शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

८00 ची रेती पोहोचली १३00 च्यावर

By admin | Updated: May 30, 2014 23:42 IST

न्यायालयाच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रातील रेतीच्या उपशावर बंदी आली होती. रेती खुली असतांना रेतीसाठी नागरीकांना ८00 रूपये मोजावे लागत होते. मात्र बंदीनंतर त्याच रेतीसाठी १३00

देसाईगंज : न्यायालयाच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रातील रेतीच्या उपशावर बंदी आली होती.  रेती खुली असतांना रेतीसाठी नागरीकांना ८00 रूपये मोजावे लागत होते. मात्र बंदीनंतर त्याच रेतीसाठी १३00 रूपयाच्यावर  मोजावे लागत आहेत. न्यायालयाने रेतीवरील बंदी उठविली असली तरी वाढलेले भाव जैसे थे आहेत. रेती ठेकेदारांची चांदी झाली असली तरी सर्व सामान्यांचा घरबांधकामाचा बजेट यामुळे कोलमडला आहे.रेती उपशामुळे पर्यावरण संतूलन बिघडत असल्याचा ठपका ठेवत उच्च न्यायालयाने संपूर्ण महाराष्ट्रातील रेतीच्या उपशावर आठ दिवसापूर्वी बंदी घातली होती. नदी पात्रातुन रेतीचा उपसा करण्यावर बंदी येणार याची चाहूल लागताच रेती ठेकेदारांनी मिळेत त्या मोकळ्या ठिकाणी रेती जमा करून ठेवली होती. घरबांधकामासाठी रेती अतिशय आवश्यक सामुग्री आहे.  त्यामुळे बंदीच्या काळात मनमर्जीच्या भावाने रेतीची विक्री केली जाऊ शकते.  याची खात्री ठेकेदारांना होती. घरबांधकाम करणार्‍या नागरिकांचा बजेट यामुळे कोलमडलेला आहे.  बंदीपूर्वी ज्या रेतीसाठी ८00 रूपये मोजावे लागत होते त्याच रेतीसाठी आता नागरिकांना १३00 ते १५00 रूपये मोजावे लागत आहेत. रॉयल्टीनुसार नदीपात्रातून रेतीचा उपसा केल्यावर ते संबंधीत ठिकाणीच टाकावे लागते, असा नियम आहे. मात्र ठेकेदार रेतीचा अवैध साठा करून रेतीच्या व्यवसायातून जास्त नफा  करण्याच्या तयारीला लागले आहेत. न्यायालयाने रेती उपशावरील बंदी उठवली असून २८ मेपासून रेती घाट सुरू झाले आहेत. मात्र रेतीचा व्यवसाय करणारे अजूनही वाढीव भावाने रेतीची विक्री करीत आहेत.. नियमानुसार नदीतून रेती काढतांना रेती व्यावसायिकांना त्या रेतीची रॉयल्टी दिलेली आहे.  संबंधीत ठिकाणावरून रेती बांधकामाच्या जागेवर नेण्यासाठी प्रत्यक्षात ठेकेदारांना दुसरी रॉयल्टी द्यावी लागते.  प्रत्यक्षात असे कधीच होत नाही.  रेती व्यवसायीक व महसूल विभागाच्या हातमिळवणीमुळे शासनाला अवैध रेती उपशातून लाखो रूपयांचा चूना लागत असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)