शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
6
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
7
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
8
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
9
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
10
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
11
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
12
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
13
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
14
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
15
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
16
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
17
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
18
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
19
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
20
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?

८६ हजार हेक्टर शेती पडीत राहणार

By admin | Updated: August 12, 2015 01:18 IST

जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतीचा खरीप हंगाम पूर्णत: धोक्यात आला असून

अत्यल्प पर्जन्यमान : शेतकरी प्रचंड संकटातगडचिरोली : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतीचा खरीप हंगाम पूर्णत: धोक्यात आला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा खरीप हंगामात जवळजवळ ८६ हजार हेक्टर जमीन पडीत राहण्याचे चिन्ह दिसू लागली आहे. प्रशासन गतवर्षी एवढा पाऊस यंदाही झाल्याचा दावा करीत असला तरी जिल्ह्याच्या बहूतांश तालुक्यात पाऊस झालाच नसल्याने रोवणीची कामे थांबली आहेत.गडचिरोली जिल्ह्यात कोणतीही सिंचन व्यवस्था नाही. पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामात धानाची शेती केली जाते. धान हे जिल्ह्याचे प्रमुख पीक आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ४९ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाते. गतवर्षी २०१४ मध्ये पाऊस समाधानकारक झाल्याने जिल्ह्यात ६ आॅगस्ट २०१४ पर्यंत धानाची ४४ हजार ९९१ हेक्टर क्षेत्रावर रोवणी पूर्ण करण्यात आली होती. तर यंदा ६ आॅगस्ट २०१५ पर्यंत केवळ २९ हजार २८५ हेक्टर क्षेत्रावरच धानाची रोवणी झालेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हे क्षेत्र १५ हजार ७०६ हेक्टरने कमी आहे. अर्धा पावसाळा निघून गेला असून आॅगस्ट महिन्यात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रोवणी झालेले धानपीक करपायला लागले आहे. उकाड्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये धानावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी प्रचंड तणावात असल्याचे ग्रामीण भागात फेरफटका मारल्यावर दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)पावसाच्या आकडेवारीतही प्रशासनाची कावेबाजी४गडचिरोली जिल्ह्यात सरासरी १४०० मिमी पाऊस पडतो. गतवर्षी २०१४ मध्ये ११ आॅगस्टपर्यंत ६३६.१० मिमीच्या सरासरीने पाऊस झाला होता. यंदा ११ आॅगस्टपर्यंत ६५४.७३ मिमी पाऊस झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यंदा मात्र पाऊस गतवर्षीपेक्षा कमी असतानाही प्रशासन पावसाची आकडेवारी फुगवून दाखवित असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी एवढाच पाऊस पडला तर तलाव, बोडी कोरडीच कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाने पावसाची आकडेवारी कोठून जमा केली, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा-काँग्रेस४यंदा अत्यल्प पाऊस झाला. ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली, त्यांचे रोवणेही करपून गेले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा व शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी २५ हजार रूपये आर्थिक मदत करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून करण्यात आली आहे.शेतकऱ्यांकडे महागडे खते, कीटकनाशके पडूनच४अनेक शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्वीच पीक कर्ज मिळाल्यावर वर्षभराच्या हंगामासाठी लागणारे खते, कीटकनाशके खरेदी करतात. मात्र यंदा पाऊस झाला नाही. त्यामुळे अजूनही रोवणी सुरू झालेली नाही. शेतकऱ्यांनी खरेदी केलेले हजारो रूपये किमतीचे महागडे कीटकनाशके, खते त्यांच्या घरी पडून आहे. याच्या खरेदीसाठी लागलेला पैसा शेतकऱ्यांच्या जवळून निघून गेला आहे. त्यामुळे शेतकरी कमालीच्या आर्थिक अडचणीत आहे. ४यंदा अनेक तालुक्यात पावसाअभावी शेतकऱ्यांनी रोवणीच केली नसल्याने रासायनिक खत व कीटकनाशकाची मागणीही अत्यल्प प्रमाणात आहे. कुठेही खताचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी अर्धा पावसाळा पार होऊनही आलेल्या नाही. याचा अर्थ शेतकरी चिंताग्रस्त आहे.यंदा शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आलेला आहे. या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. आॅगस्ट महिन्यात रोवणी केली तरीही शेतकऱ्यांना हवे तसे उत्पन्न येण्याची तिळमात्र शक्यता नाही. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रतिमहा १ हजार रूपये मानधन स्वरूपात पुढील वर्षभर वितरित करावे.- चंदू वडपल्लीवार, पं. स. उपसभापती, आरमोरी