शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं
2
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
3
आईनं मुलाचा मुलीप्रमाणे श्रृंगार केला, आनंदात फोटो काढले अन् संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी जीवन संपवले! नेमकं काय घडलं?
4
ENG vs IND : गिल-जड्डू जोडी जमली! अर्धा संघ तंबूत परतल्यावर टीम इंडियानं साधला 'त्रिशतकी' डाव
5
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
6
आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
7
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
8
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
9
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
10
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
11
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
12
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
13
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
14
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
15
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
16
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
17
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
18
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
19
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
20
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य

एसआरपीमुख्यालयासाठी जागेचा तिढा कायम

By admin | Updated: October 17, 2015 02:05 IST

गडचिरोली जिल्ह्यात राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय देसाईगंज येथे सुरू करण्याच्या उद्देशाने १५० एकर जागा निश्चित करण्यात आली होती.

वन कायद्याची अडचण दूर करण्यात अपयश : १० वर्षांपूर्वी निश्चित केली जागागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय देसाईगंज येथे सुरू करण्याच्या उद्देशाने १५० एकर जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र महसूल, वन प्रशासनाच्या कचाट्यात या जागेचा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे. कुरखेडा मार्गावर असलेल्या पशुप्रजनन प्रक्षेत्राच्या भागात राज्य राखीव पोलीस दलाच्या मुख्यालयासाठी जागा देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. ही जागा गृहविभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबत महसूल व वन विभागाला आदेश देण्यात आले होते. परंतु तब्बल १० वर्षांपासून हे काम प्रलंबित आहे. गोंदिया येथे सदर मुख्यालय हलविण्यात आले. १३ जुलै २०१५ ला शासन निर्णयानुसार देसाईगंज येथील पशुप्रजनन प्रक्षेत्रातील गट क्र २, ३ (अ) व ३ (ब) मधील ७० एकर जमीन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ च्या नागपूर मुख्यालयासाठी गृहविभागाला हस्तांतरित करण्याबाबत महसूल व वन विभागाकडे प्रत्यार्पित करण्यात आली, परंतु या मुख्यालयाकरिता ७० एकर जागा अपुरी पडत असल्याने पुन्हा नव्याने ८० एकर जागेची आवश्यकता होती. त्यामुळे उपरोक्त शासन निर्णयाप्रमाणे पशुप्रजनन प्रक्षेत्र देसाईगंज येथील गट क्र. २, ३ (अ), ३ (ब) मधील अतिरिक्त ८० एकर जागा गृहविभागास हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव महसूल व वन विभागाकडे पाठविण्यात आला. महसूल व वन विभागाने ही १५० एकर जागा गडचिरोली यांच्याकडे वर्ग करण्याची कार्यवाही करावी, असेही शासन निर्णयात नमूद आहे.दरम्यान, राज्य शासनाच्या गृह विभागाने वन विभागाच्या एकूण १५० एकर प्रत्यार्पित जमिनीचा ‘नेट प्रेझेंट व्हॅल्यू’ (एनपीव्ही) रक्कम अदा केली असून ही जमीन वन विभागाची असल्याने वन संवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत निविनीकरण करणे आवश्यक आहे. गृहविभागास हस्तांतरीत केलेल्या एकूण १५० एकर जमिनींचे वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत निविनीकरण करण्याची कार्यवाही केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण विभागाकडून घेण्याचे सांगण्यात आले. जागेचा ताबा गृहविभागाने स्थानिक पशुप्रजनन प्रक्षेत्र विभागाकडून विहीत अटी व शर्तीनुसार घ्यावा, असेही आदेशात म्हटले आहे. याबाबत राज्य राखीव पोलीस दलाचे कार्यालय स्थापन करण्याबाबत संपूर्ण कार्यवाही झाल्याचे स्पष्ट होते. पशुप्रजनन क्षेत्रातील निर्धारित जागेवर राज्य राखीव पोलीस बल क्रमांक १३ यांनी केवळ फलक लावून ठेवला असून मुख्यालयाच्या बांधकामाला सुरुवात न केल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)