शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
3
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
4
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
5
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
6
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
7
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
8
इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
9
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
10
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
11
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
12
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
13
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
14
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
15
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
16
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
17
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
18
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
19
Iran Israel War: इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
20
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले

परप्रांतीय १२ शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:38 IST

गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण हक्क कायद्यानुसार ३ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना शाळेत दाखल करुन त्याना ...

गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण हक्क कायद्यानुसार ३ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना शाळेत दाखल करुन त्याना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळायला हवे. कोणतेही मुल शाळाबाह्य रहायला नको. ती शाळेत दाखल करुन शिकली व टीकली पाहिजे यासाठी शासन विविध योजना/उपक्रम राबवित आहे. मागील पंधरवाड्यात पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी सूक्ष्म सर्वेक्षण करण्यात आले होते.

या सर्वेक्षणात अहेरी तालुक्यातील येंकापल्ली येथील प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवीत पर्यंत शिक्षण घेत असलेल्या १२ मुलांना वयानुरुप त्यांचे वर्गात गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय बालरक्षक पुरस्कार प्राप्त विषय साधन व्यक्ती सुषमा खराबे (भोयर) यांनी शिक्षकांच्या मदतीने पालकांशी संवाद साधत त्याना शिक्षणाचे महत्व पटवून देत शाळेत दाखल करुन घेतले. एवढेच नव्हे तर त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करीत या सर्व विद्यार्थ्यांना कपडे व नोट बुक,पेन गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांचे हस्ते वितरित करण्यात आली. याप्रसंगी शिक्षक प्रकाश दुर्गे यानीही मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक प्रकाश दुर्गे, विषय साधन व्यक्ती किशोर मेश्राम, ज्ञानेश्वर कापगते, सुषमा खराबे, मुख्याध्यापिका.ए.बी.बारसागडे, शिक्षीका बेबी झीलपे, के.आय.शेख आदी उपस्थित होते. छतीसगढ राज्यातील रायपुर व बीलासपुर येथील पाच कुटुंब विटाभट्टीचे काम करण्यासाठी येंकापल्ली येथील नाल्यावर आपल्या परिवारासह मागील तीन महिन्यापूर्वीच आली. त्यांचेसोबत शाळा शिकणारी मुले सुद्धा आलीत. याबाबतची माहिती मुख्याध्यापिका ए.बी.बारसागडे यांना सर्वेक्षणात आढळुन आली. त्यानी बालरक्षक, विषय साधन व्यक्ती सुषमा खराबे यांचेशी संपर्क साधून या ठिकाणच्या बाराही मुला-मुलींना इयत्ता पहिली ते पाचवीत लगेच शाळेत दाखल करुन घेतले. मुलांना शाळेत तर दाखल केलेत पण आता आपली जबाबदारी जास्त वाढली आहे. ते नियमीत शाळेत येतील व शाळेत टिकतील व शाळा शिकतील यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांनी केले. या बाराही मुलांना शासनातर्फे शालेय गणवेश येत्या दोन तीन दिवसात उपलब्ध करून देण्याचे गटशिक्षणाधिकारी आश्वासन निर्मला वैद्य यांनी दिले.

कोट..

.सूक्ष्म सर्वेक्षणातून तालुक्यात जेवढी मुले शाळाबाह्य आढळली. त्या सर्वांना शाळेत दाखल करण्यात येत आहेत. उमानुर केंद्रात दोन शाळाबाह्य मुलांना त्यांचे वयानुरुप समकक्ष वर्गात दाखल करण्यात आली. एकही मुल शाळाबाह्य राहणार नाही याची सर्वजण काळची घेत आहेत. आपण सर्व बालरक्षक आहोत म्हणून बालकांचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

किशोर गज्जालवार,संवर्ग विकास अधिकारी, प.स.अहेरी.