शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सौरऊर्जेवरील कृषिपंप मिळणार

By admin | Updated: April 20, 2015 01:28 IST

डीपीसीमधून नावीन्यपूर्ण आदिवासी उपयोजनेतून वीज नसलेल्या जिल्ह्यातील १३२ गावातील जवळपास ११७ आदिवासी लाभार्थी शेतकऱ्यांना ...

लोकमत विशेषदिलीप दहेलकर गडचिरोलीडीपीसीमधून नावीन्यपूर्ण आदिवासी उपयोजनेतून वीज नसलेल्या जिल्ह्यातील १३२ गावातील जवळपास ११७ आदिवासी लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात १०० टक्के सवलतीवर सौरऊर्जेवर आधारित कृषिपंप वितरित करण्यात येणार आहे. या योजनेसाठी डीपीसीचा कृषी विभागाला ४ कोटी ६९ लाख रूपयांचा निधी मिळाला आहे. स्वत:ची शेती व विहीर असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना दुबार पीक लागवडीकरिता सदर योजना कृषी विभागाच्या वतीने प्रथमच हाती घेण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे सिंचन सुविधा निर्माण होणार आहे.शेतात असणाऱ्या विहिरींचा सिंचनाकरिता पुरेपूर उपयोग व्हावा, कायमस्वरूपी उपसा सिंचन साधन उपलब्ध व्हावे, जीरायती शेती बागायती शेतीमध्ये रूपांतरित व्हावी यातून आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पादनात व उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने कृषी विभागाच्यावतीने सौरऊर्जेवर आधारित कृषिपंप वाटपाची योजना हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील विद्युतीकीकरण न झालेल्या १३२ गावांमध्ये ऊर्जीकरणाची जबाबदारी महाराष्ट्र ऊर्जा प्राधिकरण (मेडा) यांच्याकडे देण्यात आली आहे. १३२ गावातील जवळपास ११७ विहीरधारक आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर सौरऊर्जेवर आधारित कृषिपंप बसविण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. मेडामार्फत २०१४-१५ या वर्षाकरिता निश्चित केलेल्या दर करारानुसार कृषिपंप उपलब्ध झाल्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरीवर बसविण्यात येणार आहे. मेडामार्फत ऊर्जीकरणासाठी हस्तांतरित गावातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या विहिरीला आठ ते दहा महिने पाणी उपलब्ध असावे व संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांकडून दुबार पीक लागवडीची हमी असावी, हे या योजनेच्या पात्र लाभार्थ्याचे निकष आहे. सौरऊर्जेद्वारे कृषिपंपाचे ऊर्जीकरण याबाबीचा इतर कोणत्याही योजनेमध्ये समावेश नाही. सदर योजना प्रथमच नव्याने प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच या योजनेसाठी निवड केलल्या गावांमध्ये सद्यस्थितीत महावितरणामार्फत वीज पुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे सदर योजना पूर्णत: नावीन्यपूर्ण आहे.