शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

कृषी विकासावर ४३ कोटींचा खर्च

By admin | Updated: May 18, 2014 23:35 IST

उद्योगाअभावी शेती हेच येथील महत्वाचे रोजगाराचे साधन आहे. त्यामुळे शासनाचा शेती विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर राहतो.

 गडचिरोली : उद्योगाअभावी शेती हेच येथील महत्वाचे रोजगाराचे साधन आहे. त्यामुळे शासनाचा शेती विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर राहतो. २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये विविध योजनांवर ४३ कोटी १ लाख ४५ हजार रूपये एवढा खर्च करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण क्षेत्रफळाच्या ८० टक्के जमीन जंगलांनी व्यापली आहे. त्यामुळे शेतीसाठी अत्यंत कमी जमीन उपलब्ध आहेत. मागील काही वर्षापासून वनहक्कांतर्गत नागरिकांना जमीनीचे पट्टे देण्यात येत आहेत. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्रामध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ झाली आहे. तेंदूपत्ता वगळता रोजगाराचे एकही साधन जिल्ह्यातील युवकांना उपलब्ध नाही. त्यामुळे शेतीतून मिळणार्‍या उत्पन्नावरच वर्षभराची गुजरान करावी लागते. सिंचनाच्या सोयी नसल्याने एकच पीक घेऊन उर्वरित आठ महिने रिकामे राहावे लागते. येथील संपूर्ण आर्थिक परिस्थिती शेतीवर अवलंबून असल्याने शेती विकासावर शासनाचा मुख्य भर राहतो. शेती विकासासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रूपयाचा निधी प्राप्त होतो. २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये कृषी व कृषी संलग्न सेवांच्या विकासासाठी सर्वसाधारण योजनांसाठी २३ कोटी ९४ लाख ३ हजार रूपयाचा निधी प्राप्त झाला. या निधीतून शेती विकासाच्या विविध योजना राबविण्यात आल्या. त्याचबरोबर शेतीशी संबंधीत उद्योग, प्रगत शेतीसाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठीही सदर निधीचा उपयोग करण्यात येतो. यामुळे शेतकर्‍याला प्रगत शेतीचे ज्ञान मिळण्याबरोबरच शेतीच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाजाची संख्या बरीच आहे. स्वातंत्र प्राप्त होऊन ६० वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असला तरी हा समाज अजुनपर्यंत विकासाच्या मृख्य प्रवाहात आला नाही. आदिवासी उपयोजनेंतर्गत १५ कोटी २० लाख २५ हजार रूपये प्राप्त झाले. आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांसाठी ९७ कोटी रूपये तर अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी २९ कोटी १६ हजार रूपये एवढा निधी खर्च करण्यात आला आहे. असा एकूण ४३ कोटी १ लाख ४५ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. (नगर प्रतिनिधी)