शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
3
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
4
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
5
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
6
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
7
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
8
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
9
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
10
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
11
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
12
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
13
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
14
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
15
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
16
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
17
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
18
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
19
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
20
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

आपत्ती निवारणासाठी दक्ष राहा

By admin | Updated: May 19, 2017 00:15 IST

आगामी पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज राहावे, या काळात सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करावे,

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : व्यवस्थापन बैठकीत सर्व यंत्रणांच्या समन्वयावर भर लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : आगामी पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज राहावे, या काळात सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी ए.एस. आर. नायक यांनी दिले. गडचिरोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. त्यात जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन नियोजन तसेच आराखडा यांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी अधिकाऱ्यांना त्यांनी अनेक सूचना केल्या. बैठकीला जि.प. अध्यक्ष योगिता भांडेकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल, सहायक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जवळेकर, अधीक्षक अभियंता प्रदीप खवले, पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदींसह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाबाबत कृष्णा रेड्डी यांनी सादरीकरण केले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व तहसील कार्यालये, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, दुरसंचार विभाग तसेच नगरपालिका आदींनी १ जूनपासून २४ तास कार्यरत राहतील असे नियंत्रण कक्ष स्थापन करावेत तसेच आरोग्य विभागाने ७ जूनपासून याच स्वरुपाचे कक्ष कार्यान्वित करण्याचे निर्देश नायक यांनी यावेळी दिले. यावेळी अनेक शक्यतांवर चर्चा करण्यात आली. तीन वर्षात वीज कोसळून २८ जणांचा मृत्यू सन २०१३ ते २०१६ या तीन वर्षांच्या कालावधीत गडचिरोली ज्ल्ह्यिात वादळी पावसासोबत वीज कोसळण्याचे प्रकार होतात. अशा घटनांमध्ये २८ जणांचा मृत्यू झाला. अशा मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी ज्या ठिकाणी वीज पडण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणांवर वीज अटकाव यंत्रणा (लायटनिंग अरेस्टर) लावण्यासंदर्भात काम सुरु आहे. यावर्षी बीएसएनएलच्या टॉवरची संख्या वाढली आहे. वीज कोसळण्याची अधिक तिव्रता असणाऱ्या भागातील ४८ टॉवरवर लायटनिंग अरेस्टर बसविण्यात येणार आहे, असे उपमहाव्यवस्थापक सय्यद यांनी सांगितले. पूरपरिस्थितीने २४६ गावांचा तुटतो संपर्क जिल्ह्यात पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या एकूण गावांची संख्या २४६ इतकी आहे. त्यापैकी १११ गावांचा संपर्क तीन महिन्यांहून अधिक काळ राहत नाही. नद्यांना पूर आल्याने या गावांचा संपर्क तुटत असल्यामुळे या गावांमध्ये धान्य तसेच औषध साठा करुन ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.