शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

तलावात ९६ घरांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2016 02:11 IST

पाटबंधारे (सिंचाई) विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शहरातील गोकुलनगरलगतच्या तलावाच्या पात्रात २७ मे

गडचिरोली : पाटबंधारे (सिंचाई) विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शहरातील गोकुलनगरलगतच्या तलावाच्या पात्रात २७ मे रोजी महसूल पाटबंधारे व नगर परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात तब्बल १९ हजार १९७ चौरस मीटर क्षेत्रावर ९६ घरांचे अतिक्रमण असल्याचे सिध्द झाले आहे. या संदर्भातील अहवाल गडचिरोलीच्या तहसीलदारांनी उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.गडचिरोली साजामधील सर्वे क्रमांक ७५१ मध्ये २८, सर्वे क्रमांक ७७४ मध्ये २१ व रामपूर तुकूम साजामधील सर्वे क्रमांक १४१ मध्ये ४७ अशा एकूण ९६ कुटुंबप्रमुख यांचे तलावाच्या पात्रात अतिक्रमण असल्याचे संयुक्त पथकाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. सर्वेक्षणानुसार अतिक्रमणात पक्के घर बांधकाम, जोता स्तर व रिकामी जागा तर काही अतिक्रमीत नागरिकांनी कॉलमची उभारणी तसेच काही नागरिकांनी कॉलम उभारण्यासाठी खड्डे तयार केले असल्याचे दिसून आले. गडचिरोली तहसील कार्यालयाच्या वतीने तलाव पात्रात अतिक्रमण केलेल्या कुटुंबप्रमुख यांची यादी तयार करण्यात आली असून सदर यादी व याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केलेल्या सर्वेक्षणात १० हजार ६६५ चौरस मीटर क्षेत्रावर ४९ तर ८ हजार ५३२ चौरस मीटर क्षेत्रावर ४७ नागरिकांनी अतिक्रमण केल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. आता तलावाचे सीमांकन करण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)कारवाई होणार काय?४तलाव पात्रातील अतिक्रमणाच्या सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयातील जमीन शाखेच्या विभागास प्राप्त झाला आहे, अशी माहिती तेथील एका कर्मचाऱ्याने लोकमतला दिली. या सर्वेक्षणाच्या अहवालावर कोणता निर्णय घेतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. सर्वेक्षणानंतर पुढील कारवाई काय, हे जाणून घेण्यासाठी लोकमतने जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्या भ्रमणध्वनीवर तसेच कार्यालयीन दुरवध्वनी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तलाव पात्रातील अतिक्रमणधारकांवर कारवाई होणार काय हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.अतिक्रमणधारकांत बड्यांचा समावेश४सिंचाई विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या गोकुलनगरलगतच्या तलावाच्या पात्रात केवळ सर्वसामान्य व गरीब नागरिकांनीच अतिक्रमण केले नाही. तर या अतिक्रमणधारकांमध्ये अनेक बड्या कुटुंब प्रमुखांचा समावेश आहे. तलावाच्या पात्रात वन, शिक्षण, आदिवासी विकास विभाग आदींसह विविध विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच सुदृढ आर्थिक परिस्थिती असलेल्यांचाही या अतिक्रमणधारकांमध्ये समावेश आहे, असे कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले.४सामाजिक कार्यकर्ते बसंतसिंह बैस यांनी सदर तलावपात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे शेती सिंचन व मासेमारी व्यवसाय धोक्यात आला असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.