शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

३४४ कामांवर चार कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 22:27 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातून गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाची विविध कामे केली जातात. विशेष म्हणजे, ही कामे मजुरांमार्फत केली जात असल्याने य कामातून जिल्ह्यातील हजारो मजुरांना रोजगार मिळत असतो.

ठळक मुद्देहजारो मजुरांना रोजगार प्राप्त : रोजगार हमी योजनेंतर्गत जलसंधारणाची कामे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातून गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाची विविध कामे केली जातात. विशेष म्हणजे, ही कामे मजुरांमार्फत केली जात असल्याने य कामातून जिल्ह्यातील हजारो मजुरांना रोजगार मिळत असतो. रोहयो अंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या विविध कामांवर एकूण ४ कोटी ५४ लाख ९२ हजार रुपयांचा खर्च झाला आहे.जिल्हा परिषदेमध्ये नरेगा विभाग असून या विभागामार्फत मजुरांमार्फत भातखाचरे निर्मिती व पुनर्जीवन, बोडी नुतनीकरण, शेततळे, माती नाला बांध आदी कामे केली जातात. सन २०१४-१५ ते २०१८-१९ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाची ५०० वर कामे करण्यात आली आहे.सन २०१८-१९ या वर्षात शेततळ्यांची चार कामे करण्यात आली असून या कामांवर २.४७ लाख रुपयांचा खर्च झाला. बोडी दुरूस्तीची एकूण ११ कामे करण्यात आली असून यावर ७.८० लाख रुपयांचा खर्च झाला. एका मातीनाला बांध तयार करण्यासाठी १३ हजार रुपये खर्च करण्यात आला. तब्बल २६२ भातखाचऱ्याची कामे करण्यात आली. यावर ३८६.६२ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. याशिवाय ६६ भातखाचºयाच्या पुनरूजीवनाचे काम करण्यात आले. यावर २७.९० लाख रुपये खर्च झाले. सन २०१८-१९ या वर्षभरात जलसंधारणाच्या एकूण ३४४ कामांवर एकूण ४ कोटी ५४ लाख ९२ हजार रुपयांचा खर्च झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.सन २०१७-१८ या वर्षात शेततळ्यांचे चार, बोडी दुरूस्तींची सहा, भातखाचºयाची ९१, एक माती नाला बांध व भातखाचरे दुरूस्तीची २९ अशा एकूण १३१ कामांवर १५१.६५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. सन २०१६-१७, सन २०१५-१६ व सन २०१४-१५ या वर्षात सुध्दा शेततळे, बोडी दुरूस्ती आदीसह जलसंधारणाची विविध कामे रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आली.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने नरेगा विभागामार्फत दरवर्षी ग्रामपंचायत व यंत्रणा स्तरावर घेण्यात येणाऱ्या कामांचा कृती आराखडा तयार केला जातो. याला जिल्हा प्रशासन व शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर कामास सुरूवात केली जाते. सध्या तापमानाचा पारा वाढला असून तेंदू हंगाम सुरू असल्याने रोहयो कामावर मजुरांची अत्यल्प उपस्थिती आहे.नरेगा अंतर्गत वृक्ष लागवडही होणारजि.प. नरेगा विभागाच्या वतीने शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला जातो. नरेगा विभागामार्फत गतवर्षी सुध्दा १०० वर रोपट्यांची लागवड करण्यात आली. यावर्षीच्या पावसाळ्यात शासनाकडून मिळालेल्या उद्दिष्टानुसार विविध जातीच्या रोपट्यांची लागवड करण्यात येणार आहे. दरम्यान यासाठी खड्डे खोदण्याचे काम करावे लागणार आहे. या कामातून शेकडो मजुरांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या योजनेमार्फत शासनाने प्रत्येक नोंदणीकृत मजुराला १०० दिवसाचा रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी कायद्यान्वये दिली आहे.