शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

डिजिटल इंडियातून रोजगार निर्मितीस मोठा वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2016 02:03 IST

गडचिरोली जिल्ह्यात उद्योगधंद्यांची वाणवा असल्याने बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे.

कुलगुरूंचे प्रतिपादन : गडचिरोलीत डिजिटल इंडियावर रासेयो स्वयंसेवकांची कार्यशाळागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात उद्योगधंद्यांची वाणवा असल्याने बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे. तसेच जिल्ह्यात अनेक समस्या कायम आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या जलद विकासासाठी डिजीटल इंडियाची गरज असून डिजीटल इंडिया संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यात रोजगार निर्मितीस मोठा वाव आहे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत गोंडवाना विद्यापीठातर्फे डिजीटल इंडियावरील एकदिवसीय कार्यशाळा स्थानिक पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कलादालनात शुक्रवारी पार पडली. या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोेलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डॉ. के. व्ही. खादरीनरसिंमया, डिजीटल इंडियाचे प्रतिनिधी मनीष अनावाडीया, गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव रोकडे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना कुलगुरू डॉ. कल्याणकर म्हणाले, डिजीटल इंडियाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरातील प्रत्येक खेडेगाव शहरांसोबत जोडल्या गेले पाहिजे, ग्रामीण भागातही तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे, तेव्हाच संपूर्ण भारत सक्षम होईल, असे त्यांनी सांगितले. डॉ. के. व्ही. खादरीनरसिंमया म्हणाले, डिजीटल इंडियाच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक या संकल्पनेचा प्रचार व प्रसार गावापर्यंत करतील, यातून गावपातळीवर डिजीटल इंडिया ही संकल्पना पोहोचण्यास मदत होईल, डिजीटल इंडियाच्या संकल्पनेतून विकसित तंत्रज्ञानातून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी डिजीटल इंडियाचे प्रतिनिधी मनीष अनावाडीया यांनी सदर संकल्पनेतील तांत्रिक बाबी स्पष्ट करून सविस्तर माहिती दिली. उद्घाटनीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. रोकडे, संचालन रासेयो प्रभारी डॉ. नरेश मडावी यांनी केले तर आभार डॉ. प्रिया गेडाम यांनी मानले. या कार्यशाळेत गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत विविध महाविद्यालयातील २०० रासेयो स्वयंसेवक तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, प्रा. डॉ. मिलींद जांभुळकर, प्रा. पिसे, डॉ. शर्मा, प्रा.दरेकार यांच्यासह २० कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे ३० अधिकारी सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. नंदकिशोर माने, प्रा. कागे, प्रा. बागडे, प्रा. गचके, प्रा. मसराम, प्रा. बोधाने, प्रा. गिरडे, प्रा. प्रीती काळे यांनी सहकार्य केले. या कार्यशाळेदरम्यान रासेयो स्वयंसेवक विद्यार्थ्यांसाठी प्रहसन (पथनाट्य), पोस्टर, वक्तृत्व व प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आल्या. (स्थानिक प्रतिनिधी)