शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाने जनतेला शिस्त लावावी; मात्र बाजारपेठ बंद करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:38 IST

आलापल्ली व अहेरी येथे लावण्यात आलेले निर्बंध येत्या दोन दिवसांत परत घेऊन दुकाने पूर्ववत सुरू करावी, अन्यथा व्यापारी रस्त्यावर ...

आलापल्ली व अहेरी येथे लावण्यात आलेले निर्बंध येत्या दोन दिवसांत परत घेऊन दुकाने पूर्ववत सुरू करावी, अन्यथा व्यापारी रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करतील, असा इशारा अहेरी व आलापल्ली येथील व्यापाऱ्यांनी गुरुवारी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला.

जनतेच्या बेलगाम वागण्यामुळे सध्या कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. प्रशासन जनतेला कितीही आवाहन करीत असले तरी आजाराचे गांभीर्य कळत नाही. यासाठी कडक निर्बंधाचीच आवश्यकता आहे. परंतु, केवळ व्यावसायिक दुकाने बंद करून कोरोनावर मात करता येणे शक्य नाही. उलट छोटे दुकानदार, हात ठेलेवाले व अन्य व्यावसायिकांचे नुकसान हाेईल. शासनाला कराच्या रूपात जाणारा महसूल बुडेल. त्यापेक्षा यंत्रणेला सशक्त करून जनतेला नियम पाळण्याची सक्ती केल्यास, कोरोना चाचणी केंद्रांची संख्या वाढविल्यास या रोगावर नियंत्रण मिळविता येईल असे जाणकारांचे मत आहे.

बाजारपेठ सुरू करून प्रत्येक दुकानदारांना नियम पाळण्याचे बंधने घालून दिल्यास आता सर्व दुकानदार काटेकोरपणे नियम पाळतील असे सर्वांचे एकमत आहे. त्यामुळे शासनाने रोजगारावर गदा न आणता यातून पर्यायी मार्ग काढावा. मेडिसीन, किराणा, भाजीपाला, डेली निड्स, तसेच बँक व सहकारी ऑफिस या ठिकाणी सगळ्यात जास्त गर्दी होते. परंतु, ही दुकाने वगळण्यात आलेली आहेत. कापड, भांडी, जनरल, हार्डवेअर, आदी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काही लहान व्यावसायिक दररोजच्या विक्रीवर आपली उपजीविका चालवितात. आधीच अनेकांचा व्यवसाय बुडाला आहे. नगर परिषदेच्या ठिकाणी ७० टक्के दुकाने सुरू आहेत. मात्र, ३० टक्के दुकानांना बंधने घालून व्यवसाय करण्यास परवानगी देणे याेग्य आहे काय? दुकानांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतची वेळ द्यावी. तसेच दोन दिवसांत निर्बंध परत न घेतल्यास व्यापारी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा अहेरी व आलापल्ली येथील व्यापारी संघटनेने दिला आहे.