शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

वर्षभरात 10,298 वीज ग्राहकांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 05:00 IST

उद्याेग, व्यवसाय तसेच प्रत्येक घरी वीज जाेडणी घेतली जाते. त्यामुळे वीज ही अत्यावश्यक गरज बनली असल्याने प्रत्येक गावापर्यंत व प्रत्येक घरी वीज जाेडणी देण्याच्या उद्देशाने शासन प्रयत्नशील आहे. मार्च २०२० पासून काेराेनाचे संकट सुरू झाले. संपूर्ण आर्थिक वर्षात काेराेनाचे संकट कायम हाेते. तरीही नागरिकांकडून विजेची मागणी कमी झाली नाही. 

ठळक मुद्देमहावितरणमार्फत नवीन वीज जाेडण्या दिल्या; काेराेनाचे संकट असतानाही विजेची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : मागील आर्थिक वर्षात काेराेनाचे संकट असतानाही १० हजार २९८ नवीन वीज ग्राहकांची भर पडली आहे. महावितरणमार्फत या ग्राहकांना वीज जाेडणी देण्यात आली आहे. उद्याेग, व्यवसाय तसेच प्रत्येक घरी वीज जाेडणी घेतली जाते. त्यामुळे वीज ही अत्यावश्यक गरज बनली असल्याने प्रत्येक गावापर्यंत व प्रत्येक घरी वीज जाेडणी देण्याच्या उद्देशाने शासन प्रयत्नशील आहे. मार्च २०२० पासून काेराेनाचे संकट सुरू झाले. संपूर्ण आर्थिक वर्षात काेराेनाचे संकट कायम हाेते. तरीही नागरिकांकडून विजेची मागणी कमी झाली नाही. काही संयुक्त कुटुंब विभक्त हाेऊन स्वतंत्र मीटरची मागणी करतात. त्यामुळे घरगुती वापरासाठी वीज जाेडणीची मागणी हाेते. तसेच गावखेड्यातही किराणा दुकान व इतर दुकाने थाटली जातात. यासाठीसुध्दा स्वतंत्र वीज जाेडणीची मागणी हाेते. तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतात कृषीपंप बसविण्यात आले आहेत. वीज जाेडणीची मागणी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला वीज जाेडणी उपलब्ध करून देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडत महावितरणने काेराेनाच्या संकटातही १० हजार २९८ नवीन वीज ग्राहकांना जाेडण्या दिल्या आहेत. महावितरणकडे वीज मीटरचा तुटवडा राहते. त्यामुळे मार्च महिन्यात अर्ज केलेल्या अनेक ग्राहकांना अजूनपर्यंत वीज जाेडणी मिळाली नाही.

वीज जाेडणी देण्याची प्रक्रिया ऑनलाईनमागणीच्या तुलनेत वीज मीटरचा महावितरणकडे नेहमीच तुटवडा राहते. काही ग्राहकांना एक ते दाेन महिन्यांचा कालावधी उलटूनही वीज मीटर मिळत नसल्याने वीज जाेडणी हाेत नाही. त्यामुळे वीज जाेडणी देताना गैरव्यवहार हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे टाळण्यासाठी महावितरणने वीज मीटर देण्याची प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. यामध्ये प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम प्राधान्य देत वीज मीटर उपलब्ध करून वीज जाेडणी दिली जाते. तसेच अर्ज केल्यापासून मंजुरीच्या प्रक्रियेतील स्थिती लक्षात येण्यास वीज ग्राहकांना मदत हाेते.

छत्तीसगड सीमेलगतच्या पाच टक्के गावांना विजेची प्रतीक्षा

गडचिराेली जिल्ह्यातील जवळपास ९५ टक्के गावापर्यंत वीज पाेहाेचली आहे. छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेली ५ टक्के गावे मात्र अजूनही विजेपासून वंचित आहेत. एटापल्ली, भामरागड तालुक्यातील काही गावे अतिशय दुर्गम भागात व घनदाट जंगलात वसली आहेत. काही गावांना डाेंगरांचा वेढा आहे. या गावांमध्ये वीज खांब नेणे कठीण आहे, अशी ५ टक्के गावे विजेपासून वंचित आहेत.

काही गावांना साैरऊर्जेवरील संयंत्र पुरविण्यात आली आहेत. मात्र हे संयंत्र काही दिवसातच बंद पडत असल्याने तेथील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या गावांपर्यंत वीज पाेहाेचविण्याचे आव्हान महावितरणसमाेर आहे.

 

टॅग्स :electricityवीज