शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

मानवाधिकारांची जाण ठेवून प्रशासनाने काम करावे

By admin | Updated: May 18, 2017 01:42 IST

शासनातील प्रत्येक योजना आणि निर्णय यांची सांगड पूर्णपणे मानवाधिकाराशीच आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक : राष्ट्रीय मानवाधिकार समितीच्या प्रतिनिधी एस. जलजा यांचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शासनातील प्रत्येक योजना आणि निर्णय यांची सांगड पूर्णपणे मानवाधिकाराशीच आहेत. प्रशासन व्यवस्थेत काम करताना मानवाधिकारांची जाणीव ठेवून अधिकारी व कर्मचारी यांनी काम करावे, असे आवाहन राष्ट्रीय मानवाधिकार समितीच्या विशेष प्रतिनिधी एस. जलजा यांनी केले. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात एस. जलजा यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल, अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, सहायक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील महिलांच्या स्थितीसोबतच हुंडाबळी, बालकामगार तसेच बालविवाह प्रथा, जिल्ह्यात असणारी गुन्हेगारी आदींचा आढावा विविध विभागांच्या प्रमुखांकडून त्यांनी घेतला. जिल्ह्यातील ८० टक्के भाग हा पेसात येतो. त्याखेरीज जिल्ह्यात वनहक्क पट्टे देण्याचे काम ३१ हजारांपर्यंत झाले आहे. याबाबत त्यांनी या बैठकीत समाधान व्यक्त केले. वन हक्कांसोबत सर्वांना ग्रामसभेशी सांगड घालून योजनांचा लाभ द्या, असे जलजा म्हणाल्या. लग्न लागण्याचे मुलीचे वय आणि जिल्ह्यातील आदिवासी समाजातील परंपरा यांची माहिती त्यांनी यावेळी घेतली. लग्नानंतर काही हुंड्याच्या समस्या असतील तर अशा कुटुंबांमधील वाद ग्रामसभेसमोर मांडण्यात यावे जेणे करुन हुंडाबळीसारख्या घटना घडणार नाहीत, असे त्यांनी यावेळी सांगितले. नक्षलवादापासून परावृत्त करण्यासाठी शासनाने शरण येणाऱ्यांसाठी जी आत्मसमर्पण योजना सुरु केली, त्याची माहिती घेण्यासोबतच अशा व्यक्तींचे पुनर्वसन आणि इतर बाबींचा आढावा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी यावेळी सादर केला. अधिकारी आणि कर्मचारी यांनी काम करताना मानवाधिकाराची जाणीव ठेवून काम करावे, असेही आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.