शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार

By admin | Updated: October 7, 2016 01:34 IST

धानोरा तालुक्यातील येरमागड शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी राजमू बुधकर धुर्वे या विद्यार्थ्याचा २६ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला

पालकांचा आरोप : येरमागड येथील विद्यार्थी मृत्यूप्रकरणगडचिरोली : धानोरा तालुक्यातील येरमागड शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी राजमू बुधकर धुर्वे या विद्यार्थ्याचा २६ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस आदिवासी विकास विभागाचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप आश्रमशाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यापासून आश्रमशाळेतील संपूर्ण २१३ विद्यार्थी शाळा सोडून गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे, अशीही माहिती दिली.केंद्र शासनाकडून आदिवासी विकास विभागाला कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध होतो. तरीही आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही. गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे दोन ते तीन कार्यालयाचा पदभार दिला आहे. त्यामुळे ते आदिवासी विकास विभागाकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकत नाही. प्रशासकीय जबाबदारी पार पाडताना अडचणी निर्माण होतात. पर्यवेक्षिय यंत्रणासुद्धा व्यवस्थित काम करीत नाही. राजमू धुर्वे या विद्यार्थ्याच्या मृत्यूस सहायक प्रकल्प अधिकारी व निरीक्षक जबाबदार आहेत. शाळा तपासणीच्या वेळी आश्रमशाळेत असलेल्या कमरता ते अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देत नाही. त्यामुळे निरीक्षक व सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. आश्रमशाळेमध्ये आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यासाठी राज्यपाल यांना निवेदन पाठविले जाणार आहे, अशी माहिती शाळा समिती अध्यक्ष सुधाकर तुलावी, संदीप वरखडे यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेला सुनील कुमरे, भगवान मडावी, लिंगा वेलादी, सुखदेव नैताम, रामदास कुळमेथे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)