शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: लोकमत इम्पॅक्ट: नागरिकांना दिलासा; गोरेगाव ओबेरॉय मॉल येथील पाणी अतिरिक्त पंप लावून काढले
2
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
3
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
4
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
5
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
6
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
7
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
8
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
9
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
10
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
11
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
12
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
13
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
14
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
15
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
16
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
17
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
18
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
19
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
20
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड

भाजप व काँग्रेसलाही बंडखोरीचे ग्रहण

By admin | Updated: October 17, 2015 01:59 IST

कुरखेडा नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरिता मोठे घमासान सुरू झाले.

कुरखेडा : कुरखेडा नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरिता मोठे घमासान सुरू झाले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगर पंचायती तीन प्रभागात तर काँग्रेसकडून दोन प्रभागात दोन-दोन उमेदवारांनी आपली दावेदारी सादर करीत नामांकन दाखल केले आहे. त्यामुळे कुरखेडा नगर पंचायतीत भाजप व काँग्रेस पक्षात बंडखोरी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. १७ सदस्यीय कुरखेडा नगर पंचायत निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या चारही प्रमुख पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. शिवसेनेचे जिल्हा नेतृत्व हे स्थानिक असल्याने त्यांच्या निर्णयाला कोणतेच आव्हान नव्हते. त्यामुळे शिवसेनेत तिकीट वाटपात असंतोष निर्माण झाला नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीचे मोजकेच दावेदार असल्याने पक्ष नेतृत्वाला तिकीट वाटपात काही अडचण आली नाही. राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षात सध्या एकजुटीचे वातावरण आहे. मात्र भारतीय जनता पार्टी व काँग्रेस याला अपवाद आहे. भाजपातर्फे प्रभाग क्र. १ मध्ये गणपत सोनकुसरे व रामहरी उगले तर प्रभाग क्रमांक ७ मधून अ‍ॅड. उमेश वालदे व मुन्ना सहारे, प्रभाग क्रमांक ९ मध्ये मनीष शर्मा व वामदेव सोनकुसरे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारीकरिता दावेदारी सादर केली. काँग्रेस पक्षातर्फे प्रभाग क्रमांक १३ मध्ये जयश्री धाबेकर व खान रजिया बानो तर प्रभाग क्र. १४ मध्ये विमल हलामी व शाहेदा मुगल यांनी दावेदारी सादर केली. दोन्ही पक्षाचे सर्व दावेदार उमेदवार पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते असल्याने पक्षश्रेष्ठीपुढे नगर पंचायत निवडणुकीत गंभीर पेच निर्माण झाला होता. अखेरच्या क्षणापर्यंत अनिर्णयाची परिस्थिती होती. १२ आॅक्टोबर ही पक्षाचा एबी फॉर्म सादर करण्याची अंतिम मुदत होती. अखेर निर्णय घेत दोन्ही पक्षाच्या पुढाऱ्यांनी पक्षाचा एबी फॉर्म उमेदवाराच्या हातात न देता थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले. मात्र ज्यांचा दावा नाकारण्यात आला त्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांना पक्षाच्या या निर्णयाची कुणकुण लागली असल्याने सध्या कुरखेडाच्या राजकीय वर्तुळात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. नामांकन अर्ज परत घेण्याची मुदत ही २३ आॅक्टोबरपर्यंत आहे. या कालावधीत असंतुष्टांची मनधरणी करण्याचा पक्ष नेत्यांकडून जोरदार प्रयत्न होत आहे. मनधरणी करण्याच्या कामात भाजप नेतृतव अधिक सक्रीय असल्याने काही प्रभागात बंडखोरी टाळण्यात भाजप नेत्यांना यश येण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेस पक्षाच्या या निर्णयामुळे दोन्ही प्रभागात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून या प्रभागात काँग्रेसमध्ये बंडखोरी अटळ असल्याची जोरदार चर्चा शहरात आहे. (तालुका प्रतिनिधी)