शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

बुद्धांच्या तत्त्वांशी सुसंगत रहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 23:46 IST

जगाला प्रज्ञा, शिल आणि करुणेची शिकवण देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे समाजाचे प्रेरणास्त्रोत आहेत. २९ एप्रिल १९५४ रोजी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दीक्षाभूमीवर असलेल्या वास्तुचे नुतनीकरण, परिसराचे सुशोभिकरण, स्वच्छतागृहाचे बांधकाम या कामांचा शुभारंभ करताना मला अत्यानंद होत आहे.

ठळक मुद्देराजकुमार बडोले यांचे प्रतिपादन : दीक्षाभूमी परिसर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : जगाला प्रज्ञा, शिल आणि करुणेची शिकवण देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे समाजाचे प्रेरणास्त्रोत आहेत. २९ एप्रिल १९५४ रोजी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दीक्षाभूमीवर असलेल्या वास्तुचे नुतनीकरण, परिसराचे सुशोभिकरण, स्वच्छतागृहाचे बांधकाम या कामांचा शुभारंभ करताना मला अत्यानंद होत आहे. परंतु समाजाने बाबासाहेबांचे विचार जगताना बुध्दांच्याही तत्वांशी सुसंगत रहावे, असे विचार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.देसाईगंज येथील दीक्षाभूमी परिसराच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ गुरूवारी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, आमदार कृष्णा गजबे, नगराध्यक्ष शालुताई दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, नगर परिषद गटनेते किसन नागदेवे, प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिद्धार्थ गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रकाश बुब, महिला समिती अध्यक्ष कविता मेश्राम, उपाध्यक्ष शामला राऊत, सचिव ममता जांभूळकर, पंढरी गजभीये, श्रावण बोदेले, नगरसेवक गणवीर, राहूल अन्वीकर, अनिरूद्ध वनकर, भंते बुद्धशरण,गोंदिया पंचायत समितीचे सभापती ढेंगे, राजू जेजाणी, सहाय्यक आयुक्त विनोद मोहतूरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना बडोले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून शासनाने बहूप्रतिक्षीत असलेल्या या दीक्षाभूमी परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी ५४ लाख २० हजार रुपये मंजूर झाले. कामाचा शुभारंभ होत आहे. कामाचा दर्जा, सौंदर्यीकरण उत्तमरित्या होईल याची बांधकाम विभागाने कटाक्षाने लक्ष घालावे. याच दिक्षा भुमीवर पाच कोटी रुपयांची एक विशाल वास्तु उभी राहावी याकरीता प्रस्ताव सादर करावा असे निर्देश दिले. या प्रस्तावास मंजुरी प्रदान करण्यात येईल असेही आश्वासन यावेळी बडोले यांनी दिले. या भूमीचा विकास झाला पाहिजे अशी माझी इच्छा होती आणि आज ती फलद्रृप झाली. संपुर्ण राज्यात अशा ऐतिहासिक वास्तुच्या, स्थळाच्या विकासासाठी मोठया प्रमाणात निधी वितरीत करण्यात आला आहे. सर्व स्मारके वाचनालये व्हावीत. युवकांच्या ठिकाणी ज्ञानाचा भांडार तयार होऊन आपला देश सर्वांगिण विकसीत व्हावा याकरीता वाचनालयाची अत्यंत आवश्यकता आहे असे ते म्हणाले.पालकमंत्री आत्राम आपल्या भाषणात म्हणाले, बाबासाहेबांनी समता, स्वातंत्र्य व बंधुत्वाची घटना आपल्या देशाला दिली. या संविधानामुळेच लोकशाही सुदृढ होऊन देश सुजलाम सुफलाम होईल. बाबासाहेबांचे विचार सदैव प्रेरणादायी राहणार आहेत. सामाजिक न्याय विभागाने या दीक्षाभुमीवर एक विशाल वास्तु तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा असे ते म्हणाले. जगातील शालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधान समाविष्ट केलेला आहे. यावर सातत्याने आकलन केले जाते, असे पालकमंत्री आत्राम म्हणाले.याप्रसंगी आमदार कृष्णा गजबे, नगराध्यक्षा दंडवते, किसन नागदेवे आदींची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सम्यक जागृत बौद्ध महिला समितीच्या पदाधिकारी यांनी सहकार्य केले.प्रास्ताविक अभियंता प्रकाश बुब, संचालन प्रकल्प समन्वयक बादल श्रीरामे तर आभार विनोद मोहतुरे यांनी मानले.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले