शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीय १२ शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:38 IST

गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण हक्क कायद्यानुसार ३ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना शाळेत दाखल करुन त्याना ...

गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण हक्क कायद्यानुसार ३ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना शाळेत दाखल करुन त्याना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळायला हवे. कोणतेही मुल शाळाबाह्य रहायला नको. ती शाळेत दाखल करुन शिकली व टीकली पाहिजे यासाठी शासन विविध योजना/उपक्रम राबवित आहे. मागील पंधरवाड्यात पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी सूक्ष्म सर्वेक्षण करण्यात आले होते.

या सर्वेक्षणात अहेरी तालुक्यातील येंकापल्ली येथील प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवीत पर्यंत शिक्षण घेत असलेल्या १२ मुलांना वयानुरुप त्यांचे वर्गात गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय बालरक्षक पुरस्कार प्राप्त विषय साधन व्यक्ती सुषमा खराबे (भोयर) यांनी शिक्षकांच्या मदतीने पालकांशी संवाद साधत त्याना शिक्षणाचे महत्व पटवून देत शाळेत दाखल करुन घेतले. एवढेच नव्हे तर त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करीत या सर्व विद्यार्थ्यांना कपडे व नोट बुक,पेन गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांचे हस्ते वितरित करण्यात आली. याप्रसंगी शिक्षक प्रकाश दुर्गे यानीही मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक प्रकाश दुर्गे, विषय साधन व्यक्ती किशोर मेश्राम, ज्ञानेश्वर कापगते, सुषमा खराबे, मुख्याध्यापिका.ए.बी.बारसागडे, शिक्षीका बेबी झीलपे, के.आय.शेख आदी उपस्थित होते. छतीसगढ राज्यातील रायपुर व बीलासपुर येथील पाच कुटुंब विटाभट्टीचे काम करण्यासाठी येंकापल्ली येथील नाल्यावर आपल्या परिवारासह मागील तीन महिन्यापूर्वीच आली. त्यांचेसोबत शाळा शिकणारी मुले सुद्धा आलीत. याबाबतची माहिती मुख्याध्यापिका ए.बी.बारसागडे यांना सर्वेक्षणात आढळुन आली. त्यानी बालरक्षक, विषय साधन व्यक्ती सुषमा खराबे यांचेशी संपर्क साधून या ठिकाणच्या बाराही मुला-मुलींना इयत्ता पहिली ते पाचवीत लगेच शाळेत दाखल करुन घेतले. मुलांना शाळेत तर दाखल केलेत पण आता आपली जबाबदारी जास्त वाढली आहे. ते नियमीत शाळेत येतील व शाळेत टिकतील व शाळा शिकतील यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांनी केले. या बाराही मुलांना शासनातर्फे शालेय गणवेश येत्या दोन तीन दिवसात उपलब्ध करून देण्याचे गटशिक्षणाधिकारी आश्वासन निर्मला वैद्य यांनी दिले.

कोट..

.सूक्ष्म सर्वेक्षणातून तालुक्यात जेवढी मुले शाळाबाह्य आढळली. त्या सर्वांना शाळेत दाखल करण्यात येत आहेत. उमानुर केंद्रात दोन शाळाबाह्य मुलांना त्यांचे वयानुरुप समकक्ष वर्गात दाखल करण्यात आली. एकही मुल शाळाबाह्य राहणार नाही याची सर्वजण काळची घेत आहेत. आपण सर्व बालरक्षक आहोत म्हणून बालकांचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

किशोर गज्जालवार,संवर्ग विकास अधिकारी, प.स.अहेरी.