शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी तालुक्यात धान रोवणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:23 IST

कृषी विभागाच्या वतीने जून महिन्यापासून कृषी सप्ताह, कृषी संजीवनी मोहीम राबवून याद्वारे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी विभाग पोहोचला ...

कृषी विभागाच्या वतीने जून महिन्यापासून कृषी सप्ताह, कृषी संजीवनी मोहीम राबवून याद्वारे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी विभाग पोहोचला आहे. आता रोवणी सुरू झालेली असल्याने तालुका कृषी अधिकारी तेजदीप ढगे हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना श्री पद्धत, पट्टा पद्धतीने रोवणी व कमी कालावधीची रोपे लागवड केल्यामुळे उत्पन्नात वाढ कशी होते, याबाबत मार्गदर्शन करीत आहेत.

९ कृषी सहायक व २ कृषी पर्यवेक्षक यांच्याकडून विस्तार कार्य जोमात करून घेतले जात आहे. त्याची शहानिशा करण्यासाठी देलोडा खुर्द येथे स्वतः तालुका कृषी अधिकारी तेजदीप ढगे यांनी भेट दिली. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन मार्गदर्शन केले. यावेळी कृषी पर्यवेक्षक जी. एन. जाधवर व कृषी सहायक पी. जे. मेश्राम हजर होते. तालुका कृषी अधिकारी यांनी बोरी चक, वडधा, कुरंजा, देलोडा बु. येथे जाऊन शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचे महत्त्व तसेच बांधावर तूर लागवड केलेल्या तुरीचे शेंडे खुडल्यामुळे उत्पन्नात दीड ते दोन पट वाढ होते. याविषयी त्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. शेतकऱ्यांनी धान रोवणीत रासायनिक खते देताना चिखल करता वेळेस पहिला तास मारून झाल्यानंतर खत द्यावे व नंतर त्यावर ट्रॅक्टरचा दुसरा तास मारावा. यामुळे खते मुळांच्या कक्षेत जातील व पाण्याने आणि हवेमध्ये उडून जाणार नाही त्याचा परिपूर्ण वापर होईल व त्यामुळे खताची ३० ते ४० टक्क्यांपर्यंत बचत होईल, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला. तणनाशकाविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे, की तणनाशक मारल्यानंतर मग खत मारणे हे चुकीचे आहे. तणनाशकामुळे खताची भाप जाते असा समज आहे तो चुकीचा आहे, असेही त्यांनी सांगितले.