शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

गडचिरोलीच्या दारूबंदीचीही समीक्षा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:27 IST

गडचिराेली : लगतच्या चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याचे पडसाद गडचिरोली जिल्ह्यातही उमटले आहे. या जिल्ह्यात केलेली दारूबंदी ...

गडचिराेली : लगतच्या चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याचे पडसाद गडचिरोली जिल्ह्यातही उमटले आहे. या जिल्ह्यात केलेली दारूबंदी कितपत यशस्वी झाली, त्याचे काय फायदे झाले, किती नुकसान झाले या सर्व अंगांनी दारूबंदीची समीक्षा करावी, असा सूर सामाजिक-राजकीय क्षेत्रातील व्यक्तींमधून उमटत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीमुळे अवैध विक्रीला प्रचंड वेग आला हाेता. त्या ठिकाणी दारूबंदी पूर्णत: फसली. अशीच स्थिती थोड्याफार फरकाने गडचिराेली जिल्ह्यात आहे. विशेषत: आदिवासी समाजाला मोहफुलाची दारू स्वत:साठी गाळण्याची परवानगी असल्याने त्याच्या आड अनेक जण दारूचा व्यवसाय करतात. चामोर्शी, मुलचेरा तालुक्यात तर प्रचंड प्रमाणात हातभट्टीची दारू गाळल्या जाते. याशिवाय काही प्रमाणात बनावट दारूही आयात केली जाते.

---

दारूबंदीमुळे काेणतीही व्यक्ती व्यसनमुक्त झाली नाही. उलट विषारी दारूमुळे जास्त प्रमाणात आरोग्य बिघडले. शाळकरी मुले, महिला पैशाच्या लोभापायी वाईट मार्गाला लागल्या. चंद्रपूर व गडचिराेली या दाेन्ही जिल्ह्यांची सामाजिक, आर्थिक, भाैगाेलिक परिस्थिती सारखीच असल्यामुळे गडचिराेली जिल्ह्यातील दारूबंदीची समीक्षा व्हावी. दारूबंदीला मोजक्या लोकांच्या कमाईचे साधन करण्याऐवजी सामाजिक विचार करावा.

- डाॅ.प्रमाेद साळवे

सरचिटणीस, प्रदेश काँग्रेस डॉक्टर सेल

----

गेल्या ३० वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी अवैध दारू सुरूच आहे. दारूमाफियांचे धंदे सुरूच आहे. त्यामुळे चंद्रपूरप्रमाणे दारूबंदीची समीक्षा करण्यासाठी समिती नेमावी. या जिल्ह्यात दारूबंदी करून येथील गरीब-आदिवासी लोकांना दारिद्र्याच्या खाईत लोटले. त्यांचे मोठे आर्थिक व शारीरिक नुकसान झाले. शासनाचाही महसूल बुडाला.

- माणिकराव तुरे

ज्येष्ठ आरपीआय नेता, चामोर्शी

----

चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. गडचिरोली जिल्ह्यातही दारुबंदीचा कोणताही फायदा झाला नाही. उलट अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे विद्यार्थ्यांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना दारूचे व्यसन जडले आहे. जिल्ह्यात दारूविक्रीचे सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत. अशी कागदावरील दारूबंदी काही उपयोगाची नाही. पर्यटन थांबले व उद्योगलाही त्याचा फटका बसला. या जिल्ह्याला दारूबंदीतून मुक्त करावे.

- रविकिरण समर्थ

माजी जिल्हाध्यक्ष, भाजपा ओबीसी आघाडी