शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

आरमोरी तालुक्यात धान रोवणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:23 IST

कृषी विभागाच्या वतीने जून महिन्यापासून कृषी सप्ताह, कृषी संजीवनी मोहीम राबवून याद्वारे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी विभाग पोहोचला ...

कृषी विभागाच्या वतीने जून महिन्यापासून कृषी सप्ताह, कृषी संजीवनी मोहीम राबवून याद्वारे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी विभाग पोहोचला आहे. आता रोवणी सुरू झालेली असल्याने तालुका कृषी अधिकारी तेजदीप ढगे हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना श्री पद्धत, पट्टा पद्धतीने रोवणी व कमी कालावधीची रोपे लागवड केल्यामुळे उत्पन्नात वाढ कशी होते, याबाबत मार्गदर्शन करीत आहेत.

९ कृषी सहायक व २ कृषी पर्यवेक्षक यांच्याकडून विस्तार कार्य जोमात करून घेतले जात आहे. त्याची शहानिशा करण्यासाठी देलोडा खुर्द येथे स्वतः तालुका कृषी अधिकारी तेजदीप ढगे यांनी भेट दिली. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन मार्गदर्शन केले. यावेळी कृषी पर्यवेक्षक जी. एन. जाधवर व कृषी सहायक पी. जे. मेश्राम हजर होते. तालुका कृषी अधिकारी यांनी बोरी चक, वडधा, कुरंजा, देलोडा बु. येथे जाऊन शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचे महत्त्व तसेच बांधावर तूर लागवड केलेल्या तुरीचे शेंडे खुडल्यामुळे उत्पन्नात दीड ते दोन पट वाढ होते. याविषयी त्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. शेतकऱ्यांनी धान रोवणीत रासायनिक खते देताना चिखल करता वेळेस पहिला तास मारून झाल्यानंतर खत द्यावे व नंतर त्यावर ट्रॅक्टरचा दुसरा तास मारावा. यामुळे खते मुळांच्या कक्षेत जातील व पाण्याने आणि हवेमध्ये उडून जाणार नाही त्याचा परिपूर्ण वापर होईल व त्यामुळे खताची ३० ते ४० टक्क्यांपर्यंत बचत होईल, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला. तणनाशकाविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे, की तणनाशक मारल्यानंतर मग खत मारणे हे चुकीचे आहे. तणनाशकामुळे खताची भाप जाते असा समज आहे तो चुकीचा आहे, असेही त्यांनी सांगितले.