शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

वन्यजीवांसाठी ६७३ नवीन जलस्रोत

By admin | Updated: April 27, 2016 01:16 IST

वन्यजीवांची जंगलामध्येच तहान भागून ते गावाकडे धाव घेऊ नयेत, यासाठी वन विभागाने २०१५-१६ या वर्षात १२ कोटी १९ लाख रूपये खर्चुन जंगलामध्ये ६७३ नवीन जलस्रोत निर्माण केले आहेत.

१२ कोटींचा खर्च : ३५२ खोदतळ्यांचे बांधकामगडचिरोली : वन्यजीवांची जंगलामध्येच तहान भागून ते गावाकडे धाव घेऊ नयेत, यासाठी वन विभागाने २०१५-१६ या वर्षात १२ कोटी १९ लाख रूपये खर्चुन जंगलामध्ये ६७३ नवीन जलस्रोत निर्माण केले आहेत. या जलस्रोतांच्या माध्यमातून वन्य प्राण्यांची तहान भागविण्याचा प्रयत्न वन विभागाकडून केला जात आहे. गडचिरोली जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १६ हजार ५१७ चौरस किमी एवढे आहे. त्यापैकी १२ हजार ५७६ चौरस किमी अंतरावर वनक्षेत्र आहे. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत सुमारे ७६ टक्के वनक्षेत्र आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या घनदाट जंगलात बिबट्यापासून ते सस्यापर्यंत अनेक वन्यजीव आहेत. या वन्यजीवांना हिवाळा व पावसाळ्यात पाणीटंचाई जाणवत नाही. मात्र एप्रिल महिन्यापासून जंगलातील लहान-मोठे जलस्रोत आटण्यास सुरुवात होते. त्यामुळे उन्हाळ्यात अन्न जरी जंगलात मिळत असले तरी पाण्यासाठी गावांजवळ असलेल्या पाणवट्यांचा आसरा वन्यजीवांना घ्यावा लागतो. गावाच्या जवळपास वन्यजीव आल्यानंतर त्यांची कुत्रा किंवा मानवाकडून शिकार होत असल्याच्या अनेक घटना आजपर्यंत घडल्या आहेत. वन्यजीवांची तहान जंगलातच भागल्यास ते गावाकडे धाव घेणार नाही, या उद्देशाने वन विभागाच्या मार्फतीने जंगलातच जलस्रोत तयार केले जातात. २०१४ मध्ये वन विभागाच्या मार्फतीने सुमार १९३ जलस्त्रोत तयार केले होते. त्यासाठी १ कोटी ४५ लाख रूपयांचा निधी खर्च झाला होता. २०१४-१५ या वर्षात ४७६ जलस्त्रोत तयार करण्यात आले होते. त्यावर ८ कोटी ९४ लाख ७५ हजार रूपये खर्च झाले होते. २०१५-१६ मध्ये वन विभागाच्या मार्फतीने १० सिमेंट बंधारे बांधले आहेत. त्यासाठी ३० लाख १८ हजार रूपये खर्च आला आहे. २ लाख ७९ हजार खर्च करून २ वनतळे बांधले आहेत. ४ कोटी २१ लाख ४८ हजार रूपये खर्चुन ३५२ खोदतळे, २१ लाख ९२ हजार रूपये खर्चून ३० दगडी बंधारे, १२ लाख ३४ हजार खर्चून ९ गॅबियन बंधारे, ७ कोटी १० लाख खर्च करून डीप सीसीटी व २० लाख रूपये खर्चुन १५ वनबंधारे बांधण्यात आली आहेत. असे एकूण ६७३ जलस्रोत निर्माण करण्यात आले असून त्यावर १२ कोटी १९ लाख २६ हजार रूपयांचा खर्च आला आहे. (नगर प्रतिनिधी)ग्रामीण भागात प्रचारवन्यजीव व मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाच्या मार्फतीने ग्रामीण व जंगलव्याप्त भागांमध्ये जागृती अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामसभांच्या ठिकाणी प्रत्यक्ष जावून वन विभागाचे कर्मचारी वन्यजीवांचा संघर्ष कसा टाळावा, याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनामध्ये वन्यजीवांचे असलेले महत्त्वही पटवून दिले जात आहे. त्याचबरोबर प्रसिद्धीपत्रके, सुविचार, विद्यार्थी, रॅली, कार्यशाळा, वन व्यवस्थापन समित्यांच्या सभा आदींच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.कॅमेरा ट्रॅप व जीपीएस यंत्रांचा वापरवन्यजीवांच्या शिकारीचे प्रमाण साधारणत: उन्हाळ्यामध्ये वाढते. त्यामुळे या कालावधीत वन्यजीवांच्या हालचालीवर नियंत्रण राहावे, यासाठी काही विशिष्ट ठिकाणी वन विभागाच्या मार्फतीने पाणवठ्यांवर कॅमेरा ट्रॅपिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी जीपीएस यंत्रांचाही वापर केला गेला आहे.