शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बोगस संस्थांनी उचललेली रक्कम थक्क करणारी

By admin | Updated: January 11, 2015 22:51 IST

एकीकडे महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नसल्याने त्यांच्या तुकड्या बंद पडत आहे. तर दुसरीकडे तांत्रिक शिक्षण देणाऱ्या या महाविद्यालयांकडे विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा प्रचंड महापूर आहे

गडचिरोली : एकीकडे महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नसल्याने त्यांच्या तुकड्या बंद पडत आहे. तर दुसरीकडे तांत्रिक शिक्षण देणाऱ्या या महाविद्यालयांकडे विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा प्रचंड महापूर आहे की, काय अशी स्थिती उचललेल्या शिष्यवृत्तीच्या रक्कमांवरून दिसून येत आहे. महाविद्यालयांची पाहणी करून तेथे एवढे विद्यार्थी आहेत काय याची शहानिशा न करता सरसकट शिष्यवृत्ती वितरणाचे काम आदिवासी विकास विभागाच्या अहेरी व भामरागड प्रकल्पाने केले, असे ‘लोकमत’ला मिळालेल्या या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.हिंदी राष्ट्रभाषा ज्ञानमंडळ वर्धाद्वारा संचालित महात्मा गांधी कॉलेज आलापल्लीने समाज कल्याण विभागाकडे १८० अनुसूचित जातीचे विद्यार्थी नोंदविले व १३९ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम उचल केली. तसेच आदिवासी विभागाकडे ११० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी नोंदणी करण्यात आली व ९७ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम उचलली. दोनही विभागाचे मिळून २३६ विद्यार्थ्यांचे प्रत्येकी ४० हजार प्रमाणे ९४ लाख ४० हजार रूपये एका महाविद्यालयाने उचलले आहे. असाच प्रकार अहेरीच्या विद्याभारती कॉलेज आॅफ अ‍ॅडव्हान्स स्टडीज या महाविद्यालयानेही केला आहे. गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न असलेले हे महाविद्यालय गुरूकूल शिक्षण संस्था वर्धाद्वारा संचालित चालविले जाते. या महाविद्यालयाने समाज कल्याण विभागाकडे अनुसूचित जातीचे १४८ विद्यार्थी नोंदविले व १३३ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम उचल केली. ४४ ओबीसी विद्यार्थ्यांची नोंदणी करून ३०, आठ एसबीसी विद्यार्थ्यांची नोंदणी करून पाच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम उचलली. त्यासोबतच १८ व्हीजेएनटी विद्यार्थ्यांची नोंदणी समाज कल्याण विभागात करून १५ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम उचलली. समाज कल्याण विभागाकडून २१७ पैकी १८३ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे ३२ लाख ९४ हजार रूपये उचल केले आहे. प्रती विद्यार्थी १८ हजार रूपये प्रमाणे या रक्कमा घेण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागाकडे या महाविद्यालयाने ५२ विद्यार्थ्यांची नोंदणी केली. मात्र तेथून शिष्यवृत्तीची रक्कम त्यांना मिळविता आली नाही. या संस्थेचे काम वर्धा येथील भाजपच्या एका आमदाराच्या मार्गदर्शनात वर्धाच्याच एक कार्यकर्ता करीत आहे, अशी माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे. एटापल्लीच्या सद्गुरू साई या राहुल बोम्मावार यांच्या महाविद्यालयाने समाज कल्याण विभागाकडे ४४ अनुसूचित जाती, १७५ ओबीसी, आठ एसबीसी व १६ व्हीजेएनटी अशा एकूण २४३ विद्यार्थ्यांची नोंदणी शिष्यवृत्तीसाठी केली व या सर्वांची शिष्यवृत्ती त्यांनी उचलली आहे. आदिवासी विकास विभागाकडे सन २०१३-१४ मध्ये १४१ विद्यार्थ्यांची नोंदणी करून १३९ विद्यार्थ्यांचे पैसे त्यांनी उचल केले. १ कोटी ५२ लाख ८० हजाराच्या घरात हा आकडा जातो. ही सर्व आकडेवारी पाहू जाता आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांचे संपूर्ण आशिर्वाद या संस्थाचालकांना असल्याने त्यांनी शासनाला कोट्यवधी रूपयाचा चूना अहेरी व भामरागड एकात्मिक प्रकल्पातही लावलेला आहे. त्यामुळे या घोटाळ्याची चौकशी सुरू होणे आवश्यक आहे. (जिल्हा प्रतिनिधी)