शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटमधील 'डॉन'चा विक्रम मोडला
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
7
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
8
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
10
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
11
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
12
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
13
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
14
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
15
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
16
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
17
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
18
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
19
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
20
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?

लेखापरीक्षण रखडले

By admin | Updated: January 1, 2015 23:00 IST

जिल्ह्यातील ८० ग्रामपंचायतींचे लेखापरिक्षण मागील दोन वर्षांपासून रखडले असून मागील वर्षाच्या लेखापरिक्षणाला सुरूवातही झाली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेला

ग्रामपंचायत : गैरव्यवहार गुलदस्त्यातगडचिरोली : जिल्ह्यातील ८० ग्रामपंचायतींचे लेखापरिक्षण मागील दोन वर्षांपासून रखडले असून मागील वर्षाच्या लेखापरिक्षणाला सुरूवातही झाली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेला सावळागोंधळ अजूनही चव्हाट्यावर गुलदस्त्यातच आहे. ग्रामपंचायतीचे सशक्तीकरण करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने सरळ ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे शासनाकडून दरवर्षी लाखो रूपयांचा निधी ग्रामपंचायतीला प्राप्त होतो. त्याचबरोबर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातूनही काही योजना राबविल्या जातात व त्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून दिल्या जातो. गावातील नागरिकही कराच्या माध्यमातून ग्रामपंचायतीकडे पैसे जमा करतात. या सर्व निधीचा विनियोग ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक करतात. त्यावर नियंत्रण ठेवण्याची महत्वाची जबाबदारी ग्रामसभा व इतर ग्रामपंचायत सदस्य पार पाडतात. शासनाकडून व जनतेकडून प्राप्त झालेल्या निधीचा योग्य कामासाठी उपयोग होत आहे किंवा नाही, याची शहनिशा करण्याचे काम लेखापरिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण केले जाते. यासाठी जिल्हास्थळावर स्वतंत्र लेखापरिक्षण कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व ग्रामपंचायतींचे लेखापरिक्षण केले जाते. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदांची संख्या तुलनेने कमी असल्याने त्यांचे लेखापरिक्षण तत्काळ होते. मात्र ग्रामपंचायतींची संख्या प्रत्येक जिल्ह्यातच जास्त राहत असल्याने ग्रामपंचायतींचे लेखापरिक्षण करताना अडचणी येतात. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४६७ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींपैकी ८० ग्रामपंचायतींचे २०१२-१३ या आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षण झाले नाही.२०१३-१४ या वर्षाचे लेखापरिक्षण करण्याची मंजुरी राज्यशासनाने अजूनपर्यंत दिली नाही. त्यामुळे या वर्षातील एकाही ग्रामपंचायतीचे लेखापरिक्षण झाले नाही. ग्रामपंचायतींच्या आर्थिक तसेच इतर व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याची महत्वाची जबाबदारी ग्रामसभा व इतर सदस्य निभावित असले तरी प्रत्येक वेळेसच त्यांचे नियंत्रण राहीलच याची खात्री देता येत नाही. ग्रामपंचायतीला सरळ निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण शासनाने अवलंबिल्यापासून सरपंच तसेच ग्रामसेवकांनी निधीचा अपहार केल्याच्या अनेक घटना राज्यात व जिल्ह्यात घडल्या आहेत. हा सावळागोंधळ व अपहार लेखापरिक्षणाच्या माध्यमातून उजेडात येतो. मात्र अजूनपर्यंत ग्रामपंचायतीचे लेखापरिक्षणच झाले नसल्याने येथील गैरव्यवहार अजूनही चव्हाट्यावर आलेला नाही. राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्याची लेखापरिक्षणाची स्थिती चांगली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. राज्यातील लेखापरिक्षणात समानता यावी, यासाठी २०१२-१३ चे संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतींचे लेखापरिक्षण पूर्ण झाल्याशिवाय इतर ग्रामपंचायतींचे लेखापरिक्षण करू नये, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे २०१३-१४ चे लेखापरिक्षण रखडले आहे.