शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

सव्वा लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा लाभ

By admin | Updated: March 24, 2017 01:03 IST

२०१७-१८ च्या शैक्षणिक वर्षात पूर्वी प्रमाणेच १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे.

शिक्षण विभागाची तयारी : सर्व शिक्षा अभियानचा उपक्रमगडचिरोली : २०१७-१८ च्या शैक्षणिक वर्षात पूर्वी प्रमाणेच १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. जिल्हाभरात दोन हजार शाळा आहेत. या शाळेतील १ लाख २० हजार ४२४ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ दिला जाणार आहे. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत १ ते ८ पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. एक महिन्यापूर्वी पाठ्यपुस्तकांचे वितरण न करता पाठ्यपुस्तकांची रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे बँक खाते काढण्याचे निर्देश शिक्षकांना देण्यात आले होते. मात्र दोन महिन्याच्या कालावधीत सर्वच विद्यार्थ्यांचे बँक खाते काढणे शक्य होणार नाही. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट लाभ योजनेतून पाठ्यपुस्तक योजनेला वगळले व पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्याचा निर्णय १५ दिवसांपूर्वी घेतला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावेत, यासाठी शिक्षण विभागाच्या मार्फतीने नियोजन केले जात आहे. पाठ्यपुस्तक हे वितरण संबंधिच्या सर्व स्पष्ट सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मुख्याध्यापकांकडून लाभार्थी विद्यार्थ्यांची यादी मागविण्यात आली असून ती यादी शासनाकडे सादर करण्यात आली आहे. त्यानुसार २०१६-१७ या वर्षात मराठी माध्यमाच्या १ लाख १४ हजार ११५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. इंग्रजी माध्यमांच्या गडचिरोली जिल्ह्यात एकूण १२ आश्रमशाळा आहेत. यामध्ये एकूण ४५६ विद्यार्थी आहेत. हिंदी माध्यमांच्या १४ शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण २ हजार ६५८ विद्यार्थी आहेत. उर्दू माध्यमाच्या पाच शाळा आहेत. यामध्ये एकूण २५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून पाठ्यपुस्तके उपलब्ध होणार आहेत. पुढील वर्षीपासून खात्यात जमा होईल रक्कमथेट लाभ योजनेंतर्गत पाठ्यपुस्तकांचे वितरण न करता तेवढी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र याला शिक्षण विभागातूनच प्रचंड विरोध होऊ लागला. विद्यार्थ्यांचे बँक खाते निघाले नाही तर तो विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल. त्यामुळे विद्यार्थ्याला पुस्तकांविनाच शाळेमध्ये यावे लागेल. त्याचबरोबर एखाद्या पालकाने पाठ्यपुस्तकांचे पैसे बँकेतून काढून इतर कामांवर खर्च केल्यास पैसे मिळूनही विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहण्याचा धोका होता. मे महिन्यापर्यंत सर्वच विद्यार्थ्यांचे बँक खाते काढणे व त्याची माहिती शिक्षण विभागाला देणे अशक्य असल्यानेही थेट लाभ योजनेतून पाठ्यपुस्तके वगळण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.