शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

आरमोरी तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

By admin | Updated: October 21, 2015 01:25 IST

आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना प्रती एकर २५ हजार रूपये नुकसान भरपाई चार हेक्टरपर्यंत देण्यात यावी.

मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांना निवेदन : तालुका काँग्रेसचे शिष्टमंडळ तहसीलदारांना भेटलेआरमोरी : आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना प्रती एकर २५ हजार रूपये नुकसान भरपाई चार हेक्टरपर्यंत देण्यात यावी. या प्रमुख मागणीसाठी आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आरमोरीचे तहसीलदार मनोहर वलथरे यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार आनंदराव गेडाम, ज्येष्ठ नेते रवींद्र दरेकर, तालुकाध्यक्ष किशोर वनमाळी यांनी केले.शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदार वलथरे यांना घेराव घालण्यात आला. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरमोरी तालुक्यात यंदा खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे १०० टक्के रोवणी होऊ शकले नाही. ज्या शेतकऱ्यांनी धानपिकाची रोवणी केली त्या शेतकऱ्यांचे धानपीक पावसाअभावी करपले. तर काही शेतकऱ्यांच्या धानपिकावर गादमाशी, तुडतुडा, खोडकिडा, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे यंदा धानाचे उत्पादन प्रचंड घटणार आहे. महिनाभरापासून पाऊस नसल्याने हजार हेक्टर शेतामधील धानपीक धोक्यात आले आहे. परिणामी शेतकरी मोठ्या संकटाता सापडला आहे. आरमोरी तालुक्यात धानपीकाची आणेवारी ४० टक्क्याच्या आत आहे. मात्र सर्वे योग्यरित्या करण्यात आला नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी माजी जि.प. सभापती आनंदराव आकरे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजू गारोदे, अशोक वाकडे, बग्गु ताडाम, मिलिंद खोब्रागडे, सुभाष सपाटे, श्रीनिवास आबंटवार, चंदू वडपल्लीवार, रघुनाथ मोगरकर, अनिल सोमनकर, दिलीप घोडाम, वघाळाच्या सरपंच मनिषा दोनाडकर, यज्ञकला ठवरे, नरेश टेंभुणे, खेमराज दामले, प्रभाकर टेंभुर्णे, भोलेनाथ धानोरकर, निलकंठ गोहणे, प्रविण राहाटे, यशवंत लोणारे, बेबी सोरते व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)