शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्के बंधाऱ्यांच्या फळ्या झाल्या गायब

By admin | Updated: September 2, 2015 01:06 IST

जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत शेती सिंचनासाठी जिल्हाभरात एकूण ६५८ कोल्हापुरी व साठवण

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत शेती सिंचनासाठी जिल्हाभरात एकूण ६५८ कोल्हापुरी व साठवण बंधारे आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा तीन महिन्यांच्या कालावधीत अधिक पाऊस झाला. मात्र पाण्याअभावी अद्यापही रोवणीशिवाय हजारो हेक्टर जमीन पडीत आहे. ६५८ बंधाऱ्यांमध्ये एकूण फळ्यांची संख्या ५ हजार ५०३ आहे. यापैकी २ हजार ७६३ बंधाऱ्यांच्या फळ्या गायब झाल्या असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. परिणामी शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट कोसळले आहे. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या तब्बल ६५८ कोल्हापुरी व साठवण बंधाऱ्याची एकूण प्रकल्पीय सिंचन क्षमता १४२९४.१५ हेक्टर असून जीवंत साठवण क्षमता ०.३५ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या ६५८ बंधाऱ्यामध्ये ०.२० दशलक्ष घनमीटर जलसाठा असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. जि.प. लघु पाटबंधारे विभागाच्या अर्ध्या अधिक बंधाऱ्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अनेक बंधारे लिकेज आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याची या बंधाऱ्यात साठवणूक होऊ शकली नाही. विशेष म्हणजे, अर्ध्या बंधाऱ्याच्या फळ्या गायब झाल्यामुळे अनेक बंधारे पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. दुरवस्था झालेल्या व फळ्या गायब झालेल्या बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाने नियोजन केले. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची मागील आठवड्यात बैठक झाली. त्यानंतर जि.प. लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने दुरूस्त करावयाच्या बंधाऱ्याची यादी व नियोजन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. सद्यस्थितीत अर्ध्या बंधाऱ्यांना २ हजार ७६३ फळ्या बसविण्यासाठी त्याची किरकोळ दुरूस्ती करण्यासाठी ७ कोटी ५१ हजार रूपयांची आवश्यकता आहे. तशी माहितीही जि.प. लघु पाटबंधारे विभागाकडून सादर करण्यात आली आहे. शासनाचा निधी प्राप्त झाल्यानंतरच जिल्ह्यातील दुरवस्था झालेल्या बंधाऱ्यांची किरकोळ दुरूस्ती व नव्या फळ्या बसविण्याचे काम होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)काय म्हणते प्रशासनाची पावसाची आकडेवारी?४गतवर्षी २०१४ च्या खरीप हंगामात जून, जुलै व आॅगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण ७०८.९ पाऊस प्रत्यक्षात झाला व त्याची टक्केवारी ६२.३ आहे. यंदाच्या खरीप हंगामात जून ते आॅगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत ८३३.६ प्रत्यक्षात पाऊस झाला असून त्याची टक्केवारी ७३.३ आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तीन महिन्यांच्या कालावधीत १२५ मिमी सरासरी पाऊस अधिक झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. मात्र दुष्काळाची भिषणता पाहता अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या पावसाच्या आकडेवारीवर आश्चर्य व्यक्त केले आहे. जलयुक्त शिवारचा फायदा झाला काय?४नव्या भाजप-सेना प्रणित राज्य सरकारने टंचाईमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी यावर्षीपासून जलयुक्त शिवार अभियान राज्यभरात सुरू केले. या अभियानांतर्गत १५२ गावांची निवड करून १५०० पेक्षा अधिक जलसंधारणाची कामे घेण्यात आली. त्यापैकी निम्म्याहून अधिक कामे पूर्ण झाली असून कोट्यवधी रूपये खर्च झाले आहे. मात्र जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या जलसंधारणाच्या कामातून यंदा शेतकऱ्यांना मुळीच फायदा झाला नसल्याच्या प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.ग्रामपंचायत व पाणी वाटप समित्यांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर४जि.प. लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने दरवर्षी १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान बंधाऱ्यांवर फळ्या बसवून पाणी अडविण्याचे काम ग्रामपंचायत तसेच गाव पातळीवरील समित्यांमार्फत केले जाते. मात्र अर्ध्या बंधाऱ्यांचे २ हजार ७६३ फळ्या चोरी गेल्यामुळे आता पावसाचे पाणी अडवायचे कसे, असा प्रश्न विभागासमोर निर्माण झाला आहे. बंधाऱ्यावरील फळ्या गायब झाल्याने ग्रामपंचायत व पाणी वाटप समित्यांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे.