शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

तलावात ९६ घरांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2016 02:11 IST

पाटबंधारे (सिंचाई) विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शहरातील गोकुलनगरलगतच्या तलावाच्या पात्रात २७ मे

गडचिरोली : पाटबंधारे (सिंचाई) विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शहरातील गोकुलनगरलगतच्या तलावाच्या पात्रात २७ मे रोजी महसूल पाटबंधारे व नगर परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात तब्बल १९ हजार १९७ चौरस मीटर क्षेत्रावर ९६ घरांचे अतिक्रमण असल्याचे सिध्द झाले आहे. या संदर्भातील अहवाल गडचिरोलीच्या तहसीलदारांनी उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.गडचिरोली साजामधील सर्वे क्रमांक ७५१ मध्ये २८, सर्वे क्रमांक ७७४ मध्ये २१ व रामपूर तुकूम साजामधील सर्वे क्रमांक १४१ मध्ये ४७ अशा एकूण ९६ कुटुंबप्रमुख यांचे तलावाच्या पात्रात अतिक्रमण असल्याचे संयुक्त पथकाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. सर्वेक्षणानुसार अतिक्रमणात पक्के घर बांधकाम, जोता स्तर व रिकामी जागा तर काही अतिक्रमीत नागरिकांनी कॉलमची उभारणी तसेच काही नागरिकांनी कॉलम उभारण्यासाठी खड्डे तयार केले असल्याचे दिसून आले. गडचिरोली तहसील कार्यालयाच्या वतीने तलाव पात्रात अतिक्रमण केलेल्या कुटुंबप्रमुख यांची यादी तयार करण्यात आली असून सदर यादी व याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केलेल्या सर्वेक्षणात १० हजार ६६५ चौरस मीटर क्षेत्रावर ४९ तर ८ हजार ५३२ चौरस मीटर क्षेत्रावर ४७ नागरिकांनी अतिक्रमण केल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. आता तलावाचे सीमांकन करण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)कारवाई होणार काय?४तलाव पात्रातील अतिक्रमणाच्या सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयातील जमीन शाखेच्या विभागास प्राप्त झाला आहे, अशी माहिती तेथील एका कर्मचाऱ्याने लोकमतला दिली. या सर्वेक्षणाच्या अहवालावर कोणता निर्णय घेतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. सर्वेक्षणानंतर पुढील कारवाई काय, हे जाणून घेण्यासाठी लोकमतने जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्या भ्रमणध्वनीवर तसेच कार्यालयीन दुरवध्वनी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तलाव पात्रातील अतिक्रमणधारकांवर कारवाई होणार काय हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.अतिक्रमणधारकांत बड्यांचा समावेश४सिंचाई विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या गोकुलनगरलगतच्या तलावाच्या पात्रात केवळ सर्वसामान्य व गरीब नागरिकांनीच अतिक्रमण केले नाही. तर या अतिक्रमणधारकांमध्ये अनेक बड्या कुटुंब प्रमुखांचा समावेश आहे. तलावाच्या पात्रात वन, शिक्षण, आदिवासी विकास विभाग आदींसह विविध विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच सुदृढ आर्थिक परिस्थिती असलेल्यांचाही या अतिक्रमणधारकांमध्ये समावेश आहे, असे कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले.४सामाजिक कार्यकर्ते बसंतसिंह बैस यांनी सदर तलावपात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे शेती सिंचन व मासेमारी व्यवसाय धोक्यात आला असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.