शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

४७८ कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट?

By admin | Updated: September 14, 2015 01:20 IST

ग्रामपंचायतीचे प्रशासन पारदर्शक होण्यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येतात.

ई-पंचायत (संग्राम) : कराराला मुदतवाढ नाहीगडचिरोली : ग्रामपंचायतीचे प्रशासन पारदर्शक होण्यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येतात. याच उपक्रमाचा भाग असलेल्या ई-पंचायत (संग्राम) योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयात संगणक, प्रिंटर, युपीएस आदी साहित्य पुरविण्यात आले. याकरिता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. शासनाकडून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना केलेल्या कराराला मुदतवाढ देण्याबाबत प्रशासनाकडून कारवाई झाली नाही. ३० सप्टेंबर २०१५ रोजी कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीची मुदत संपत आहे. त्यामुळे ४५६ ग्रामपंचायतीमधील जवळपास ४७८ कर्मचारी बेरोजगारीच्या वाटेवर आहेत. संग्राम अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांबाबतच्या शासनाच्या कराराची मुदत ३१ माच २०१५ होती. त्यानंतर या कराराला सहा महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली. याकरिता १३ व्या वित्त आयोगातील उर्वरित निधी वापरण्याची संमती राज्य शासनाने दिली होती. आता ३० सप्टेंबर २०१५ रोजी कराराची मुदत संपत आहे. त्यामुळे संग्राम अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सदर योजना महाआॅनलाईन कंपनीशी जोडण्यात आली आहे. ई-पंचायत योजनेवर जिल्हा प्रशासनाकडून देखरेख ठेवली जाते. जिल्ह्यात या योजनेवर कोट्यवधी रूपयांचा खर्च झाला पण कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर टांगती तलवार आहे. या योजनेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा शासनासोबत असलेला करार सप्टेंबरअखेर संपत आहे. शासनाने या संदर्भात अद्याप कुठलेही ठोस पाऊल उचलले नसल्याची माहिती मिळाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात ई-पंचायत योजनेमध्ये जवळपास एकूण ४७८ कर्मचारी कार्यरत आहेत. यात दरमहा कामानुसार कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी अधिक होत असते. जिल्ह्यात ई-पंचायत योजनेंतर्गत जिल्हा परिषद स्तरावर चार संगणक परिचालक, पंचायत समितीस्तरावर प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण २४ संगणक परिचालक, बाराही पंचायत समितीस्तरावर प्रत्येकी एक प्रमाणे १२ तालुका समन्वयक तसेच सात पंचायत समितीस्तरावर सात हार्डवेअर इंजिनिअर कार्यरत आहेत. यात ग्रामपंचायत स्तरावर सर्वाधिक ४३५ संगणक परिचालक व जिल्हास्तरावर एक जिल्हा समन्वयक असे एकूण ४७८ कर्मचारी कार्यरत आहे.आॅपरेटरचे चार महिन्यांचे मानधन थकीतगडचिरोली जिल्हा परिषदेत संग्राम अंतर्गत चार परिचालक कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांचे जून, जुलै, आॅगस्ट या तीन महिन्याचे वेतन थकीत आहे. तसेच ग्रामपंचायत स्तरावरील संगणक परिचालकांचे मे, जून, जुलै, आॅगस्ट या चार महिन्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे कर्मचारी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. प्रमाणपत्राच्या डाटाएन्ट्रीनुसार मिळते मानधनई-पंचायत योजनेंतर्गत जिल्ह्याच्या बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये संगणकासह साहित्याचा पुरवठा करण्यात आला असून संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संगणक परिचालकांचे पाच ते साडेपाच हजार ठरले आहे. मात्र संबंधित आॅपरेटरने डाटाएन्ट्री केलेल्या प्रमाणपत्राच्या संख्येनुसार आॅपरेटरला मानधन दिले जाते. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे.