शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

आॅडिटरच्या चौकशीस टाळाटाळ

By admin | Updated: August 4, 2014 23:44 IST

येथील प्रगती ग्रामीण महिला पतसंस्थेच्या व्यवस्थापकाविरूद्ध ४३ लाख ७१ हजार ८३५ रूपयांची अफरातफर केल्याची तक्रार संचालकांनी पोलीस ठाण्यात केली होती. परंतु सरकारी आॅडिटरची

आष्टी : येथील प्रगती ग्रामीण महिला पतसंस्थेच्या व्यवस्थापकाविरूद्ध ४३ लाख ७१ हजार ८३५ रूपयांची अफरातफर केल्याची तक्रार संचालकांनी पोलीस ठाण्यात केली होती. परंतु सरकारी आॅडिटरची रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही कारवाई करू शकत नाही, अशी टाळाटाळीची भूमिका पोलिसांनी घेतल्याने व्यवस्थापकाविरूद्ध पोलीस कारवाईला विलंब होत आहे. त्यामुळे असंख्य खातेदार पैसा कधी मिळणार या विवंचनेत आहेत. प्रगती ग्रामीण महिला पतसंस्थेत २००४ ते २०१४ पर्यंत नरेंद्र शेंडे हे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. बँकेतील पैशांचा संपूर्ण व्यवहार शेंडे यांच्याकडे होता. एप्रिल २०१४ मध्ये बँकेचे खातेदार शेंडे यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेले असता, त्यांनी बँकेत पैसे नाही म्हणून टाळाटाळ केली व खातेदारांना परत पाठविले. त्यानंतर शेंडे यांनी बँकेच्या पैशाची अफरातफर केली असल्याचा हा घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर खातेदारांनी अध्यक्ष सिंधू दुर्गे यांच्याकडे धाव घेतली. व्यवस्थापक शेंडे यांनी आॅडिट केल्यानंतर खातेदारांना पैशे परत करू, असे सांगितले. दरम्यान मे २०१४ मध्ये नरेंद्र शेंडे यांनी आपल्या मर्जीतील आॅडिटर बोलावून आॅडीट करवून घेतले. त्यामध्ये ४६ लाखांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले. बँकेच्या संचालक मंडळातील सर्व सदस्यांनी १४ एप्रिल रोजी मुलचेरा पोलिसात तक्रार दाखल केली. परंतु पोलीस कारवाई न झाल्याने २९ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक गडचिरोली व ७ मे रोेजी सहाय्यक निबंधक चामोर्शी यांच्याकडे तक्रार दाखल केली. परंतु एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटूनही व्यवस्थापकावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर संचालक मंडळाने लोकशाही दिनात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असता, जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना कारवाई करण्याचे पत्र २१ जुलै २०१४ रोजी दिले. यादरम्यान संचालक मंडळाने जिल्हा उपनिबंधक अहेरी यांच्याकडेही तक्रार केली. जिल्हा उपनिबंधक अहेरी यांनी चामोर्शीचे सहाय्यक निबंधक गणवीर यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले. परंतु एक महिन्याचा कालावधी लोटूनही चौकशी करण्यात आली नाही. ३१ जुलै २०१४ पर्यंत आॅडीट करण्याचे निश्चित झाल्यानंतरही कुठलीही कारवाई जिल्हा निबंधक यांच्याकडून अजूनपर्यंत करण्यात आली नाही. संचालक मंडळ व खातेदार ४ आॅगस्टला जिल्हा निबंधकाकडे तक्रार करणार असल्याची माहिती बँकेच्या अध्यक्ष सिंधू दुर्गे यांनी दिली आहे.पैशाच्या अफरातफर प्रकरणात जिल्हा उपनिबंधक अहेरी यांच्या आदेशालाही चामोर्शीच्या उपनिबंधकाने केराची टोपली दाखविल्याने जिल्हा निबंधक कुठली कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)