शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
4
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
5
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
6
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
7
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
8
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
9
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
10
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
11
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
12
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
13
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
14
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
15
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
16
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
17
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
18
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
19
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
20
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा

एसआरपीमुख्यालयासाठी जागेचा तिढा कायम

By admin | Updated: October 17, 2015 02:05 IST

गडचिरोली जिल्ह्यात राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय देसाईगंज येथे सुरू करण्याच्या उद्देशाने १५० एकर जागा निश्चित करण्यात आली होती.

वन कायद्याची अडचण दूर करण्यात अपयश : १० वर्षांपूर्वी निश्चित केली जागागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय देसाईगंज येथे सुरू करण्याच्या उद्देशाने १५० एकर जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र महसूल, वन प्रशासनाच्या कचाट्यात या जागेचा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे. कुरखेडा मार्गावर असलेल्या पशुप्रजनन प्रक्षेत्राच्या भागात राज्य राखीव पोलीस दलाच्या मुख्यालयासाठी जागा देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. ही जागा गृहविभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबत महसूल व वन विभागाला आदेश देण्यात आले होते. परंतु तब्बल १० वर्षांपासून हे काम प्रलंबित आहे. गोंदिया येथे सदर मुख्यालय हलविण्यात आले. १३ जुलै २०१५ ला शासन निर्णयानुसार देसाईगंज येथील पशुप्रजनन प्रक्षेत्रातील गट क्र २, ३ (अ) व ३ (ब) मधील ७० एकर जमीन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ च्या नागपूर मुख्यालयासाठी गृहविभागाला हस्तांतरित करण्याबाबत महसूल व वन विभागाकडे प्रत्यार्पित करण्यात आली, परंतु या मुख्यालयाकरिता ७० एकर जागा अपुरी पडत असल्याने पुन्हा नव्याने ८० एकर जागेची आवश्यकता होती. त्यामुळे उपरोक्त शासन निर्णयाप्रमाणे पशुप्रजनन प्रक्षेत्र देसाईगंज येथील गट क्र. २, ३ (अ), ३ (ब) मधील अतिरिक्त ८० एकर जागा गृहविभागास हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव महसूल व वन विभागाकडे पाठविण्यात आला. महसूल व वन विभागाने ही १५० एकर जागा गडचिरोली यांच्याकडे वर्ग करण्याची कार्यवाही करावी, असेही शासन निर्णयात नमूद आहे.दरम्यान, राज्य शासनाच्या गृह विभागाने वन विभागाच्या एकूण १५० एकर प्रत्यार्पित जमिनीचा ‘नेट प्रेझेंट व्हॅल्यू’ (एनपीव्ही) रक्कम अदा केली असून ही जमीन वन विभागाची असल्याने वन संवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत निविनीकरण करणे आवश्यक आहे. गृहविभागास हस्तांतरीत केलेल्या एकूण १५० एकर जमिनींचे वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत निविनीकरण करण्याची कार्यवाही केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण विभागाकडून घेण्याचे सांगण्यात आले. जागेचा ताबा गृहविभागाने स्थानिक पशुप्रजनन प्रक्षेत्र विभागाकडून विहीत अटी व शर्तीनुसार घ्यावा, असेही आदेशात म्हटले आहे. याबाबत राज्य राखीव पोलीस दलाचे कार्यालय स्थापन करण्याबाबत संपूर्ण कार्यवाही झाल्याचे स्पष्ट होते. पशुप्रजनन क्षेत्रातील निर्धारित जागेवर राज्य राखीव पोलीस बल क्रमांक १३ यांनी केवळ फलक लावून ठेवला असून मुख्यालयाच्या बांधकामाला सुरुवात न केल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)