्यामुळे एकही सिंचन प्रकल्प पूर्ण झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच शेती करावी लागते. ९० टक्के शेतकऱ्यांकडे शेती सिंचनासाठी विहिरीची सोय नाही. जेथे सोय आहे. तेथे पाणी पुरवठा व्यवस्थित नाही. केवळ १५ ते २० मिनिटे शेती सिंचन करून पाणी संपूण जाते. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेवढ्याच वेळ सिंचन करावे लागते. बारमाही वाहणाऱ्या नद्या असूनही कायम सिंचन व्यवस्था निर्माण करता आलेली नाही. दरवर्षी शेतकरी सहकारी संस्थेमार्फत कर्ज घेऊन शेती करतो. मात्र लागलेल्या खर्चाएवढेही उत्पन्न त्याच्या हाती पडत नाही. यंदाही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस उशीरा आला, त्यामुळे पेरणी विलंबाने झाली. शेतीचा माल निघण्याच्यावेळी अकाली पाऊस येऊन धानपिकासह अन्य पिकांचे नुकसान झाले. काही भागात किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात धानपीक लागले नाही. काही शेतकऱ्यांना केवळ जनावरांसाठी तनीसच जमा करण्याची वेळ आली आहे. शासनाने अलिकडे राज्यातील टंचाई व दुष्काळ सदृष्य तालुके घोषीत केले आहे. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका नाही. अद्याप जिल्हा प्रशासनाने अंतिम आणेवारी ठरविलेली नाही, असे प्रशासन सांगत आहे. केवळ नजर अंदाज सर्व्हेक्षणाच्या आधारे आणेवारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना या जिल्ह्याला विशेष बाब म्हणून दुष्काळग्रस्त घोषीत करावे व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच नागपूर अधिवेशनात धानाला बोनसही नव्या सरकारने जाहीर करावा. या भागात शेती उत्पादन खरेदी-विक्रीची व्यवस्थासुध्दा शासनाने करावी, अशी मागणी आहे.