शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

रोजंदारी शिक्षकांवर आश्रमशाळेचा भार

By admin | Updated: February 25, 2017 01:24 IST

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून आश्रमशाळा उघडण्यात आल्या. या शाळांमध्ये आदिवासी

देचलीपेठातील स्थिती : ८० किमी अंतरावरील शिक्षकाकडे मुख्याध्यापकाची जबाबदारी अहेरी : दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून आश्रमशाळा उघडण्यात आल्या. या शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत; मात्र अनेक शाळांमध्ये शिक्षक व सोयीसुविधांचा अभाव आहे. तालुक्यातील देचलीपेठा येथील आश्रमशाळेत रोजंदारी शिक्षकांच्या भरवशावरच शाळेचा कारभार चालविला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. देलचलीपेठा येथे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असून १९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तीन वर्षांपासून शाळेत स्थायी मुख्याध्यापक नाही. तसेच मागील दहा वर्षापासून आश्रमशाळेत महिला अधीक्षिका नाही. एका शिक्षिकेकडे अधीक्षिकेची जबाबदारी देण्यात आली आहे. तिलाच प्राथमिक शिक्षिकेचीही जबाबदारी ही पार पाडावी लागत आहे. शाळेत १२ शिक्षकांची आवश्यकता असतानाही २ माध्यमिक आणि २ प्राथमिक असे एकूण ४ शिक्षक शाळेत कार्यरत आहेत. तर तासिक तत्त्वावर ८ शिक्षक आहेत. गेल्या तीन वर्षांपासून स्थायी मुख्याध्यापक नाही. देचलीपेठापासून ८० किमी अंतरावर असलेल्या शिक्षकाकडे मुख्याध्यापकाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी आधीच कमी असतानाही एका स्वयंपाक्याला मुलचेरा येथील मुलींच्या वसतिगृहात प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना दूरवर असणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत भरती केले जाते. प्रति विद्यार्थी ५० ते ६० हजार रूपये त्यावर खर्च केला जातो. दुर्गम भागात विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे देणाऱ्या शाळात सोयीसुविधा नसतानाही शासकीय आश्रमशाळांच्या दुर्दशेचा विचार केला जात नाही, असा सवाल आश्रमशाळा शिक्षक, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)