शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

भाजप व काँग्रेसलाही बंडखोरीचे ग्रहण

By admin | Updated: October 17, 2015 01:59 IST

कुरखेडा नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरिता मोठे घमासान सुरू झाले.

कुरखेडा : कुरखेडा नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरिता मोठे घमासान सुरू झाले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगर पंचायती तीन प्रभागात तर काँग्रेसकडून दोन प्रभागात दोन-दोन उमेदवारांनी आपली दावेदारी सादर करीत नामांकन दाखल केले आहे. त्यामुळे कुरखेडा नगर पंचायतीत भाजप व काँग्रेस पक्षात बंडखोरी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. १७ सदस्यीय कुरखेडा नगर पंचायत निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या चारही प्रमुख पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. शिवसेनेचे जिल्हा नेतृत्व हे स्थानिक असल्याने त्यांच्या निर्णयाला कोणतेच आव्हान नव्हते. त्यामुळे शिवसेनेत तिकीट वाटपात असंतोष निर्माण झाला नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीचे मोजकेच दावेदार असल्याने पक्ष नेतृत्वाला तिकीट वाटपात काही अडचण आली नाही. राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षात सध्या एकजुटीचे वातावरण आहे. मात्र भारतीय जनता पार्टी व काँग्रेस याला अपवाद आहे. भाजपातर्फे प्रभाग क्र. १ मध्ये गणपत सोनकुसरे व रामहरी उगले तर प्रभाग क्रमांक ७ मधून अ‍ॅड. उमेश वालदे व मुन्ना सहारे, प्रभाग क्रमांक ९ मध्ये मनीष शर्मा व वामदेव सोनकुसरे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारीकरिता दावेदारी सादर केली. काँग्रेस पक्षातर्फे प्रभाग क्रमांक १३ मध्ये जयश्री धाबेकर व खान रजिया बानो तर प्रभाग क्र. १४ मध्ये विमल हलामी व शाहेदा मुगल यांनी दावेदारी सादर केली. दोन्ही पक्षाचे सर्व दावेदार उमेदवार पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते असल्याने पक्षश्रेष्ठीपुढे नगर पंचायत निवडणुकीत गंभीर पेच निर्माण झाला होता. अखेरच्या क्षणापर्यंत अनिर्णयाची परिस्थिती होती. १२ आॅक्टोबर ही पक्षाचा एबी फॉर्म सादर करण्याची अंतिम मुदत होती. अखेर निर्णय घेत दोन्ही पक्षाच्या पुढाऱ्यांनी पक्षाचा एबी फॉर्म उमेदवाराच्या हातात न देता थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले. मात्र ज्यांचा दावा नाकारण्यात आला त्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांना पक्षाच्या या निर्णयाची कुणकुण लागली असल्याने सध्या कुरखेडाच्या राजकीय वर्तुळात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. नामांकन अर्ज परत घेण्याची मुदत ही २३ आॅक्टोबरपर्यंत आहे. या कालावधीत असंतुष्टांची मनधरणी करण्याचा पक्ष नेत्यांकडून जोरदार प्रयत्न होत आहे. मनधरणी करण्याच्या कामात भाजप नेतृतव अधिक सक्रीय असल्याने काही प्रभागात बंडखोरी टाळण्यात भाजप नेत्यांना यश येण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेस पक्षाच्या या निर्णयामुळे दोन्ही प्रभागात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून या प्रभागात काँग्रेसमध्ये बंडखोरी अटळ असल्याची जोरदार चर्चा शहरात आहे. (तालुका प्रतिनिधी)