शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

आलदंडीत नवे पोलीस ठाणे उभारले

By admin | Updated: April 23, 2017 01:26 IST

एटापल्ली पोलीस उपविभागाअंतर्गत अतिसंवेदनशील व नक्षल प्रभावित असलेल्या आलदंडी येथे २२ एप्रिल रोजी

अतिसंवेदनशील भाग : नक्षलवाद्यांना शह देण्याचा उद्देश एटापल्ली : एटापल्ली पोलीस उपविभागाअंतर्गत अतिसंवेदनशील व नक्षल प्रभावित असलेल्या आलदंडी येथे २२ एप्रिल रोजी शनिवारला नव्या पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. जनतेचे संरक्षण करणे व नक्षली कारवायांना आळा घालण्यासाठी एटापल्लीपासून १० किमी अंतरावर असलेल्या आलदंडी येथे पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले. आलदंडी गाव व परिसरातील ग्रामस्थांच्या सहकार्याने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते आलदंडी येथे पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. तसेच पोलीस मदत केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाकरिता प्रस्तावित जागेवर भूमिपूजन करण्यात आले. यानिमित्ताने आलदंडी येथे पोलीस विभागातर्फे जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात उपस्थित ग्रामस्थांना पथनाट्याद्वारे विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच उपस्थित महिलांना साडी व पुरूषांना ड्रेस तसेच शेतकऱ्यांनी शेतीपयोगी साहित्य आणि युवकांना खेळाच्या साहित्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे, पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादार, एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव, सीआरपीएफच्या १९१ बटालियनचे कमांडर त्रिपाठी, आलदंडी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी योगेश दाभाडे आदींसह पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. याच महिन्यात मागील आठवड्यात पोलीस प्रशासनाने एटापल्ली-अहेरी मार्गावर येलचिल येथे नवे पोलीस मदत केंद्र स्थापन केले. या नव्या मदत केंद्रांमुळे नक्षली कारवायांवर नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठे यश येण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागात पोलीस ठाण्यांची संख्या आता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. (तालुका प्रतिनिधी)