शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

आरमोरीतील नेहरू चौकातील गणेश उत्सवाला ६९ वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:43 IST

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच अशी सिंहगर्जना करून भारतीयांमध्ये इंग्रजांविरोधात असंतोष निर्माण करण्यासाठी लोकमान्य ...

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच अशी सिंहगर्जना करून भारतीयांमध्ये इंग्रजांविरोधात असंतोष निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्यानंतर देशभरात विशेषतः महाराष्ट्रात सार्वजनिक व कौटुंबिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. तेच लोण आरमोरी शहरापर्यंत पोहचून आरमोरी शहरात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या उत्सवाला खरे स्वरूप प्राप्त झाले.

१९५०च्या दरम्यान म्हणजे ६९ वर्षांपूर्वी आरमोरी येथील नेहरू चौकात जमिनीतून गणेशमूर्ती बाहेर आली. सदर गणेशमूर्ती त्याच ठिकाणी प्रतिष्ठापित करण्यात आली. त्यानंतर काही वर्षांतच तेथे गणेश मंदिराची निर्मिती करण्यात आली. या कामी बैरवार, दिनकर हेमके यांनी पुढाकार घेऊन मंदिर निर्मितीस व प्राणप्रतिष्ठेस सहकार्य केले. त्यानंतर मंदिराची देखभाल , वामन देवीकर, दिलीप हेमके, राजू अंबानी,संजय हेमके, चंद्रशेखर पप्पूलवार आदी करीत आहेत.

मंदिरात विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम वर्षभर साजरे केले जातात. सामूहिक तुळशी विवाह, रक्तदान शिबिर यांसह विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम सुरू केले जातात. त्यामुळे दर्शनासाठी भाविकांची वर्दळ होत असते. नेहरू चौकातील युवकांनी एकत्र येऊन धार्मिक परंपरा जपण्यासाठी अष्टविनायक गणेश उत्सव मंडळाची स्थापना केली. दरवर्षी या उत्सव मंडळाद्वारे गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. परंतु मागील वर्षीपासून कोरोनाचे संकट आल्याने धार्मिक कार्यक्रम बंद ठेवण्यात आले आहे. यावर्षी सुद्धा अगदी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यावर्षी या उत्सवाची ६९ वर्षांची परंपरा आहे.

130921\img-20210913-wa0039.jpg

आरमोरी येथील नेहरू चौकातील गणेश मंदिरातील पुरातन मूर्ती