शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
5
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
6
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
7
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
8
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
9
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
10
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
11
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
12
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
13
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
14
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
15
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
16
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
17
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
18
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
19
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयावरील जप्तीची कारवाई टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:10 IST

एमआयडीसीसाठी जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला न दिल्याबाबत जिल्हाधिकारी व भूसंपादन अधिकारी यांचे कार्यालय जप्त करावे, असे निर्देश जिल्हा दिवाणी न्यायालयाने दिले होते.

ठळक मुद्देएमआयडीसीग्रस्त शेतकरी : ३० जूनपर्यंत मोबदल्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एमआयडीसीसाठी जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला न दिल्याबाबत जिल्हाधिकारी व भूसंपादन अधिकारी यांचे कार्यालय जप्त करावे, असे निर्देश जिल्हा दिवाणी न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या बेलिफसह शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मात्र ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला दिला जाईल, असे आश्वासन एमआयडीसी आयुक्तांनी दिल्यानंतर जप्तीची कारवाई मागे घेण्यात आली.गडचिरोली येथील एमआयडीसीसाठी १९८६ मध्ये कोटगल मार्गावरील जमीन भूसंपादित करण्यात आली. त्यासाठी शेतकºयांना प्रतिहेक्टर ३५ हजार रूपये मोबदला दिला गेला. बाजारभावाच्या तुलनेत मोबदला अत्यंत कमी असल्याने १९९१ मध्ये जागोबा विठोबा कोटगले व इतर सात शेतकºयांनी दिवाणी न्यायालयात दाद मागितली. त्याचा निकाल १९९४ मध्ये लागला. त्यात शेतकºयांना प्रतिहेक्टर ७५ हजार रूपये मोबदला द्यावा, त्यावर येणारे इतर लाभ द्यावे, असा हुकुनामा झाला. याविरूद्ध भूसंपादन अधिकारी व जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी मोबदल्याची रक्कम जास्त होत असल्याने ती कमी करावी, यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केली. त्या अपिलाविरोधात जागोबा विठोबा कोटगले यांनी क्रॉस अपील दाखल करून मोबदला वाढवून मिळण्यासाठी विनंती अर्ज केला.उच्च न्यायालयाने शासनाची अपील नामंजूर करून कोटगले यांची क्रॉस अपील मान्य केली. या खटल्याचा निकाल १६ फेब्रुवारी २०१८ रोजी लागला. यामध्ये संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला प्रतिहेक्टर २ लाख ५० हजार रूपये व त्यावर येणारे शासनमान्य इतर लाभ देण्याचे निर्देश दिले. ही रक्कम निकालापासून दोन महिन्यांच्या आत शेतकऱ्यांना अदा करावी, असे निर्देश दिले. मात्र मुदत उलटूनही मोबदला दिली नाही. अर्जदारांनी पुन्हा दिवाणी न्यायालय गडचिरोली यांच्याकडे रेग्यूलर दरखास्त दाखल केली. दिवाणी न्यायालयाने त्यावर जिल्हाधिकारी व भूसंपादन अधिकारी यांच्यावर नोटीस बजावली. तरीही मोबदला देण्यात आला नाही. त्यामुळे दिवाणी न्यायालयाने जिल्हाधिकारी व भूसंपादन अधिकारी यांच्या कार्यालयावर जप्तीची कारवाई करावी, असे निर्देश दिले.या निर्देशानुसार न्यायालयाचे प्रमुख बेलिफ घोडाम, बेलिफ राजेश गौरकर यांच्यासह मधुकर कोटगले, उद्धव कोटगले, विलास भोयर, मुखरू भोयर, मणिराम कोटगले, केवळराम कोटगले, वसंत कोटगले, मुखरू कोटगले हे जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची कारवाई करण्यासाठी गेले. अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी एमआयडीसी आयुक्त कार्यालयात फोन करून जप्तीबाबतच्या कारवाईची माहिती दिली. एमआयडीसी आयुक्तांनी ३० जूनपर्यंत मोबदला देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जप्तीची कारवाई मागे घेण्यात आली. ३० जूनपर्यंत मोबदला मिळण्याची प्रतीक्षा करू, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.संबंधित शेतकऱ्यांची सुमारे ५० एकर जमीन एमआयडीसीमध्ये गेली आहे. सदर शेतकºयांना ५ कोटी ३४ लाख रूपये द्यायचे आहेत.