शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

खरीप हंगामाच्या बाह्य मशागतीला सुरूवात

By admin | Updated: June 5, 2017 00:38 IST

यंदाच्या खरीप हंगामात चांगला पाऊस पडणार अशी शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही चांगल्या पावसाची आशा आहे.

चांगल्या पर्जन्याची शेतकऱ्यांना आशा : ग्रामीण भागात पाळीवर माती टाकण्याच्या कामास प्रारंभलोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : यंदाच्या खरीप हंगामात चांगला पाऊस पडणार अशी शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही चांगल्या पावसाची आशा आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात चार दिवसापूर्वी झालेल्या हलक्याशा सरीनंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या बाह्य मशागतीच्या कामास प्रारंभ केला आहे. वैरागड भागासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक शेतकरी व मजूर बाह्य मशागतीचे कामे करीत असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरीप हंगामातील पिकांचा पेरा वाढणार असून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शाश्वत शेती तसेच विविध योजना व उपक्रम कार्यान्वित करण्यात आले आहे. याशिवाय कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पीक लागवडीबाबत मार्गदर्शन मिळत असल्याने शेतकऱ्यांनी पीक लागवडीची नवी पध्दत गतवर्षीपासून अमलात आणली आहे. यंदा तूळ, मूग, उडीद आणि रबी हंगामातील पिकातही वाढ होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातील तूर पिकामध्ये ग्रामीण भागात वाढ झाली आहे. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या धानपट्ट्यातील जिल्ह्यामध्ये शेताच्या पाळीवर तूर पीक घेण्याची पध्दत आहे. सदर तूर पिकासाठी सध्या पाळीवर माती टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. काही शेतकरी शेतातील कचरा जाळणे, धसकट उपटणे व पाळीवरील कचरा जाळण्याचे काम करीत आहे. शेत शिवार परिसरात लगबग वाढली आहे.अनेक शेतकरी स्वत:कडील बियाणे वापरणारजिल्हाभरातील कृषी केंद्रात धान, तूर, मूग, उडीद व इतर पिकांच्या विविध वाणांचे बियाणे कृषी केंद्रात उपलब्ध झाले आहेत. मात्र बहुतांश कंपन्यांचे बियाणे महागडी असल्याने अनेक शेतकरी आपल्या घरीच बीज प्रक्रिया करून स्वत:कडील बियाणे पेरणार आहेत. त्या दृष्टीने अनेक शेतकऱ्यांनी तयारी चालविली आहे.