शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
3
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
4
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
5
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
6
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
7
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
8
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
9
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
10
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
11
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
12
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
13
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
14
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
15
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
16
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
17
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
18
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
19
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
20
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव

एनसीडी कार्यक्रम गुंडाळण्याचा प्रयत्न

By admin | Updated: April 10, 2015 01:09 IST

दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजाविणारा एनसीडी ...

ए. आर. खान अहेरीदुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजाविणारा एनसीडी (राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम) बंद करण्याचा घाट शासनाने घातला असून त्याची प्रथम अंमलबजावणी म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली जात आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे संसर्गजन्य रोगांबरोबरच असंसर्गजन्य रोगांनीही जवळपास ५० टक्के नागरिक पीडित आहेत. यातील बहुतांश नागरिक गरीब आहेत. मात्र या रोगांवर उपचाराचा खर्च जास्त आहे. परिणामी यावर उपचार करताना गरीब नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या नागरिकांना उपचार मिळावे, त्यांची तपासणी मोफत व्हावी या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१२ पासून देशपातळीवर असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत कंत्राटी पध्दतीवर प्रत्येक रूग्णालयात डॉक्टर, कॉन्सीलर, आरोग्य सेविका, डाटाएन्ट्री आॅपरेटर, लॅब टेक्नीशियन व थेरेपी या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. या कार्यक्रमात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागात आरोग्य शिबिर घेऊन हजारो नागरिकांची आरोग्य तपासणी केली व औषधोपचार केला. या कार्यक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. रोगनिदान उपचाराबरोबरच या रोगांबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचेही काम करण्यात आले. मात्र शासनाने या कार्यक्रमातील कॉन्सीलर, डाटाएन्ट्री आॅपरेटर, लॅब टेक्नीशियन ही पदे कमी करून केवळ डॉक्टर व आरोग्य सेविका हे दोनच पदे ठेवणार आहेत. राज्यभरातील सुमारे २३८ आरोग्य कर्मचारी कमी करण्याच्या सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त यांनी दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्याने याचा विपरित परिणाम कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर होणार आहे.