शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

८६ हजार हेक्टर शेती पडीत राहणार

By admin | Updated: August 12, 2015 01:18 IST

जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतीचा खरीप हंगाम पूर्णत: धोक्यात आला असून

अत्यल्प पर्जन्यमान : शेतकरी प्रचंड संकटातगडचिरोली : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतीचा खरीप हंगाम पूर्णत: धोक्यात आला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा खरीप हंगामात जवळजवळ ८६ हजार हेक्टर जमीन पडीत राहण्याचे चिन्ह दिसू लागली आहे. प्रशासन गतवर्षी एवढा पाऊस यंदाही झाल्याचा दावा करीत असला तरी जिल्ह्याच्या बहूतांश तालुक्यात पाऊस झालाच नसल्याने रोवणीची कामे थांबली आहेत.गडचिरोली जिल्ह्यात कोणतीही सिंचन व्यवस्था नाही. पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामात धानाची शेती केली जाते. धान हे जिल्ह्याचे प्रमुख पीक आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ४९ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाते. गतवर्षी २०१४ मध्ये पाऊस समाधानकारक झाल्याने जिल्ह्यात ६ आॅगस्ट २०१४ पर्यंत धानाची ४४ हजार ९९१ हेक्टर क्षेत्रावर रोवणी पूर्ण करण्यात आली होती. तर यंदा ६ आॅगस्ट २०१५ पर्यंत केवळ २९ हजार २८५ हेक्टर क्षेत्रावरच धानाची रोवणी झालेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हे क्षेत्र १५ हजार ७०६ हेक्टरने कमी आहे. अर्धा पावसाळा निघून गेला असून आॅगस्ट महिन्यात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रोवणी झालेले धानपीक करपायला लागले आहे. उकाड्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये धानावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी प्रचंड तणावात असल्याचे ग्रामीण भागात फेरफटका मारल्यावर दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)पावसाच्या आकडेवारीतही प्रशासनाची कावेबाजी४गडचिरोली जिल्ह्यात सरासरी १४०० मिमी पाऊस पडतो. गतवर्षी २०१४ मध्ये ११ आॅगस्टपर्यंत ६३६.१० मिमीच्या सरासरीने पाऊस झाला होता. यंदा ११ आॅगस्टपर्यंत ६५४.७३ मिमी पाऊस झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यंदा मात्र पाऊस गतवर्षीपेक्षा कमी असतानाही प्रशासन पावसाची आकडेवारी फुगवून दाखवित असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी एवढाच पाऊस पडला तर तलाव, बोडी कोरडीच कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाने पावसाची आकडेवारी कोठून जमा केली, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा-काँग्रेस४यंदा अत्यल्प पाऊस झाला. ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली, त्यांचे रोवणेही करपून गेले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा व शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी २५ हजार रूपये आर्थिक मदत करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून करण्यात आली आहे.शेतकऱ्यांकडे महागडे खते, कीटकनाशके पडूनच४अनेक शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्वीच पीक कर्ज मिळाल्यावर वर्षभराच्या हंगामासाठी लागणारे खते, कीटकनाशके खरेदी करतात. मात्र यंदा पाऊस झाला नाही. त्यामुळे अजूनही रोवणी सुरू झालेली नाही. शेतकऱ्यांनी खरेदी केलेले हजारो रूपये किमतीचे महागडे कीटकनाशके, खते त्यांच्या घरी पडून आहे. याच्या खरेदीसाठी लागलेला पैसा शेतकऱ्यांच्या जवळून निघून गेला आहे. त्यामुळे शेतकरी कमालीच्या आर्थिक अडचणीत आहे. ४यंदा अनेक तालुक्यात पावसाअभावी शेतकऱ्यांनी रोवणीच केली नसल्याने रासायनिक खत व कीटकनाशकाची मागणीही अत्यल्प प्रमाणात आहे. कुठेही खताचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी अर्धा पावसाळा पार होऊनही आलेल्या नाही. याचा अर्थ शेतकरी चिंताग्रस्त आहे.यंदा शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आलेला आहे. या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. आॅगस्ट महिन्यात रोवणी केली तरीही शेतकऱ्यांना हवे तसे उत्पन्न येण्याची तिळमात्र शक्यता नाही. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रतिमहा १ हजार रूपये मानधन स्वरूपात पुढील वर्षभर वितरित करावे.- चंदू वडपल्लीवार, पं. स. उपसभापती, आरमोरी