शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

सौरऊर्जेवरील कृषिपंप मिळणार

By admin | Updated: April 20, 2015 01:28 IST

डीपीसीमधून नावीन्यपूर्ण आदिवासी उपयोजनेतून वीज नसलेल्या जिल्ह्यातील १३२ गावातील जवळपास ११७ आदिवासी लाभार्थी शेतकऱ्यांना ...

लोकमत विशेषदिलीप दहेलकर गडचिरोलीडीपीसीमधून नावीन्यपूर्ण आदिवासी उपयोजनेतून वीज नसलेल्या जिल्ह्यातील १३२ गावातील जवळपास ११७ आदिवासी लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात १०० टक्के सवलतीवर सौरऊर्जेवर आधारित कृषिपंप वितरित करण्यात येणार आहे. या योजनेसाठी डीपीसीचा कृषी विभागाला ४ कोटी ६९ लाख रूपयांचा निधी मिळाला आहे. स्वत:ची शेती व विहीर असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना दुबार पीक लागवडीकरिता सदर योजना कृषी विभागाच्या वतीने प्रथमच हाती घेण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे सिंचन सुविधा निर्माण होणार आहे.शेतात असणाऱ्या विहिरींचा सिंचनाकरिता पुरेपूर उपयोग व्हावा, कायमस्वरूपी उपसा सिंचन साधन उपलब्ध व्हावे, जीरायती शेती बागायती शेतीमध्ये रूपांतरित व्हावी यातून आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पादनात व उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने कृषी विभागाच्यावतीने सौरऊर्जेवर आधारित कृषिपंप वाटपाची योजना हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील विद्युतीकीकरण न झालेल्या १३२ गावांमध्ये ऊर्जीकरणाची जबाबदारी महाराष्ट्र ऊर्जा प्राधिकरण (मेडा) यांच्याकडे देण्यात आली आहे. १३२ गावातील जवळपास ११७ विहीरधारक आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर सौरऊर्जेवर आधारित कृषिपंप बसविण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. मेडामार्फत २०१४-१५ या वर्षाकरिता निश्चित केलेल्या दर करारानुसार कृषिपंप उपलब्ध झाल्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरीवर बसविण्यात येणार आहे. मेडामार्फत ऊर्जीकरणासाठी हस्तांतरित गावातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या विहिरीला आठ ते दहा महिने पाणी उपलब्ध असावे व संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांकडून दुबार पीक लागवडीची हमी असावी, हे या योजनेच्या पात्र लाभार्थ्याचे निकष आहे. सौरऊर्जेद्वारे कृषिपंपाचे ऊर्जीकरण याबाबीचा इतर कोणत्याही योजनेमध्ये समावेश नाही. सदर योजना प्रथमच नव्याने प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच या योजनेसाठी निवड केलल्या गावांमध्ये सद्यस्थितीत महावितरणामार्फत वीज पुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे सदर योजना पूर्णत: नावीन्यपूर्ण आहे.