शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

आरटीईच्या ८० टक्के जागा भरल्या; प्रवेशाला २३ जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:23 IST

गडचिराेली : आरटीईअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के प्रवेश राखीव ठेवले जातात. ...

गडचिराेली : आरटीईअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के प्रवेश राखीव ठेवले जातात. या याेजनेंतर्गत गडचिराेली जिल्ह्यात आत्तापर्यंत ३७३ विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये प्रवेश झाले आहेत. एकूण जागांच्या तुलनेत ८० टक्के जागा भरण्यात आल्या असून २० टक्के प्रवेश शिल्लक आहेत.

गेल्या वर्षभरापासून काेराेना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे गडचिराेली जिल्ह्यातील प्राथमिक शाळा बंद आहेत. असे असतानासुद्धा पालकांचा आरटीईअंतर्गत माेफत प्रवेशाकडे कल वाढला आहे. या याेजनेच्या माध्यमातून दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना संधी मिळत आहे.

बाॅक्स ........आठ विद्यार्थ्यांचे प्रवेश केले रद्द

माेफत व सक्तीच्या शिक्षक हक्क कायद्यानुसार पहिल्या वर्गाच्या २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. या जागांवर लाॅटरी पद्धतीने निवड झाली. शाळांमध्ये प्रवेश झाले. मात्र, निवासी पुराव्याच्या कारणावरून शहरातील शाळांमधील आठ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

शहरात आरटीईअंतर्गत निवडलेल्या अनेक शाळा इयत्ता चाैथीपर्यंतच आहेत. चाैथी वर्ग उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीमध्ये माेफत प्रवेश मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. यात शासनाचे धाेरण कारणीभूत आहे.

बाॅक्स .....

दुसऱ्यांदा मिळाली मुदतवाढ

काेराेनामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेस यावर्षी विलंब झाला. दरम्यान, राज्य शासनाने या प्रवेश प्रक्रियेला आधी ९ जुलैपर्यंत मुदत दिली हाेती. मात्र, अडचणींमुळे १०० टक्के जागा भरल्या नाहीत. या जागा भरण्यासाठी शासनाने दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. २३ जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.

काेट ......

शाळांचे पैसे सरकार कधी देणार?

आरटीईअंतर्गत आमच्या शाळेत २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. मात्र, शुल्कापाेटी शासनाकडून मिळणारी रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जात आहे. अजूनही पैसे शिल्लक आहेत. त्यामुळे आर्थिक अडचण जाणवत आहे.

- सी. के. कांबळे, संस्थाध्यक्ष, घाेट.

काेट ......

माझ्या मुलाचा आरटीई प्रवेशासाठी लाॅटरी पद्धतीने नंबर लागला. मात्र, काॅम्प्लेक्स परिसरातील दूरची शाळा मिळाल्याने आपण प्रवेश घेतला नाही. कारण प्रवास खर्च लागताे.

- विनाेद लभाने, पालक.

काेट .....

काेराेना संकटामुळे यावर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला आहे. शासनाने आता २३ जुलैपर्यंत प्रवेश घेण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. जवळपास ८० टक्के प्रवेश झाले असून उर्वरित २० टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश २२ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येतील.

- हेमलता परसा, शिक्षणाधिकारी (प्राथ.).

जि. प. गडचिराेली.