शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

गडचिरोलीच्या दारूबंदीचीही समीक्षा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:27 IST

गडचिराेली : लगतच्या चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याचे पडसाद गडचिरोली जिल्ह्यातही उमटले आहे. या जिल्ह्यात केलेली दारूबंदी ...

गडचिराेली : लगतच्या चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याचे पडसाद गडचिरोली जिल्ह्यातही उमटले आहे. या जिल्ह्यात केलेली दारूबंदी कितपत यशस्वी झाली, त्याचे काय फायदे झाले, किती नुकसान झाले या सर्व अंगांनी दारूबंदीची समीक्षा करावी, असा सूर सामाजिक-राजकीय क्षेत्रातील व्यक्तींमधून उमटत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीमुळे अवैध विक्रीला प्रचंड वेग आला हाेता. त्या ठिकाणी दारूबंदी पूर्णत: फसली. अशीच स्थिती थोड्याफार फरकाने गडचिराेली जिल्ह्यात आहे. विशेषत: आदिवासी समाजाला मोहफुलाची दारू स्वत:साठी गाळण्याची परवानगी असल्याने त्याच्या आड अनेक जण दारूचा व्यवसाय करतात. चामोर्शी, मुलचेरा तालुक्यात तर प्रचंड प्रमाणात हातभट्टीची दारू गाळल्या जाते. याशिवाय काही प्रमाणात बनावट दारूही आयात केली जाते.

---

दारूबंदीमुळे काेणतीही व्यक्ती व्यसनमुक्त झाली नाही. उलट विषारी दारूमुळे जास्त प्रमाणात आरोग्य बिघडले. शाळकरी मुले, महिला पैशाच्या लोभापायी वाईट मार्गाला लागल्या. चंद्रपूर व गडचिराेली या दाेन्ही जिल्ह्यांची सामाजिक, आर्थिक, भाैगाेलिक परिस्थिती सारखीच असल्यामुळे गडचिराेली जिल्ह्यातील दारूबंदीची समीक्षा व्हावी. दारूबंदीला मोजक्या लोकांच्या कमाईचे साधन करण्याऐवजी सामाजिक विचार करावा.

- डाॅ.प्रमाेद साळवे

सरचिटणीस, प्रदेश काँग्रेस डॉक्टर सेल

----

गेल्या ३० वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी अवैध दारू सुरूच आहे. दारूमाफियांचे धंदे सुरूच आहे. त्यामुळे चंद्रपूरप्रमाणे दारूबंदीची समीक्षा करण्यासाठी समिती नेमावी. या जिल्ह्यात दारूबंदी करून येथील गरीब-आदिवासी लोकांना दारिद्र्याच्या खाईत लोटले. त्यांचे मोठे आर्थिक व शारीरिक नुकसान झाले. शासनाचाही महसूल बुडाला.

- माणिकराव तुरे

ज्येष्ठ आरपीआय नेता, चामोर्शी

----

चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. गडचिरोली जिल्ह्यातही दारुबंदीचा कोणताही फायदा झाला नाही. उलट अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे विद्यार्थ्यांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना दारूचे व्यसन जडले आहे. जिल्ह्यात दारूविक्रीचे सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत. अशी कागदावरील दारूबंदी काही उपयोगाची नाही. पर्यटन थांबले व उद्योगलाही त्याचा फटका बसला. या जिल्ह्याला दारूबंदीतून मुक्त करावे.

- रविकिरण समर्थ

माजी जिल्हाध्यक्ष, भाजपा ओबीसी आघाडी