शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

३७ वर्षांनंतरही गडचिरोलीवासीयांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 06:00 IST

क्षेत्रफळाच्या तुलनेत तालुक्यांची संख्या कमी आहे. अहेरी, सिरोंचा, धानोरा, चामोर्शी या तालुक्यांचा विस्तार सुमारे १०० किमीचा आहे. १०० किमी अंतर कापून नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी तालुकास्थळी यावे लागते. जंगलाने व्याप्त या भागात वाहतुकीची साधने अत्यंत मर्यादीत आहेत. एका दिवशी तालुकास्थळी जाऊन परत येणे शक्य होत नाही.

ठळक मुद्दे२० टक्के गावांना रस्तेच नाही : रोजगाराची समस्या गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जंगलाने व्याप्त व आदिवासी बहुल भागाचा विकास व्हावा, या उद्देशाने ३७ वर्षांपूर्वी २६ आॅगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. जिल्हा निर्मितीला ३७ वर्षांचा कालावधी उलटला तरी येथील जनतेची विकासाबाबत उपेक्षाच झाली आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे ७६ टक्के भूभाग जंगलाने व्यापला आहे. सद्य:स्थितीत १२ तालुके आहेत. क्षेत्रफळाच्या तुलनेत तालुक्यांची संख्या कमी आहे. अहेरी, सिरोंचा, धानोरा, चामोर्शी या तालुक्यांचा विस्तार सुमारे १०० किमीचा आहे. १०० किमी अंतर कापून नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी तालुकास्थळी यावे लागते. जंगलाने व्याप्त या भागात वाहतुकीची साधने अत्यंत मर्यादीत आहेत. एका दिवशी तालुकास्थळी जाऊन परत येणे शक्य होत नाही. परिणामी अनेक पात्र लाभार्थी सुध्दा शासकीय योजनांपासून वंचित आहेत. शेवटच्या टोकावर असलेला सिरोंचा तालुका जिल्हास्थळापासून २१० किमी अंतरावर आहे. अंकिसा, आसरअल्ली ही गावे जिल्हास्थळापासून २५० किमी अंतरावर आहेत. त्यामुळेच अहेरी जिल्हा निर्मितीची मागणी होत आहे. मात्र याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. अहेरी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी पद देण्यात आले आहे. तरीही काही महत्त्वाची कामे करण्यासाठी गडचिरोलीलाच यावे लागते. सद्य:स्थितीत अहेरीतील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याने गडचिरोली येथील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रभार सोपविला आहे. कुपोषण, अ‍ॅनिमिया, सिकलसेल, कुष्ठरोगाचे प्रमाण अधिक आहे. मात्र मेडिकल कॉलेज नाही. दुर्गम भागातील अजुनही २० टक्के गावांपर्यंत रस्ते पोहोचले नाही. नदी, नाल्यांवर पूल नाही. त्यामुळे रूग्ण व गरोदर मातांना खाटेवर रूग्णालयात दाखल करावे लागते.रोजगाराची समस्या गंभीरवनसंपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती सुध्दा आहे. मात्र एकही उद्योग नाही. त्यामुळे येथील नागरिकांना शेतीवरच चरीतार्थ भागवावा लागतो. सिंचनाची सुविधा नसल्याने शेती सुध्दा बेभरवशाची झाली आहे. शेतीच्या माध्यमातून केवळ दोन ते तीन महिन्यांचा रोजगार उपलब्ध होतो. त्यानंतर मात्र बेरोजगारीच्या संकटाचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. एकही मोठा उद्योग जिल्ह्यात नाही. आष्टीजवळील कोनसरी येथे लोहखनिज प्रकल्प निर्मितीचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र या प्रकल्पाबाबत पुढची प्रक्रिया सुरू झाली नाही. काही तालुकास्थळी शासनाने एमआयडीसाठी जमीन खरेदी करून ठेवली आहे. मात्र त्या ठिकाणी उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे एमआयडीसीच्या जागा अजूनही पडीक आहेत.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली