शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

४१ दिवसांच्या संघर्षाने त्यांना आला ‘पुनर्जन्म’ झाल्याचा प्रत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:36 IST

आरमोरी : कोरोनाचा ग्राफ आता कमी होत असला तरी कोरोनाबाधितांच्या मृतांची संख्या कमी होत नसल्याने हा चिंतेचा विषय झाला ...

आरमोरी : कोरोनाचा ग्राफ आता कमी होत असला तरी कोरोनाबाधितांच्या मृतांची संख्या कमी होत नसल्याने हा चिंतेचा विषय झाला आहे. मनाची हिंमत आणि सकारात्मक विचारांसोबत नातेवाइकांचा शाब्दिक आधार मिळ‌ाल्यास मृत्यूच्या दाढेतूनही व्यक्ती परत येऊ शकतो, याचे जिवंत उदाहरण येथील सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश जुआरे ठरले आहे. तब्बल ४१ दिवसांचा कोरोनाविरुद्धचा संघर्ष म्हणजे आपला पुनर्जन्मच ठरला, अशी भावना ते व्यक्त करतात.

आरमोरीच्या जुआरे परिवारातील सदस्य आणि चिमूर तालुक्यातील भिशी येथील आदर्श जनता विद्यालयातून काही महिन्यांपूर्वीच सेवानिवृत्त झालेले शिक्षक प्रकाश पांडुरंग जुआरे आणि त्यांची पत्नी तथा प्राथमिक शिक्षिका ज्योती जुआरे या दाम्पत्याने कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली. सुरुवातीला त्यांना साधी सर्दी व ताप होता. पण प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे त्यांनी भिसी येथून उमरेडला जाऊन कोरोना टेस्ट केली, ती पॉझिटिव्ह आली. मुलीच्या सासरकडील मंडळींच्या आसऱ्याने भंडाऱ्यातील खासगी रुग्णालयात ते भरती झाले. काही दिवसांतच पत्नी ज्योती यांची प्रकृती बरी झाली तरी प्रकाश यांचा सिटी स्कोर १८वर पोहोचला. ऑक्सिजन पातळीही ७०च्या आसपास घसरली. त्यामुळे श्वसनाचा त्रास वाढू लागला. डॉक्टरांना शाश्वती वाटत नसल्याने त्यांना नागपूरला हलविण्यास सांगितले. बेडसाठी शोधाशोध झाल्यानंतर वाडी येथील एका रुग्णालयात भरती करून उपचार सुरू झाले. त्यामुळे ऑक्सिजन पातळी ८०पर्यंत पोहोचली. पण काळ त्यांचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. ज्या रुग्णालयात ते होते तिथे आग लागली. त्यातूनही ते सुखरूप बाहेर आले. दरम्यान, दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात त्यांना भरती केले. त्यावेळी आवश्यक इंजेक्शन, ऑक्सिजनचा तुटवडा यांचा त्यांनाही सामना करावा लागला.

जावई डॉ. अजय साखरवाडे व मित्रांनी त्यावर तोडगा काढून भंडारा येथे मुलीच्या घरी ठेवण्याचा निर्णय घेतला. घरीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत सकारात्मक विचार कायम ठेवले. शेवटी मुलगी, जावयांचा भावनिक आधार आणि स्वत:मधील हिंमत यामुळे त्यांनी कोरोनाच्या संकटातून स्वत:ला सावरत पूर्णपणे त्यावर मात केली.

(बॉक्स)

अन् ऑक्सिजन मास्क फेकून ते आयसीयूबाहेर धावले

वाडी येथील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) भरती असताना एक दिवस रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास प्रकाश जुआरे यांच्या बेडवरील एसीने अचानक पेट घेतला. हे दृष्य पाहून त्यांनी नाकावरील ऑक्सिजन मास्क बाजूला फेकत ‘आग आग’ म्हणत आयसीयूमधून बाहेर धूम ठोकली. डॉक्टर, नर्स यांच्यासह तेथील रुग्णांच्या नातेवाइकांची एकच धावपळ सुरू झाली. वेळीच त्यांनी आगीची घटना निदर्शनास आणून दिल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.