शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

धानाचे बोनस केवळ आश्वासनच!

By admin | Updated: August 5, 2014 23:27 IST

आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या धानाला शासनाने प्रति क्विंटल २०० रूपये बोनस जाहीर केले होते. मात्र चार महिन्याचा कालावधी लोटूनही बोनस मिळाले नाही.

गडचिरोली : आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या धानाला शासनाने प्रति क्विंटल २०० रूपये बोनस जाहीर केले होते. मात्र चार महिन्याचा कालावधी लोटूनही बोनस मिळाले नाही. त्यामुळे सदर बोनसची रक्कम केवळ आश्वासनच ठरते की काय, असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. धानाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी भाव दिल्या जातो. परिणामी शेतकऱ्यांना दरवर्षीच तोट्याचा सामना करावा लागतो. मागील वर्षी मुसळधार पावसामुळे धानाचे पीक वाहून गेले. काही शेतकऱ्यांना दोन वेळा धानाची रोवणी करावी लागली होती. दोनदा रोवणीचा खर्च उचलल्यानंतरही रोवणी उशीरा झाल्याने अपेक्षित उत्पादन झाले नाही. उत्पादन खर्च जास्त व उत्पादन कमी अशा गर्तेत शेतकरी सापडला असतानाच धान बाजारपेठेत विकण्यासाठी नेल्यानंतर त्या ठिकाणीसुध्दा इतर मालाच्या तुलनेत धानाला अत्यंत कमी भाव मिळत होता. त्यामुळे बाजारपेठेतही गेल्यानंतर शेतकऱ्याच्या पदरी निराशाच पडली होती. त्यामुळे धानाला जादा भाव देण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली होती. या मागणीचा विचार करीत शासनाने आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या धानाला शासनाने प्रती क्विंटल २०० रूपये बोनस जाहीर केला आहे. जिल्ह्यातील शेतकरी आदिवासी विकास महामंडळाच्या मार्फतीने चालविण्यात येणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थेत धान्य विकतात. या संस्थेकडे धान्य विकणाऱ्या शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळणे आवश्यक होते. मात्र चार महिन्याचा कालावधी लोटूनही बोनसची रक्कम मिळाली नाही. सदर रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार होती. मात्र असे काहीच झाले नाही. आदिवासी विविध कार्यकारी संस्थांकडे हजारो शेतकरी कोट्यवधी रूपयाचे धान्य विकले आहे. बोनसची रक्कम मिळाली असती तर या रकमेतून चालू हंगामाचा खर्च भागविणे शक्य झाले असते. चार महिने लोटूनही बोनसची रक्कम मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये सदर रक्कम मिळणार की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. शासनाने दिलेल्या आश्वासन पाळून आचारसंहिता लागण्यापूर्वी सदर रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी अशी मागणी भाजपचे शहर पदाधिकारी जीवन मेश्राम यांनी अधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे. (नगर प्रतिनिधी)