शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या पदरात पहिल्यांदाच लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:38 IST

गडचिराेली : पीकविमा काढूनही लाभ मिळत नसल्याने पीकविमा हे शेतकऱ्यांना लुटण्याचे साधन आहे, असा आराेप शेतकऱ्यांकडून हाेत हाेता. मात्र, ...

गडचिराेली : पीकविमा काढूनही लाभ मिळत नसल्याने पीकविमा हे शेतकऱ्यांना लुटण्याचे साधन आहे, असा आराेप शेतकऱ्यांकडून हाेत हाेता. मात्र, गतवर्षी आलेल्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले. त्यात ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला हाेता, त्यांना विमा कंपनीमार्फत नुकसानभरपाई देण्यात आली आहे. या पैशांमुळे शेतकऱ्यांना थाेडा आधार मिळाला आहे.

शेतीचे नैसर्गिक किंवा इतर कारणांमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्याला लाभ मिळावा, यासाठी केंद्र शासनामार्फत ‘प्रधानमंत्री पीकविमा याेजना’ राबविली जाते. या याेजनेंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास ७०० रूपये भरून पीकविमा काढता येतो. मात्र, पीकविमा काढूनही नुकसान हाेऊनसुद्धा विमा कंपनी नुकसानभरपाई देत नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना असल्याने शेतकरी विमा काढण्यास तयार हाेत नाहीत. विमा कंपन्यांना श्रीमंत करण्याचे हे माध्यम आहे, असा आराेप शेतकऱ्यांकडून हाेतो. अनेक शेतकरी स्वत:हून विमाही काढत नाहीत. पीककर्ज देणाऱ्या बॅंका पीकविम्याची रक्कम वजा करत असल्याने पीकविमा काढण्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय राहत नाही. त्यामुळे पीककर्ज काढणारेच शेतकरी पीकविमा काढतात.

गतवर्षीच्या पावसाळ्यात गडचिराेली जिल्ह्यात वैनगंगा नदीला महापूर आला. या महापुराचा फटका अर्ध्या जिल्ह्याला बसला. त्यामुळे अनेक शेतकरी नुकसानभरपाईसाठी पात्र ठरले. यावर्षी पहिल्यांदाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रीमिअमपेक्षा अधिक रक्क्म कंपनीला विमा म्हणून द्यावी लागली आहे. २०२०-२१च्या खरीप हंगामात ३७ हजार १८४ शेतकऱ्यांनी ३० हजार ४६६ हेक्टरचा विमा काढला हाेता. त्यासाठी १ काेटी ९८ लाख रूपये प्रीमिअम भरला हाेता. विमा कंपनीने १४ हजार ४२७ शेतकऱ्यांना ७ काेटी २२ लाख रूपये नुकसानभरपाई दिली आहे.

बाॅक्स

नुकसान २० हजारांचे मिळाले २ हजार

गतवर्षी वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण धान पीक नष्ट झाले. एका एकरात जवळपास २० हजार रूपयांचे धान हाेतात. पुरामुळे शेरभरही धान झाले नाहीत. जेवढ्या धान पिकाचे नुकसान झाले, तेवढे पैसे मिळणे अपेक्षित हाेते. मात्र, काही शेतकऱ्यांना एकरी २ हजार रूपये मिळाले. काही शेतकऱ्यांना तर त्यापेक्षाही कमी पैसे मिळाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजीचा सूर दिसून येत आहे. संपूर्ण नुकसानभरपाई मिळत नसेल तर विम्याचा काय फायदा, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

काेट

पीकविमा याेजना ही शेतकऱ्यांची लूट करणारी याेजना आहे. शेतकरी स्वत:हून पीकविमा काढतच नाही. पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यालाही सरकारने विमा काढणे सक्तीचे केलेले नाही. मात्र, स्वत:चे ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी बॅंका पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यातून पीकविम्याची रक्कम वसूल करतात, हे चुकीचे आहे.

दयानंद तरारे, शेतकरी

गतवर्षी आलेल्या पुरामुळे ३ एकरात शेरभरही धान झाले नाहीत. तीन एकरात मी ९० हजार रूपयांचे धान पिकवताे. माझ्या तीनही एकरातील धानपीक वाहून गेले. तीनही एकरचा पीकविमा काढला असल्याने विमा कंपनीकडून ९० हजार रूपये मिळणे अपेक्षित हाेते. मात्र, मला केवळ ९ हजार रूपये मिळाले आहेत. हा आमच्यावर हाेत असलेला अन्याय नाही का?

अतुल वाघमारे, शेतकरी

स्तंभालेख

पीकविमा काढलेले शेतकरी - ३७,१८४

प्रीमिअमची रक्कम - १ काेटी ९८ लाख

पीकविमा काढलेले क्षेत्र (हे.) - ३०,४६६

एकूण मंजूर पीकविमा रक्कम - ७ काेटी २२ लाख

शेतकऱ्यांना लाभ - १४,४२७

विमा रकमेचे वितरण - ७ काेटी २२ लाख