शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

तलावात ९६ घरांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2016 02:11 IST

पाटबंधारे (सिंचाई) विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शहरातील गोकुलनगरलगतच्या तलावाच्या पात्रात २७ मे

गडचिरोली : पाटबंधारे (सिंचाई) विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शहरातील गोकुलनगरलगतच्या तलावाच्या पात्रात २७ मे रोजी महसूल पाटबंधारे व नगर परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात तब्बल १९ हजार १९७ चौरस मीटर क्षेत्रावर ९६ घरांचे अतिक्रमण असल्याचे सिध्द झाले आहे. या संदर्भातील अहवाल गडचिरोलीच्या तहसीलदारांनी उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.गडचिरोली साजामधील सर्वे क्रमांक ७५१ मध्ये २८, सर्वे क्रमांक ७७४ मध्ये २१ व रामपूर तुकूम साजामधील सर्वे क्रमांक १४१ मध्ये ४७ अशा एकूण ९६ कुटुंबप्रमुख यांचे तलावाच्या पात्रात अतिक्रमण असल्याचे संयुक्त पथकाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. सर्वेक्षणानुसार अतिक्रमणात पक्के घर बांधकाम, जोता स्तर व रिकामी जागा तर काही अतिक्रमीत नागरिकांनी कॉलमची उभारणी तसेच काही नागरिकांनी कॉलम उभारण्यासाठी खड्डे तयार केले असल्याचे दिसून आले. गडचिरोली तहसील कार्यालयाच्या वतीने तलाव पात्रात अतिक्रमण केलेल्या कुटुंबप्रमुख यांची यादी तयार करण्यात आली असून सदर यादी व याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केलेल्या सर्वेक्षणात १० हजार ६६५ चौरस मीटर क्षेत्रावर ४९ तर ८ हजार ५३२ चौरस मीटर क्षेत्रावर ४७ नागरिकांनी अतिक्रमण केल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. आता तलावाचे सीमांकन करण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)कारवाई होणार काय?४तलाव पात्रातील अतिक्रमणाच्या सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयातील जमीन शाखेच्या विभागास प्राप्त झाला आहे, अशी माहिती तेथील एका कर्मचाऱ्याने लोकमतला दिली. या सर्वेक्षणाच्या अहवालावर कोणता निर्णय घेतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. सर्वेक्षणानंतर पुढील कारवाई काय, हे जाणून घेण्यासाठी लोकमतने जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्या भ्रमणध्वनीवर तसेच कार्यालयीन दुरवध्वनी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तलाव पात्रातील अतिक्रमणधारकांवर कारवाई होणार काय हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.अतिक्रमणधारकांत बड्यांचा समावेश४सिंचाई विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या गोकुलनगरलगतच्या तलावाच्या पात्रात केवळ सर्वसामान्य व गरीब नागरिकांनीच अतिक्रमण केले नाही. तर या अतिक्रमणधारकांमध्ये अनेक बड्या कुटुंब प्रमुखांचा समावेश आहे. तलावाच्या पात्रात वन, शिक्षण, आदिवासी विकास विभाग आदींसह विविध विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच सुदृढ आर्थिक परिस्थिती असलेल्यांचाही या अतिक्रमणधारकांमध्ये समावेश आहे, असे कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले.४सामाजिक कार्यकर्ते बसंतसिंह बैस यांनी सदर तलावपात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे शेती सिंचन व मासेमारी व्यवसाय धोक्यात आला असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.