शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

भाजप व काँग्रेसलाही बंडखोरीचे ग्रहण

By admin | Updated: October 17, 2015 01:59 IST

कुरखेडा नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरिता मोठे घमासान सुरू झाले.

कुरखेडा : कुरखेडा नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरिता मोठे घमासान सुरू झाले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगर पंचायती तीन प्रभागात तर काँग्रेसकडून दोन प्रभागात दोन-दोन उमेदवारांनी आपली दावेदारी सादर करीत नामांकन दाखल केले आहे. त्यामुळे कुरखेडा नगर पंचायतीत भाजप व काँग्रेस पक्षात बंडखोरी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. १७ सदस्यीय कुरखेडा नगर पंचायत निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या चारही प्रमुख पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. शिवसेनेचे जिल्हा नेतृत्व हे स्थानिक असल्याने त्यांच्या निर्णयाला कोणतेच आव्हान नव्हते. त्यामुळे शिवसेनेत तिकीट वाटपात असंतोष निर्माण झाला नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीचे मोजकेच दावेदार असल्याने पक्ष नेतृत्वाला तिकीट वाटपात काही अडचण आली नाही. राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षात सध्या एकजुटीचे वातावरण आहे. मात्र भारतीय जनता पार्टी व काँग्रेस याला अपवाद आहे. भाजपातर्फे प्रभाग क्र. १ मध्ये गणपत सोनकुसरे व रामहरी उगले तर प्रभाग क्रमांक ७ मधून अ‍ॅड. उमेश वालदे व मुन्ना सहारे, प्रभाग क्रमांक ९ मध्ये मनीष शर्मा व वामदेव सोनकुसरे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारीकरिता दावेदारी सादर केली. काँग्रेस पक्षातर्फे प्रभाग क्रमांक १३ मध्ये जयश्री धाबेकर व खान रजिया बानो तर प्रभाग क्र. १४ मध्ये विमल हलामी व शाहेदा मुगल यांनी दावेदारी सादर केली. दोन्ही पक्षाचे सर्व दावेदार उमेदवार पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते असल्याने पक्षश्रेष्ठीपुढे नगर पंचायत निवडणुकीत गंभीर पेच निर्माण झाला होता. अखेरच्या क्षणापर्यंत अनिर्णयाची परिस्थिती होती. १२ आॅक्टोबर ही पक्षाचा एबी फॉर्म सादर करण्याची अंतिम मुदत होती. अखेर निर्णय घेत दोन्ही पक्षाच्या पुढाऱ्यांनी पक्षाचा एबी फॉर्म उमेदवाराच्या हातात न देता थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले. मात्र ज्यांचा दावा नाकारण्यात आला त्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांना पक्षाच्या या निर्णयाची कुणकुण लागली असल्याने सध्या कुरखेडाच्या राजकीय वर्तुळात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. नामांकन अर्ज परत घेण्याची मुदत ही २३ आॅक्टोबरपर्यंत आहे. या कालावधीत असंतुष्टांची मनधरणी करण्याचा पक्ष नेत्यांकडून जोरदार प्रयत्न होत आहे. मनधरणी करण्याच्या कामात भाजप नेतृतव अधिक सक्रीय असल्याने काही प्रभागात बंडखोरी टाळण्यात भाजप नेत्यांना यश येण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेस पक्षाच्या या निर्णयामुळे दोन्ही प्रभागात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून या प्रभागात काँग्रेसमध्ये बंडखोरी अटळ असल्याची जोरदार चर्चा शहरात आहे. (तालुका प्रतिनिधी)