शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दुर्गम भागात ७० मोबाईल टॉवरची उभारणी होणार

By admin | Updated: November 27, 2014 23:34 IST

डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सर्व ४५६ ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरसोबत जोडल्या जाणार आहेत. यामध्ये जिल्हाभरात जवळपास ७० मोबाईल टॉवर उभारले जाणार आहेत.

गडचिरोली : डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सर्व ४५६ ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरसोबत जोडल्या जाणार आहेत. यामध्ये जिल्हाभरात जवळपास ७० मोबाईल टॉवर उभारले जाणार आहेत. या जोडणीनंतर जिल्ह्यात मोबाईल अथवा दूरध्वनी जोडणीची समस्या राहणार नाही. ही माहिती दूरसंचार विभाग गडचिरोली सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. पहिल्या टप्यात मार्च २०१५ पर्यंत ६ तहसीलमधील पंचायतींना जोडण्याचा कार्यक्रम निश्चित केला आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दूसरा टप्पा एप्रिल २०१५ पासून सुरू होणार असून मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यासोबत लेफ्ट विंग इस्टीमिझमनुसार ३७ मोबाइल टॉवर्स व फेज ७ प्रोजेक्टनुसार २१ टॉवर्सच्या निर्मितीसाठी केंद्रीय गृह व संचार मंत्रालयाकडून मंजुरी प्राप्त झाली आहे. मार्चच्या शेवटपर्यंत सर्व टॉवरचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासाठी केंद्रीय वनमंत्रालयाचीही मान्यता प्राप्त झाली आहे. टॉवरच्या निर्मितीसाठी आवश्यक निधी व यंत्रसामुग्रीसह सर्व संसाधन उपलब्ध आहेत. जमिनीची समस्या मात्र निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दूरसंचार विभागाला टॉवर उभारणीसाठी सरकारी जमीन उपलब्ध होत नाही. जी जमीन उपलब्ध होत आहे, ती अधिग्रहीत करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. जिल्हा प्रशासनाने या मुद्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यात १ लाख ७५ हजारांच्या जवळपास बीएसएनएलचे मोबाइल ग्राहक आहेत. मात्र संपूर्ण जिल्ह्यात कव्हरेजची फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, धानोरा या दुर्गम भागात बऱ्याचवेळा कव्हरेज राहत नाही. आप्टिकल फायबरच्या माध्यमातून गडचिरोली शहरात ५ नवीन टॉवर्स व ग्रामीण भागामध्ये १६ टॉवर्स उभारले जाणार आहेत. गडचिरोली शहरात आरमोरी मार्ग, रेड्डी गोडाऊन, गोकुलनगर (आयटीआय बायपास), पोलीस अधीक्षक कार्यालय व कारगिल चौकात टॉवर उभारले जाणार आहेत. तर ग्रामीण भागात मुलचेरा तालुक्यातील गोमणी, कोपअली, खुदीरामपली, सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका, अंकिसा, सिरोंचा, कुरखेडा तालुक्यातील कुकडी, येंगलखेडा, अहेरी तालुक्यातील उमानूर, गुड्डीगुडम, चामोर्शी तालुक्यातील नेताजी नगर, इल्लूर, मार्र्कंडादेव, कोरची तालुक्यातील बेलगाव व एटापल्ली तालुक्यातील चंद्रा येथे नवीन टॉवरची उभारणी केली जाणार आहे. एलडब्ल्यू व टप्पा ७ क्रमांकानुसार ५८ टॉवरची मान्यता आहे. मात्र जागेची कमतरता असल्याने टॉवर उभारण्यास अडचण निर्माण होत आहे, अशी माहिती दूरसंचार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. (नगर प्रतिनिधी)