शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

४७ टक्के धानाची रोवणी आटोपली

By admin | Updated: July 31, 2016 02:13 IST

कृषी विभागाने जिल्हाभरात केलेल्या पाहणीनुसार २६ जुलै पर्यंत ४७ टक्के रोवणीची कामे आटोपली आहेत.

निम्म्या क्षेत्रावर आवत्या : ७१ हजार ८५९ हेक्टरवर लागवडीचे नियोजन गडचिरोली : कृषी विभागाने जिल्हाभरात केलेल्या पाहणीनुसार २६ जुलै पर्यंत ४७ टक्के रोवणीची कामे आटोपली आहेत. एकूण भात लागवड क्षेत्राच्या सुमारे ३७ हजार १९८ हेक्टरवर भाताची रोवणी झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील धान हे प्रमुख पिक आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात ७१ हजार ८५९ हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. गडचिरोली जिल्ह्यात धानाचे सर्वसाधारण क्षेत्र सुमारे १ लाख ५३ हजार २२८ हेक्टर आहे. सुरूवातीच्या पावसात ज्या शेतकऱ्यांनी धानाची पऱ्हे टाकली होती. अशा शेतकऱ्यांनी १५ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान रोवणीच्या कामाला सुरूवात केली होती. मात्र काही तालुक्यात पहिला पाऊस दमदार झाला नाही. त्यामुळे त्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी धानाची पऱ्हे टाकली नव्हती. त्यानंतर सतत पाऊस झाल्याने रोवणीची कामे खोळंबली. अशा शेतकऱ्यांचे रोवणे झाले नाही. भात रोवणीला पर्याय म्हणून काही शेतकरी आवत्या टाकतात. चालू वर्षात ३४ हजार ६६१ हेक्टरवर आवत्या पध्दतीने धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. २६ जुलैपर्यंत गडचिरोली तालुक्यात ६ हजार ६२६ हेक्टरवर भात पिकाची लागवड झाली आहे. त्यात ३ हजार १४२ हेक्टरवर आवत्या टाकण्यात आला आहे. कुरखेडा तालुक्यात ६ हजार ५३४ हेक्टरवर रोवणी तर १ हजार ८६३ हेक्टरवर आवत्या, आरमोरी तालुक्यात ९ हजार ८०० हेक्टरवर रोवणी तर ४ हजार २५० हेक्टरवर आवत्या, चामोर्शी तालुक्यात ३ हजार ८०४ हेक्टरवर रोवणी तर १ हजार २६६ हेक्टरवर आवत्या टाकण्यात आला आहे. सिरोंचा तालुक्यात ७५१ हेक्टरवर आवत्या पध्दतीने लागवड केली आहे. अहेरी तालुक्यात १ हजार २६ हेक्टरवर रोवणीची कामे आटोपली आहेत. एटापल्ली तालुक्यात ३८९ हेक्टर, धानोरा ३ हजार ७९९, कोरची १ हजार ६००, देसाईगंज ३ हजार ७९४, मुलचेरा १ हजार ७० तर भामरागड तालुक्यात ७५६ हेक्टरवर रोवणीची कामे आटोपली आहेत. असे एकूण ३७ हजार १९८ हेक्टरवर रोवणी झाली आहे. (नगर प्रतिनिधी) पावसाअभावी कामे थांबली मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दिवसभर कडक ऊन पडत असल्याने धानाच्या बांधीमधील पाणी पूर्णपणे आटले आहे. त्यामुळे धान रोवणीची कामे जिल्हाभरात ठप्प पडले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असेच शेतकरी धानाची रोवणी करीत आहेत. धान रोवणीची कामे थांबल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. जेवढ्या उशीरा धानाची रोवणी होते, तेवढीच उत्पादनात घट होते. सिंचन विभागाच्या अखत्यारित असलेले संपूर्ण तलाव तुडूंब भरले आहेत. त्यामुळे सदर तलावाचे पाणी सोडण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. पाणी न सुटल्यास रोवणीची कामे थांबणार आहेत.