शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

५० उद्योगांना संजीवनी

By admin | Updated: August 14, 2016 01:25 IST

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरातील ५० उद्योगांना ८४ लाख ६१ हजार रूपयांची मदत...

८४ लाखांचे अनुदान : पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम गडचिरोली : पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरातील ५० उद्योगांना ८४ लाख ६१ हजार रूपयांची मदत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे सदर उद्योग स्थिरस्थावर होण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर बँकेच्या मार्फतीने जवळपास तीन कोटी रूपयांचे कर्ज सुध्दा वितरित करण्यात आले आहे. सर्वच सुशिक्षीत बेरोजगारांना शासकीय नोकरी देणे सरकारलाही अशक्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी स्वयंरोजगार करून त्यामाध्यमातून स्वत:चा प्रपंच भागवावा व इतरांनाही रोजगार उपलब्ध करून द्यावा या उद्देशाने शासनाकडून उद्योजकांना मदत करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. उद्योगांना आर्थिक मदत करण्याबरोबरच त्यांना वेळोवेळी सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हास्तरावर महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ आहे. सदर मंडळ ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना रोजगार स्थापनेसाठी मदत करते. तर जिल्हा उद्योग केंद्र ग्रामीण व शहरी भागातील युवकांना मदत करते. उद्योजकांना मदत करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविला आहे. या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने जिल्ह्यातील १४ उद्योजकांना २८ लाख रूपयांचे सहायक अनुदान वितरित केले आहे. त्याचबरोबर जिल्हा उद्योग केंद्राने सुध्दा ३६ उद्योगांना ५६ लाख ६१ हजार रूपयांचे सहायक अनुदान वितरित केले आहे. या अनुदानासोबतच बँकेच्या मार्फतीने जवळपास तीन कोटी रूपयांचे कर्ज सुध्दा उपलब्ध करून देण्यात आले आहे. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानामुळे नवीन उद्योजकाला थोडे स्थिरस्तावर होण्यास मदत होते. त्यामुळे उद्योजक या सहायक अनुदानाची प्रतीक्षा करीत राहतात. (नगर प्रतिनिधी) आॅनलाईन करावा लागणार अर्ज मागील वर्षीपर्यंत उद्योगासाठी सहायक अनुदान पाहिजे असल्यास खादी ग्रामोद्योग मंडळ किंवा जिल्हा उद्योग केंद्राकडे प्रत्यक्ष जाऊन अर्ज करावा लागत होता. यावर्षीपासून मात्र पहिल्यांदाच आॅनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. आॅनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती यावर विचार करणार आहे. ७७ लाखांचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाला सन २०१६-१७ या वर्षात १७ उद्योगांना ३३ लाख २३ हजार रूपयांचे सहायक अनुदान वितरित करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. तर जिल्हा उद्योग केंद्रातील २२ उद्योगांना ४४ लाख रूपयांचे सहायक अनुदान वितरित करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. दोन्ही विभागांच्या वतीने लाभार्थींचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे.