शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

आॅडिटरच्या चौकशीस टाळाटाळ

By admin | Updated: August 4, 2014 23:44 IST

येथील प्रगती ग्रामीण महिला पतसंस्थेच्या व्यवस्थापकाविरूद्ध ४३ लाख ७१ हजार ८३५ रूपयांची अफरातफर केल्याची तक्रार संचालकांनी पोलीस ठाण्यात केली होती. परंतु सरकारी आॅडिटरची

आष्टी : येथील प्रगती ग्रामीण महिला पतसंस्थेच्या व्यवस्थापकाविरूद्ध ४३ लाख ७१ हजार ८३५ रूपयांची अफरातफर केल्याची तक्रार संचालकांनी पोलीस ठाण्यात केली होती. परंतु सरकारी आॅडिटरची रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही कारवाई करू शकत नाही, अशी टाळाटाळीची भूमिका पोलिसांनी घेतल्याने व्यवस्थापकाविरूद्ध पोलीस कारवाईला विलंब होत आहे. त्यामुळे असंख्य खातेदार पैसा कधी मिळणार या विवंचनेत आहेत. प्रगती ग्रामीण महिला पतसंस्थेत २००४ ते २०१४ पर्यंत नरेंद्र शेंडे हे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. बँकेतील पैशांचा संपूर्ण व्यवहार शेंडे यांच्याकडे होता. एप्रिल २०१४ मध्ये बँकेचे खातेदार शेंडे यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेले असता, त्यांनी बँकेत पैसे नाही म्हणून टाळाटाळ केली व खातेदारांना परत पाठविले. त्यानंतर शेंडे यांनी बँकेच्या पैशाची अफरातफर केली असल्याचा हा घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर खातेदारांनी अध्यक्ष सिंधू दुर्गे यांच्याकडे धाव घेतली. व्यवस्थापक शेंडे यांनी आॅडिट केल्यानंतर खातेदारांना पैशे परत करू, असे सांगितले. दरम्यान मे २०१४ मध्ये नरेंद्र शेंडे यांनी आपल्या मर्जीतील आॅडिटर बोलावून आॅडीट करवून घेतले. त्यामध्ये ४६ लाखांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले. बँकेच्या संचालक मंडळातील सर्व सदस्यांनी १४ एप्रिल रोजी मुलचेरा पोलिसात तक्रार दाखल केली. परंतु पोलीस कारवाई न झाल्याने २९ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक गडचिरोली व ७ मे रोेजी सहाय्यक निबंधक चामोर्शी यांच्याकडे तक्रार दाखल केली. परंतु एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटूनही व्यवस्थापकावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर संचालक मंडळाने लोकशाही दिनात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असता, जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना कारवाई करण्याचे पत्र २१ जुलै २०१४ रोजी दिले. यादरम्यान संचालक मंडळाने जिल्हा उपनिबंधक अहेरी यांच्याकडेही तक्रार केली. जिल्हा उपनिबंधक अहेरी यांनी चामोर्शीचे सहाय्यक निबंधक गणवीर यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले. परंतु एक महिन्याचा कालावधी लोटूनही चौकशी करण्यात आली नाही. ३१ जुलै २०१४ पर्यंत आॅडीट करण्याचे निश्चित झाल्यानंतरही कुठलीही कारवाई जिल्हा निबंधक यांच्याकडून अजूनपर्यंत करण्यात आली नाही. संचालक मंडळ व खातेदार ४ आॅगस्टला जिल्हा निबंधकाकडे तक्रार करणार असल्याची माहिती बँकेच्या अध्यक्ष सिंधू दुर्गे यांनी दिली आहे.पैशाच्या अफरातफर प्रकरणात जिल्हा उपनिबंधक अहेरी यांच्या आदेशालाही चामोर्शीच्या उपनिबंधकाने केराची टोपली दाखविल्याने जिल्हा निबंधक कुठली कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)