शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

अकाली पावसाने रबीला तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 01:33 IST

गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत असल्याने जिल्हाभरातील रबी पिकांना तडाखा बसला आहे.

शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान : भामरागड, मुलचेरा, सिरोंचा तालुक्यात शुक्रवारी जोरदार पाऊस गडचिरोली : गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत असल्याने जिल्हाभरातील रबी पिकांना तडाखा बसला आहे. तूर लाख, चणा, मूग, उडीद आदी रबी पिकासह भाजीपाला व टरबूज पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उन्हाळी धान पिकालाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. गडचिरोली जिल्ह्यात शेततळे, सिंचन विहीर व इतर सिंचनाच्या सुविधा करण्यात आल्यामुळे येथील शेतकरी उन्हाळी धानपिकांकडे वळले आहेत. आरमोरी, सिरोंचा, कुरखेडा तालुक्यासह जिल्ह्याच्या अर्ध्या भागात शेतकरी उन्हाळी धान पीक घेत आहेत. याशिवाय कृषी विभागाने गावागावात जनजागृती घडवून आणल्याने नगदी पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाचे उत्पादन वाढविले आहे. वैरागड भागातील शेतकरी ऊस व टरबुजाचे पीक घेत आहे. यंदाच्या खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्याने रबी हंगामात लगबगीने विविध पिकांची पेरणी केली. रबी पिके ऐन गर्भात असताना अवकाळी पाऊस जिल्ह्यात बरसला. या पावसामुळे रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात गडचिरोली तालुक्यात ७.४ मिमी, धानोरा १२.८ मिमी, चामोर्शीत २३.० मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घेतली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास भामरागड, मुलचेरा, सिरोंचा तालुक्यात पाऊस बरसला. पावसामुळे या तालुक्यातील रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. सिरोंचा तालुक्यात तोडणीनंतर शेतात वाळत घातलेल्या लाल मिरचीचे पावसामुळे नुकसान झाले. शुक्रवारी सकाळच्या सुमारास सिरोंचा तालुक्यात पाऊस झाल्याने या रस्त्यावर पाणी दिसत होते. सिरोंचा तालुक्यात आसरअल्ली, अंकिसा परिसरात तसेच कुरखेडा तालुक्यात मालेवाडा, अंगारा, येंगलखेडा आदी परिसरात मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते व आता मिरची पिकाचा तोडा अंतिम टप्प्यात आहे. याचवेळी अकाली पाऊस आल्याने शेतात झाकून ठेवलेली व पसरवून ठेवलेली मिरची मोठ्या प्रमाणावर खराब झाली आहे. मिरचीच्या ढिगांमध्ये पाणी जमा झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पीक नुकसानीचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी आहे. शेतकऱ्यांच्या मिरची पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. उन्हात वाळविण्यासाठी उघड्यावर असलेली मिरची पूर्णपणे ओली झाली. त्यामुळे मिरचीच्या किमतीतही घसरण होणार आहे. ओल्या झालेल्या मिरचीला बाजारात भाव कमी राहिल. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने या भागातील शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी. - रंगू बापू, प्रगतशील शेतकरी, अंकिसा ता. सिरोंचा आंब्याचा मोहर गळाला गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागात आमराया आहेत. सिरोंचा तालुक्यात कलेक्टर आंबाही प्रसिध्द आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मोठे आंब्याचे झाड असून यावर्षी आंब्याला चांगला बहर आला होता. शहरातही अनेक घरी आंब्याच्या झाडाला बहर आलेला दिसत असताना शुक्रवारी पहाटे अकाली पाऊस झाल्याने संपूर्ण भागात आंब्याचा बहर गळून खाली पडला आहे. त्यामुळे आंबे उत्पादक शेतकऱ्यांनाही या अकाली पावसाचा मोठा फटका बसला आहे. महसूल प्रशासनाकडून अजूनही सर्वेक्षण कामाला सुरूवात झालेली नाही.