शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

प्रशासनाने जनतेला शिस्त लावावी; मात्र बाजारपेठ बंद करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:38 IST

आलापल्ली व अहेरी येथे लावण्यात आलेले निर्बंध येत्या दोन दिवसांत परत घेऊन दुकाने पूर्ववत सुरू करावी, अन्यथा व्यापारी रस्त्यावर ...

आलापल्ली व अहेरी येथे लावण्यात आलेले निर्बंध येत्या दोन दिवसांत परत घेऊन दुकाने पूर्ववत सुरू करावी, अन्यथा व्यापारी रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करतील, असा इशारा अहेरी व आलापल्ली येथील व्यापाऱ्यांनी गुरुवारी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला.

जनतेच्या बेलगाम वागण्यामुळे सध्या कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. प्रशासन जनतेला कितीही आवाहन करीत असले तरी आजाराचे गांभीर्य कळत नाही. यासाठी कडक निर्बंधाचीच आवश्यकता आहे. परंतु, केवळ व्यावसायिक दुकाने बंद करून कोरोनावर मात करता येणे शक्य नाही. उलट छोटे दुकानदार, हात ठेलेवाले व अन्य व्यावसायिकांचे नुकसान हाेईल. शासनाला कराच्या रूपात जाणारा महसूल बुडेल. त्यापेक्षा यंत्रणेला सशक्त करून जनतेला नियम पाळण्याची सक्ती केल्यास, कोरोना चाचणी केंद्रांची संख्या वाढविल्यास या रोगावर नियंत्रण मिळविता येईल असे जाणकारांचे मत आहे.

बाजारपेठ सुरू करून प्रत्येक दुकानदारांना नियम पाळण्याचे बंधने घालून दिल्यास आता सर्व दुकानदार काटेकोरपणे नियम पाळतील असे सर्वांचे एकमत आहे. त्यामुळे शासनाने रोजगारावर गदा न आणता यातून पर्यायी मार्ग काढावा. मेडिसीन, किराणा, भाजीपाला, डेली निड्स, तसेच बँक व सहकारी ऑफिस या ठिकाणी सगळ्यात जास्त गर्दी होते. परंतु, ही दुकाने वगळण्यात आलेली आहेत. कापड, भांडी, जनरल, हार्डवेअर, आदी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काही लहान व्यावसायिक दररोजच्या विक्रीवर आपली उपजीविका चालवितात. आधीच अनेकांचा व्यवसाय बुडाला आहे. नगर परिषदेच्या ठिकाणी ७० टक्के दुकाने सुरू आहेत. मात्र, ३० टक्के दुकानांना बंधने घालून व्यवसाय करण्यास परवानगी देणे याेग्य आहे काय? दुकानांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतची वेळ द्यावी. तसेच दोन दिवसांत निर्बंध परत न घेतल्यास व्यापारी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा अहेरी व आलापल्ली येथील व्यापारी संघटनेने दिला आहे.