शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

व्यसनमुक्तीचे काम अधिकारी करणार

By admin | Updated: January 10, 2015 22:54 IST

जिल्ह्यात १९९३ मध्ये दारूबंदी करण्यात आली. मात्र दारूबंदीची अंमबलबजावणी प्रभावशाली झालेली नाही. त्यामुळे गावागावात अवैध दारूविक्री कुटीरउद्योग झाला आहे. या अवैध व्यवसायात

गडचिरोली : जिल्ह्यात १९९३ मध्ये दारूबंदी करण्यात आली. मात्र दारूबंदीची अंमबलबजावणी प्रभावशाली झालेली नाही. त्यामुळे गावागावात अवैध दारूविक्री कुटीरउद्योग झाला आहे. या अवैध व्यवसायात १० हजारांवर नागरिक गुंतलेले आहेत. चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी करण्यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात नागरिकांमध्ये वाढत असलेली व्यसनाधिनता कमी करण्यासाठी आता राज्य सरकारच्यास्तरावरून सरकारी अधिकाऱ्यांना काम करावे लागणार आहे, असे संकेत राज्याचे वित्त व नियोजन मंत्र्यांनी दिले आहे.राज्यात वर्धा व गडचिरोली हे दोन जिल्हे दारूबंदी असलेले जिल्हे आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी होऊन २२ वर्ष झाले. परंतु दारूबंदी असल्याचे कुठेही दिसत नाही. गावागावात दारूचे अवैध दुकाने जोमाने सुरू आहे. विशेष या व्यवसायात महिलाही मोठ्या प्रमाणावर गुंतलेल्या आहेत. अत्यंत कमी श्रमात प्रचंड पैसा या अवैध धंद्यातून मिळत आहे. गावागावात दारू सहजपणे उपलब्ध होत असल्याने लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना दारूचे व्यसन जळले आहे. याशिवाय बिडी व तंबाखूचेही व्यसन अनेकांना असल्याचे सर्च या संस्थेने केलेल्या सामाजिक सर्वेक्षणातून चित्र पुढे आले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदीची अंमलबजावणी प्रभावशाली करण्यासाठी सर्वप्रथम व्यसनमुक्तीचे काम करणे आवश्यक असल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आले आहे. तत्कालीन आघाडी सरकारने गठित केलेल्या संजय देवतळे समितीनेही फसलेल्या दारूबंदीबाबत काही उपाययोजना सुचविल्या होत्या. यामध्ये व्यसनमुक्ती हा महत्वाचा मुद्दा होता, अशी माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे. त्यामुळे आता चंद्रपूर जिल्ह्याची संपूर्ण दारूबंदी करण्यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात शासनस्तरावरूनच शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत हे व्यसनमुक्तीचे काम केले जाणार आहे, असे संकेत राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी वर्धा येथेही दिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)