शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

धान खरेदीच्या मुद्द्यावरून भाजप उतरणार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:45 IST

गडचिरोली : शेतकऱ्यांकडील धान हमीभावाने खरेदी करण्याची मर्यादा एकरी ९.६० क्विंटलवरून एकरी २० क्विंटल करावी, तसेच वनहक्क पट्टेधारक आणि ...

गडचिरोली : शेतकऱ्यांकडील धान हमीभावाने खरेदी करण्याची मर्यादा एकरी ९.६० क्विंटलवरून एकरी २० क्विंटल करावी, तसेच वनहक्क पट्टेधारक आणि वर्षानुवर्षे अतिक्रमित जमीन कसणाऱ्या काबिल कास्तकारांकडीलही धानाची खरेदी करावी अशी मागणी भाजपने केली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास १ जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने सर्व खरेदी केंद्रांवर आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आले.यावेळी आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांनी यावेळी जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडली. विशेष म्हणजे लगतच्या गोंदिया, भंडारा जिल्ह्यात धान खरेदीची मर्यादा जास्त असताना गडचिरोली जिल्ह्यावरच हा अन्याय का? असा प्रश्न या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. धान केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी नवीन खरेदी केंद्र सुरू करावे आणि खरेदीच्या प्रक्रियेला गती देऊन शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

(बॉक्स)

पैसेवारी गावनिहाय, पण खरेदीचा नियम सारखा

यावर्षी धानाचा उतारा कमी येणार असल्याचे प्रशासनाच्या पैसेवारी अहवालात म्हटले आहे. पण ही पैसेवारी गावनिहाय वेगवेगळी आहे, मग खरेदीची मर्यादा मात्र सर्वांना सारखीच लागू करणे जास्त उत्पन्न आलेल्या शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. पैसेवारी कमी असेल तर पीक विम्याचा लाभ द्यावा, पण तेही मिळाले नाही, अशी व्यथा यावेळी पदाधिकाऱ्यांनी मांडली.