शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

कर्जासाठी बँकांचा हात आखडता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2017 01:09 IST

२०१७-१८ च्या खरीप हंगामात जिल्हाभरातील शेतकऱ्यांना १९४ कोटी ६२ लाख रूपये कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट बँकांना दिले.

उद्दिष्टाच्या केवळ चार टक्केच कर्ज वितरण : खरीप हंगाम तोंडावर; शेतकऱ्यांची धावपळ वाढली लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : २०१७-१८ च्या खरीप हंगामात जिल्हाभरातील शेतकऱ्यांना १९४ कोटी ६२ लाख रूपये कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट बँकांना दिले. रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली आहे. आठ दिवसातच खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र बँकांनी दरवर्षीप्रमाणे कर्ज वितरणात हात आखडता घेतला आहे. १५ मे पर्यंत केवळ उद्दिष्टाच्या ४ टक्केच कर्ज वितरण केले आहे. अनेक शेतकरी अजूनही कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवित असल्याचे दिसून येत आहे. आधुनिक पद्धतीने शेतकरीवर्ग शेती करीत असल्याने शेतीचा खर्च वाढत चालला आहे. शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बेताची राहत असल्याने कर्ज काढल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय राहत नाही. सावकार व बचतगट सुमारे ३६ ते ६० टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारतात. सावकाराच्या पाशातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी शासनाने राष्ट्रीयकृत बँकांना शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करणे सक्तीचे केले आहे. प्रत्येक बँकेला कर्ज वितरणाचे उद्दिष्ट सुद्धा ठरवून देण्यात आले आहे. मात्र शेतकरीवर्ग कर्ज परत करीत नाही, अशी चुकीची मानसिकता बँकांच्या अधिकाऱ्यांची झाली असल्याने राष्ट्रीयकृत बँका कर्ज वितरणास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र दिसून येते. दरवर्षीप्रमाणेच याचा प्रत्यय यावर्षीसुद्धा येत आहे. खरीप हंगाम जवळ येऊन ठेपला असतानाही बँकांनी कर्ज वितरणास अजूनपर्यंत सुरुवात केली नाही. १५ मे पर्यंत केवळ दोन हजार शेतकऱ्यांना ९ कोटी ३८ लाख रूपयांचे कर्ज वितरण केले आहे. काही बँकांनी तर अजूनपर्यंत कर्ज वितरणाला सुरुवात सुद्धा केली नसल्याचे दिसून येत आहे. विविध त्रूटी दाखवून राष्ट्रीयकृत बँका कर्जासाठी टाळाटाळ करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांचे अर्ज बँकेमध्ये पडून आहेत. मात्र बँकेने या अर्जावर निर्णय प्रलंबित ठेवला आहे. पावसाळा जवळ आल्याने शेतकऱ्यांनी बियाणे व खते खरेदी करण्याची लगबग सुरू केली आहे. पावसाळ्यापूर्वी बियाणे व खते खरेदीसाठी कर्ज उपलब्ध होणे आवश्यक आहे. बँकांकडून कर्जासाठी चालढकल धोरण अवलंबिले असल्याने पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी सावकाराकडेही संपर्क साधून ठेवला आहे. बँकांकडून शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. मात्र ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना कर्ज वितरणाबाबतची माहिती नाही. त्यामुळे सदर शेतकरी बँकांकडून कर्ज घेत नसल्याचे दिसून येते. तलाठी, ग्रामसेवक व इतर स्थानिक अधिकाऱ्यांनी बँकांकडून देण्यात येणाऱ्या शून्य टक्के व्याजदराबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बँकांवर कारवाईची मागणी बँकांना दरवर्षीच कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले जाते. मात्र बँका दिलेल्या उद्दिष्टाएवढे कधीच कर्ज वितरण करीत नाही. केवळ कारवाई टाळण्यासाठी काही शेतकऱ्यांना कर्ज वितरित करतात. सावकाराकडून घेतलेल्या कर्जाचा भार शेतकऱ्याला सोसत नसल्याने त्याच्यापुढे आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. ज्या बँकांचे अधिकारी कर्ज वितरणास टाळाटाळ करतील, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांना कर्ज वितरित करण्यासाठी अनेक योजना लागू करणाऱ्या बँका सामाजिक दायित्व म्हणून पीक कर्ज वितरित करीत नसतील तर अशा बँकांविरोधात कडक पाऊल उचलण्याची गरज आहे. मागील खरीप हंगामात बँकांना १८८ कोटी रूपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ११५ कोटींचे कर्ज वितरण करण्यात आले. मागील वर्षी बँकांना कर्ज वितरणाबाबत सक्ती करण्यात आली होती. ग्रामीण भागात मेळावे घेऊन कर्जासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांविषयीची माहिती देण्यात आली होती.