एकूण बाधितांची संख्या २२ हजार ४९६ एवढी झाली आहे. त्यापैकी १७ हजार ६६२ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ४ हजार ३८६ काेराेनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. ४४८ जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. ११ जणांच्या मृत्यूमध्ये मुलचेरा तालुक्यातील माेहुर्ली येथील ४८ वर्षीय महिला, धानाेरा तालुक्यातील माेहली येथील ५२ वर्षीय पुरुष, गडचिराेली तालुक्यातील कनेरी येथील ६५ वर्षीय महिला, कुरखेडा तालुक्यातील नान्ही येथील ६९ वर्षीय पुरुष, आरमाेरी तालुक्यातील वासाळा येथील ४६ वर्षीय पुरुष, धानाेरा येथील ७० वर्षीय महिला, गडचिराेली येथील ६५ वर्षीय महिला, देसाईगंज तालुक्यातील विसाेरा येथील ५८ वर्षीय पुरुष, आरमाेरी येथील २६ वर्षीय महिला, देसाईगंज येथील ४८ वर्षीय पुरुष, काेरची येथील ६५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
२३९ नवीन बाधितांमध्ये गडचिराेली तालुक्यातील १२७, अहेरी १३, आरमाेरी १४, भामरागड २, चामाेर्शी १४, धानाेरा ५, एटापल्ली ४, काेरची ३, कुरखेडा ४, मुलचेरा ४, सिराेंचा ३७ व देसाईगंज तालुक्यातील १२ जणांचा समावेश आहे. ५५९ काेराेनामुक्त झालेल्यांमध्ये गडचिराेली तालुक्यातील १७५, अहेरी ५१, आरमाेरी २४, भामरागड २९, चामाेर्शी ४०, धानाेरा २५, एटापल्ली ३१, मुलचेरा १२, सिराेंचा १४, काेरची २९, कुरखेडा ४८ व देसाईगंज तालुक्यातील ८१ जणांचा समावेश आहे.