शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

एसआरपीमुख्यालयासाठी जागेचा तिढा कायम

By admin | Updated: October 17, 2015 02:05 IST

गडचिरोली जिल्ह्यात राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय देसाईगंज येथे सुरू करण्याच्या उद्देशाने १५० एकर जागा निश्चित करण्यात आली होती.

वन कायद्याची अडचण दूर करण्यात अपयश : १० वर्षांपूर्वी निश्चित केली जागागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय देसाईगंज येथे सुरू करण्याच्या उद्देशाने १५० एकर जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र महसूल, वन प्रशासनाच्या कचाट्यात या जागेचा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे. कुरखेडा मार्गावर असलेल्या पशुप्रजनन प्रक्षेत्राच्या भागात राज्य राखीव पोलीस दलाच्या मुख्यालयासाठी जागा देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. ही जागा गृहविभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबत महसूल व वन विभागाला आदेश देण्यात आले होते. परंतु तब्बल १० वर्षांपासून हे काम प्रलंबित आहे. गोंदिया येथे सदर मुख्यालय हलविण्यात आले. १३ जुलै २०१५ ला शासन निर्णयानुसार देसाईगंज येथील पशुप्रजनन प्रक्षेत्रातील गट क्र २, ३ (अ) व ३ (ब) मधील ७० एकर जमीन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ च्या नागपूर मुख्यालयासाठी गृहविभागाला हस्तांतरित करण्याबाबत महसूल व वन विभागाकडे प्रत्यार्पित करण्यात आली, परंतु या मुख्यालयाकरिता ७० एकर जागा अपुरी पडत असल्याने पुन्हा नव्याने ८० एकर जागेची आवश्यकता होती. त्यामुळे उपरोक्त शासन निर्णयाप्रमाणे पशुप्रजनन प्रक्षेत्र देसाईगंज येथील गट क्र. २, ३ (अ), ३ (ब) मधील अतिरिक्त ८० एकर जागा गृहविभागास हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव महसूल व वन विभागाकडे पाठविण्यात आला. महसूल व वन विभागाने ही १५० एकर जागा गडचिरोली यांच्याकडे वर्ग करण्याची कार्यवाही करावी, असेही शासन निर्णयात नमूद आहे.दरम्यान, राज्य शासनाच्या गृह विभागाने वन विभागाच्या एकूण १५० एकर प्रत्यार्पित जमिनीचा ‘नेट प्रेझेंट व्हॅल्यू’ (एनपीव्ही) रक्कम अदा केली असून ही जमीन वन विभागाची असल्याने वन संवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत निविनीकरण करणे आवश्यक आहे. गृहविभागास हस्तांतरीत केलेल्या एकूण १५० एकर जमिनींचे वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत निविनीकरण करण्याची कार्यवाही केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण विभागाकडून घेण्याचे सांगण्यात आले. जागेचा ताबा गृहविभागाने स्थानिक पशुप्रजनन प्रक्षेत्र विभागाकडून विहीत अटी व शर्तीनुसार घ्यावा, असेही आदेशात म्हटले आहे. याबाबत राज्य राखीव पोलीस दलाचे कार्यालय स्थापन करण्याबाबत संपूर्ण कार्यवाही झाल्याचे स्पष्ट होते. पशुप्रजनन क्षेत्रातील निर्धारित जागेवर राज्य राखीव पोलीस बल क्रमांक १३ यांनी केवळ फलक लावून ठेवला असून मुख्यालयाच्या बांधकामाला सुरुवात न केल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)