शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

भाजपलाही अनपेक्षित मिळाला विजय

By admin | Updated: May 17, 2014 00:14 IST

१0 एप्रिलला मतदान झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाला गडचिरोली-चिमूर मतदार संघातून विजय मिळेल, अशी पूर्ण आशा होती. मात्र हा विजय २ लाख ३६ हजार ९७0 मतांचा असेल

गडचिरोली : १0 एप्रिलला मतदान झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाला गडचिरोली-चिमूर मतदार संघातून विजय मिळेल, अशी पूर्ण आशा होती. मात्र हा विजय २ लाख ३६ हजार ९७0 मतांचा असेल, हे मात्र अपेक्षीत नव्हते. हा विजय लाखाच्या फरकाने होईल, असा सट्टाबाजारासह राजकीय क्षेत्रातील विविध पक्षाच्या जाणकारांचा अंदाज होता. गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रात भाजपला प्रत्येकी ३0 हजाराची आघाडी मिळेल व जिल्ह्याबाहेरील मतदार संघात किमान ५ ते १0 हजाराचे मताधिक्य प्रत्येक विधानसभा क्षेत्रात राहिल, असे जाणकार मानत होते. त्यामुळे भाजपच्या व काँग्रेसच्या विजयाचा अंतर हे सव्वालाखाच्या आसपास अंतरावर राहिल, हे मात्र अनेकांना वाटत होते. परंतु आज पहिल्या फेरीपासूनच मतमोजणीला सुरूवात झाल्यावर अशोक नेते यांच्या विजयाचा झंझावात सुरू झाला. पहिल्या फेरीत ११ हजार ८३९, दुसर्‍या फेरीत २0 हजार ७३६, तिसर्‍या फेरीत ३३ हजार ९७७ मतांची आघाडी मिळाली. त्यानंतर ही आघाडी प्रत्येक फेरीत ५ ते १0 हजाराच्या फरकात चालत राहिली. कुठल्याही फेरीत काँग्रेस उमेदवार आघाडी घेऊ शकले नाही. काँग्रेसलाही निवडणुकीच्या मतदानानंतर गडचिरोली जिल्ह्यातील तीन मतदार संघांमध्ये आपल्याला आघाडी राहणार नाही, याची जाणीव झालेली होती. मात्र चिमूर आणि आमगाव या दोन विधानसभा क्षेत्रात आपण निश्‍चितपणे आघाडी घेऊ, अशी अपेक्षा होती. मात्र गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजपने ६९ हजार मतांची घेतलेली आघाडी काँग्रेसला प्रचंड फटका देणारी ठरली. या ठिकाणी भाजपला मिळालेला कौल हा काँग्रेससाठी सर्वात मोठा दणका होता व या कौलामुळे भाजपला २ लाखापर्यंतच्या मताधिक्याची मजल गाठता आली. गडचिरोली जिल्ह्यात आजवरच्या मोठय़ा निवडणुकांमधला हा मताधिक्याचा उच्चांक आहे. पुर्णत: आदिवासीबहुल नसलेल्या गडचिरोली विधानसभा क्षेत्रात गैर आदिवासी मतदारांनी या निवडणुकीत काँग्रेसकडे पूर्ण पाठ फिरविल्याने हा निकाल काँग्रेससाठी धक्कादायक ठरला. (प्रतिनिधी)