शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वर्षभरात 10,298 वीज ग्राहकांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 05:00 IST

उद्याेग, व्यवसाय तसेच प्रत्येक घरी वीज जाेडणी घेतली जाते. त्यामुळे वीज ही अत्यावश्यक गरज बनली असल्याने प्रत्येक गावापर्यंत व प्रत्येक घरी वीज जाेडणी देण्याच्या उद्देशाने शासन प्रयत्नशील आहे. मार्च २०२० पासून काेराेनाचे संकट सुरू झाले. संपूर्ण आर्थिक वर्षात काेराेनाचे संकट कायम हाेते. तरीही नागरिकांकडून विजेची मागणी कमी झाली नाही. 

ठळक मुद्देमहावितरणमार्फत नवीन वीज जाेडण्या दिल्या; काेराेनाचे संकट असतानाही विजेची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : मागील आर्थिक वर्षात काेराेनाचे संकट असतानाही १० हजार २९८ नवीन वीज ग्राहकांची भर पडली आहे. महावितरणमार्फत या ग्राहकांना वीज जाेडणी देण्यात आली आहे. उद्याेग, व्यवसाय तसेच प्रत्येक घरी वीज जाेडणी घेतली जाते. त्यामुळे वीज ही अत्यावश्यक गरज बनली असल्याने प्रत्येक गावापर्यंत व प्रत्येक घरी वीज जाेडणी देण्याच्या उद्देशाने शासन प्रयत्नशील आहे. मार्च २०२० पासून काेराेनाचे संकट सुरू झाले. संपूर्ण आर्थिक वर्षात काेराेनाचे संकट कायम हाेते. तरीही नागरिकांकडून विजेची मागणी कमी झाली नाही. काही संयुक्त कुटुंब विभक्त हाेऊन स्वतंत्र मीटरची मागणी करतात. त्यामुळे घरगुती वापरासाठी वीज जाेडणीची मागणी हाेते. तसेच गावखेड्यातही किराणा दुकान व इतर दुकाने थाटली जातात. यासाठीसुध्दा स्वतंत्र वीज जाेडणीची मागणी हाेते. तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतात कृषीपंप बसविण्यात आले आहेत. वीज जाेडणीची मागणी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला वीज जाेडणी उपलब्ध करून देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडत महावितरणने काेराेनाच्या संकटातही १० हजार २९८ नवीन वीज ग्राहकांना जाेडण्या दिल्या आहेत. महावितरणकडे वीज मीटरचा तुटवडा राहते. त्यामुळे मार्च महिन्यात अर्ज केलेल्या अनेक ग्राहकांना अजूनपर्यंत वीज जाेडणी मिळाली नाही.

वीज जाेडणी देण्याची प्रक्रिया ऑनलाईनमागणीच्या तुलनेत वीज मीटरचा महावितरणकडे नेहमीच तुटवडा राहते. काही ग्राहकांना एक ते दाेन महिन्यांचा कालावधी उलटूनही वीज मीटर मिळत नसल्याने वीज जाेडणी हाेत नाही. त्यामुळे वीज जाेडणी देताना गैरव्यवहार हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे टाळण्यासाठी महावितरणने वीज मीटर देण्याची प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. यामध्ये प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम प्राधान्य देत वीज मीटर उपलब्ध करून वीज जाेडणी दिली जाते. तसेच अर्ज केल्यापासून मंजुरीच्या प्रक्रियेतील स्थिती लक्षात येण्यास वीज ग्राहकांना मदत हाेते.

छत्तीसगड सीमेलगतच्या पाच टक्के गावांना विजेची प्रतीक्षा

गडचिराेली जिल्ह्यातील जवळपास ९५ टक्के गावापर्यंत वीज पाेहाेचली आहे. छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेली ५ टक्के गावे मात्र अजूनही विजेपासून वंचित आहेत. एटापल्ली, भामरागड तालुक्यातील काही गावे अतिशय दुर्गम भागात व घनदाट जंगलात वसली आहेत. काही गावांना डाेंगरांचा वेढा आहे. या गावांमध्ये वीज खांब नेणे कठीण आहे, अशी ५ टक्के गावे विजेपासून वंचित आहेत.

काही गावांना साैरऊर्जेवरील संयंत्र पुरविण्यात आली आहेत. मात्र हे संयंत्र काही दिवसातच बंद पडत असल्याने तेथील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या गावांपर्यंत वीज पाेहाेचविण्याचे आव्हान महावितरणसमाेर आहे.

 

टॅग्स :electricityवीज