शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

अकाली पावसाने धानाला फटका

By admin | Updated: November 12, 2014 22:43 IST

खरीप हंगामातील धान काढण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी धान काढण्याच्या तयारीत असतांनाच दोन-तीन दिवसापूर्वी झालेल्या अकाली पावसाने आरमोरी

आरमोरी : खरीप हंगामातील धान काढण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी धान काढण्याच्या तयारीत असतांनाच दोन-तीन दिवसापूर्वी झालेल्या अकाली पावसाने आरमोरी तालुक्यातील धानपीक ओले झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना आता ओले झालेले धान जमा करावे लागत आहे. या ओल्या झालेल्या धानाला बाजारातही विकतांना अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर येणार आहे.आरमोरी तालुक्यात शेतकरी धान हे प्रमुख पीक घेतात. खरीप हंगामात पावसाच्या अनियमितपणामुळे यंदा धानाची लागवड उशीरा करण्यात आली. त्यामुळे हलका धान पहिले निघाला. आता अन्य जातीचा धान काढण्याची सुरूवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी धान कापून शेतात पसरून ठेवला. दोन दिवसापूर्वी रविवारी गडचिरोली जिल्ह्यात पाऊस झाला. त्यामुळे शेतात उघड्यावर असलेला धान ओला झाला आहे. आता हा धान मळणी यंत्राने काढायसाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. पाण्यात भिजलेला हा धान बाजारात नेल्यावर त्याला भावही कमी मिळण्याची शक्यता आहे. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला अकाली पावसाने मोठा फटका दिला आहे. धानासोबत काही शेतकरी अन्य पीक घेतात. त्यालाही अकाली पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडणीत सापडला.