शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

सामूहिक वनहक्क दाव्यात भामरागड तालुक्याची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:26 IST

भामरागड तालुका हा मुख्यत्वे गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी, मागासलेला व घनदाट जंगलाने व्याप्त तालुका म्हणून ओळखला जातो. हा तालुका अतिदुर्गम ...

भामरागड तालुका हा मुख्यत्वे गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी, मागासलेला व घनदाट जंगलाने व्याप्त तालुका म्हणून ओळखला जातो. हा तालुका अतिदुर्गम आणि डोंगरदऱ्यांनी व्याप्त व अविकसित आहे. हा तालुका बांबूकरिता प्रसिद्धद आहे. तालुक्यातील लोकांचा व्यवसाय शेती असून, जंगलातील वनोपजावरदेखील त्यांचे जीवन अवलंबून आहे. तालुक्यात एकूण १२८ गावे असून, त्यापैकी अतिदुर्गम व अतिमागास बिनागुंडा, कुव्वाकोडी पेरमलभट्टी, दामनमर्का, पुंगासूर, तुर्रेमर्का व फोदेवाडा या गावांतील लोक मागील कित्येक वर्षांपासून सामूहिक वनहक्क मिळण्यापासून वंचित होते; परंतु जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली भामरागडचे तहसीलदार अनमोल कांबळे, तसेच त्यांच्या अधिनस्थ तलाठी वृषभ हिचामी, सर्व कोतवाल यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण केली. स्थानिक कोतवाल रायधर बाकडा, मारुती दूर्वा, चुक्कू उसेंडी, सत्तू पोदाळी, दिनकर उसेंडी, शंकर मडावी, आकाश काळंगा, तसेच वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चौव्हाण व त्यांचे अधिनस्थ क्षेत्रपाल व वनरक्षकांच्या प्रयत्नांमुळे या गावातील लोकांना सामूहिक वनहक्क मिळविण्याच्या प्रक्रियेत मदत मिळाली.

सदर सामूहिक वनहक्क दावे लवकरात लवकर मंजूर होण्याकरिता जिल्हाधिकारी दीपक सिंगला व उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांनी जिल्हास्तरीय वनहक्क समितीमार्फत सदर वनहक्क दावे त्वरित मंजूर होण्याकरिता विशेष प्रयत्न केले. आता भामरागड तालुका १०० टक्के सामूहिक वनहक्क दावे मंजूर झालेला तालुका म्हणून ओळखला जाईल.

शासनाच्या वतीने जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडून सामूहिक वनहक्क मान्य करण्यात आलेल्या गावांतील लोकांचे उपविभागीय अधिकारी मनुजकुमार जिंदाल यांच्या अध्यक्षतेखाली मौजा बिनागुंडा याठिकाणी शिबिर घेण्यात आले. त्या शिबिरात मौजा बिनागुंडा, कुव्वाकोडी, पेरमलभट्टी, दामनमर्का, पुंगासूर, तुर्रेमर्का व फोदेवाडा गावांतील लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

उपस्थित नागरिकांनी आपापल्या गावातील रस्ते, आरोग्य व शिक्षणाशी संबंधित समस्या मांडून त्या सोडविण्याची विनंती केली. त्यानुसार बिनागुंडा येथील विनोबा शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन त्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन एसडीओ जिंदल यांनी यावेळी दिले.

(बॉक्स)

रोजगाराला मिळणार चालना

- सामूहिक वनहक्क न मिळाल्यामुळे आजपर्यंत लोक बांबू कटाई करू शकत नव्हते. त्यामुळे गावातील लोकांना बाराही महिने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नव्हत्या; परंतु सामूहिक वनहक्क मिळाल्यामुळे बांबू कटाई शक्य होईल व रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन गावाच्या विकासाला चालना मिळणार आहे.

- यावेळी उपविभागीय अधिकारी मनुजकुमार जिंदल यांनी सामूहिक वनहक्काचे व्यवस्थापन, संरक्षण, पुनर्निर्माण व संवर्धन करण्याकरिता नियोजनबद्ध पद्धतीचा अवलंब करावा व ग्रामसभेचे बळकटीकरण व्हावे याबाबत मार्गदर्शन केलेे.