शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

४७ टक्के धानाची रोवणी आटोपली

By admin | Updated: July 31, 2016 02:13 IST

कृषी विभागाने जिल्हाभरात केलेल्या पाहणीनुसार २६ जुलै पर्यंत ४७ टक्के रोवणीची कामे आटोपली आहेत.

निम्म्या क्षेत्रावर आवत्या : ७१ हजार ८५९ हेक्टरवर लागवडीचे नियोजन गडचिरोली : कृषी विभागाने जिल्हाभरात केलेल्या पाहणीनुसार २६ जुलै पर्यंत ४७ टक्के रोवणीची कामे आटोपली आहेत. एकूण भात लागवड क्षेत्राच्या सुमारे ३७ हजार १९८ हेक्टरवर भाताची रोवणी झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील धान हे प्रमुख पिक आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात ७१ हजार ८५९ हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. गडचिरोली जिल्ह्यात धानाचे सर्वसाधारण क्षेत्र सुमारे १ लाख ५३ हजार २२८ हेक्टर आहे. सुरूवातीच्या पावसात ज्या शेतकऱ्यांनी धानाची पऱ्हे टाकली होती. अशा शेतकऱ्यांनी १५ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान रोवणीच्या कामाला सुरूवात केली होती. मात्र काही तालुक्यात पहिला पाऊस दमदार झाला नाही. त्यामुळे त्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी धानाची पऱ्हे टाकली नव्हती. त्यानंतर सतत पाऊस झाल्याने रोवणीची कामे खोळंबली. अशा शेतकऱ्यांचे रोवणे झाले नाही. भात रोवणीला पर्याय म्हणून काही शेतकरी आवत्या टाकतात. चालू वर्षात ३४ हजार ६६१ हेक्टरवर आवत्या पध्दतीने धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. २६ जुलैपर्यंत गडचिरोली तालुक्यात ६ हजार ६२६ हेक्टरवर भात पिकाची लागवड झाली आहे. त्यात ३ हजार १४२ हेक्टरवर आवत्या टाकण्यात आला आहे. कुरखेडा तालुक्यात ६ हजार ५३४ हेक्टरवर रोवणी तर १ हजार ८६३ हेक्टरवर आवत्या, आरमोरी तालुक्यात ९ हजार ८०० हेक्टरवर रोवणी तर ४ हजार २५० हेक्टरवर आवत्या, चामोर्शी तालुक्यात ३ हजार ८०४ हेक्टरवर रोवणी तर १ हजार २६६ हेक्टरवर आवत्या टाकण्यात आला आहे. सिरोंचा तालुक्यात ७५१ हेक्टरवर आवत्या पध्दतीने लागवड केली आहे. अहेरी तालुक्यात १ हजार २६ हेक्टरवर रोवणीची कामे आटोपली आहेत. एटापल्ली तालुक्यात ३८९ हेक्टर, धानोरा ३ हजार ७९९, कोरची १ हजार ६००, देसाईगंज ३ हजार ७९४, मुलचेरा १ हजार ७० तर भामरागड तालुक्यात ७५६ हेक्टरवर रोवणीची कामे आटोपली आहेत. असे एकूण ३७ हजार १९८ हेक्टरवर रोवणी झाली आहे. (नगर प्रतिनिधी) पावसाअभावी कामे थांबली मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दिवसभर कडक ऊन पडत असल्याने धानाच्या बांधीमधील पाणी पूर्णपणे आटले आहे. त्यामुळे धान रोवणीची कामे जिल्हाभरात ठप्प पडले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असेच शेतकरी धानाची रोवणी करीत आहेत. धान रोवणीची कामे थांबल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. जेवढ्या उशीरा धानाची रोवणी होते, तेवढीच उत्पादनात घट होते. सिंचन विभागाच्या अखत्यारित असलेले संपूर्ण तलाव तुडूंब भरले आहेत. त्यामुळे सदर तलावाचे पाणी सोडण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. पाणी न सुटल्यास रोवणीची कामे थांबणार आहेत.